पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आक्रमक झाला असून, पक्षाच्या वतीने संविधान चौकात 'थाळी बजाओ' आंदोलन करण्यात आले.
विमान इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे विमान कंपन्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम आता नागपूर विमानतळावरील उड्डाणांवर दिसून येत आहे.
गोमातेला राष्ट्रीय पशू घोषित करण्याच्या मागणीसाठी नागपुरातील संविधान चौकात मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या कमी करण्यात आलेल्या किंवा बंद झालेल्या विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरातील भांडेवाडी येथे सुरू असलेल्या कचऱ्यापासून सीएनजी निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर शहराशी संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
अंबाझरी तलाव मार्गावर शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. घाटे रेस्टॉरंटजवळ रस्त्यालगत उभा असलेला एक विशाल वृक्ष अचानक जमीनदोस्त झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या प्रश्नावरून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागपुरात आक्रमक आंदोलन केले.
विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून नागपुरातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल (10th result) जाहीर केला असून, नागपूर जिल्ह्याने यंदा 89.07 टक्के निकाल नोंदवला आहे.
अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून वणी येथे एमडी (मेफेड्रोन) ड्रग्सची विक्री करणाऱ्या दोन युवकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
वाढत्या घरफोडी आणि वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी यशोधरानगर पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच वेळी 8 चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे.
काही दिवसांत शरीर सुडौल होईल, स्तनांचा आकार वाढेल, वजन झटपट कमी होईल अशा आकर्षक दाव्यांमुळे बाजारात विकल्या जाणाऱ्या अनेक उत्पादनांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठा प्रहार केला आहे.
२४ वर्षीय महिलेने बलात्कार, ब्लॅकमेलिंग, आर्थिक खंडणी, अंधश्रद्धेच्या माध्यमातून मानसिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतराचे आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
देशातील विविध राज्यांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच आता पंजाबच्या राजकारणातही नव्या वादाची ठिणगी पडली आहे.
सर्दी-खोकल्यासाठी मेडिकलमधून थेट सिरप खरेदी करणाऱ्या नागरिकांना आता डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य ठरणार आहे.
देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय उपक्रमांपैकी एक असलेल्या ‘जनगणना 2027’ मोहिमेत सहभागी होणाऱ्या लाखो प्रगणक आणि पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
अमेरिकेत एक मोठी हवाई दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण कॅलिफोर्नियातील एडवर्ड्स एअर फोर्स बेसवरून उड्डाण केल्यानंतर अमेरिकेच्या हवाई दलातील महत्त्वाचे मानले जाणारे B-52 बॉम्बर विमान दुर्घटनाग्रस्त झाले.
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर परिसरात मोठी कारवाई करत काही संशयित तरुणांची चौकशी सुरू केली आहे.
इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतावरही जाणवत आहे.
राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राजकीय वर्तुळात सध्या चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.
‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
राजकारणाला दिशा देणारे महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून सुरू होत असून ते १० जुलैपर्यंत चालणार आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, मातोश्रीवर आयोजित खासदारांच्या बैठकीला अनेक खासदार गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार वेगळा गट स्थापन करून लोकसभा अध्यक्षांकडे पत्र सादर करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
हिंदी दूरचित्रवाणी क्षेत्रातील अभिनेत्री संचिता उगाले हिच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
कर्नाटकातील बहुचर्चित 2400 कोटी रुपयांच्या कथित गुंतवणूक घोटाळ्याच्या तपासादरम्यान अभिनेत्री सनी लिओनी हिचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
रुग्णालयापर्यंत सतत पाठलाग करणाऱ्या पॅपाराझींवर सलमान खान चांगलाच संतापल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते थलपती विजय सध्या त्यांच्या वैभवशाली जीवनशैलीमुळे चर्चेत आले आहेत.
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या जोरदार चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. विशेष नक्षलविरोधी मोहिमेत सहभागी असलेले DRG चे पथक बेज्जी–चिंतागुफा परिसरातील दुर्गम जंगल पट्ट्यात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढवला.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) सरकार खाजगी कंपन्यांमधील कामगारांसाठी महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. राज्यात कामाचे तास सध्याच्या ९ तासांऐवजी १० तास करण्याचा विचार सुरु असून, ही माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचा परिणाम आता भारताच्या इंधन क्षेत्रावरही दिसू लागला आहे.
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे आता महागाईचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वाढत्या डिझेल दरांमुळे आर्थिक तणावात सापडलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी भाडेवाढीचे संकेत दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे एलपीजी गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम होत असून भारतात गॅस तुटवड्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केदारनाथ मंदिर चे दरवाजे उघडल्यानंतर चारधाम यात्रेला वेग आला असून, भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती हा केवळ स्मरणाचा औपचारिक दिवस नाही, तर तो नव्या विचारांची, नव्या उमेदीची आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा देणारा महत्त्वपूर्ण क्षण आहे.
‘जय साईराम’च्या घोषात आणि फुलांनी सजलेल्या रथाच्या साक्षीने शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) शिर्डीत १४ किलोमीटरच्या साई परिक्रमेचा (Sai Parikrama) उत्साहात प्रारंभ झाला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा रंगला.
माघ शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश जयंतीनिमित्त (Ganesh Jayanti) नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळत आहे. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि झगमगती विद्युत रोषणाईने सजवण्यात आले असून, गुरुवार (२२ जानेवारी २०२६) पहाटेपासूनच विघ्नहर्त्या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
भारतीय ॲथलेटिक्सचा सुवर्णपुत्र नीरज चोप्रा पुन्हा एकदा स्पर्धात्मक मैदानात परतण्यास सज्ज झाला आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
युवा खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला खासदार क्रीडा महोत्सवाचा चौथा हंगाम यंदा अधिक दिमाखात पार पडणार आहे.
“खेलो नागपूर खेलो” या संकल्पनेवर आधारित, खासदार महोत्सवांतर्गत येत्या ३१ मे रोजी मॅरेथॉन व “रन नागपूर रन” या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय रँकिंग कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू Vinesh Phogat हिने भारतीय कुस्ती महासंघावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे.
पंजाबविरुद्धच्या थरारक सामन्यात दिल्ली संघाने शानदार विजय मिळवला असला, तरी संघाचा कर्णधार अक्षर पटेल याला मोठा फटका बसला आहे.
टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धा रंगात आली असून सुपर 8 फेरीतील समीकरणे आता अधिकच चुरशीची झाली आहेत. पहिल्याच सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला आणि उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला. मात्र त्यानंतर घडलेल्या दोन महत्त्वाच्या घडामोडींमुळे भारतीय संघाच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या.
२०२६ च्या टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करत मोठा अपसेट घडवून आणला. तब्बल १९ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशा प्रकारचा विजय मिळवत झिम्बाब्वेने इतिहासाची पुनरावृत्ती केली.
क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाचे औपचारिक आमंत्रण दिले. या भेटीमुळे अर्जुनच्या लग्नाच्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला आहे.
टीम इंडियाचा उदयोन्मुख क्रिकेटपटू रिंकू सिंह (Rinku Singh) यांचे फेसबुक खाते हॅक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत अलीगड पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली आहे.
प्रत्येक वर्षी ६ डिसेंबर या दिवशी आपण भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महान समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे महापरिनिर्वाण दिन साजरे करतो. या दिवशी १९५६ मध्ये डॉ. आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांचा विचार, त्यांच्या संघर्षाची ज्योत अजूनही भारतीय समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात उजळत आहे.
८ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक साक्षरता (Literacy) दिन म्हणून साजरा केला गेला. मानवी समाज सुसंस्कृत बनून समाजाचे शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांपासून अज्ञानी लोकांची होणारी पिळवणूक, फसवणूक, शोषण आदीपासून मुक्तता व्हावी.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.