कोतवाली (Kotwali) परिसरातील बुधवार बाजारजवळ बी-पार्क प्रकल्पाच्या बांधकामस्थळी शनिवारी सकाळी मोठा अपघात घडला. नागपूर महापालिकेच्या बी-पार्क प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या खोदकामादरम्यान पाइल अचानक घसरून दोन पोकलेन मशीनवर कोसळली. या घटनेत तीन कामगार जखमी झाले असून, प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
NMC takes action against absent sanitation workers | लक्ष्मीनगर झोनमधील वार्ड क्रमांक १६ मधील सोमलवाडा हजेरी स्टँडवर अनुपस्थित आढळलेल्या पाच स्वच्छता कर्मचाऱ्यांवर नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. याआधीही कामावर अनुपस्थित राहणाऱ्या ९६ स्वच्छता कर्मचाऱ्यांवर मनपाने कारवाई केली होती.
नागपूर पोलिसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत कामठी परिसरात एक भव्य अमली पदार्थविरोधी जनजागृती रॅलीचे (Anti drug awareness rally) आयोजन करण्यात आले. या रॅलीत नागपूरचे पालकमंत्री आणि पोलिस आयुक्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
२५ जून १९७५ रोजी देशात लागू झालेल्या आपत्कालाच्या (Emergency) ५० वर्षांनंतरही त्या काळातील आठवणी आजही ताज्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नागपूर महानगरतर्फे याच दिवशी, म्हणजेच येत्या २५ जून रोजी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
नागपूरमध्ये (Nagpur) अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टीतील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घर आणि मालकी हक्क देण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतला असून, त्याअंतर्गत ४२६ झोपडपट्टीधारकांना घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'प्रधानमंत्री सूर्यघर योजने' (PM Suryaghar scheme) अंतर्गत नागपूर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 33,641 घरांवर सौर पॅनल्स बसवले गेले आहेत. ही संख्या राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा सर्वाधिक आहे.
नागपूर जिल्ह्यातील भीलगाव खैरी (Bhilgaon Khairi) परिसरात मंगळवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. येथील ‘अंकित पल्प्स अॅन्ड बोर्ड्स’ या मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज तयार करणाऱ्या कंपनीच्या डी-ॲक्शन विभागात अचानक स्फोट झाला. या स्फोटात एक कामगाराचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
कोच्चीहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटला बॉम्बने (Bomb) उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर मंगळवारी सकाळी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने लँडिंग करण्यात आलं. विमानात एकूण १५७ प्रवासी व क्रू सदस्य होते.इंडिगोची फ्लाइट क्रमांक 6E 2706 सकाळी 9.20 वाजता कोच्चीहून दिल्लीसाठी रवाना झाली होती.
नागपूरच्या औद्योगिक नकाशावर आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उमटणार आहे. मॅक्स एरोस्पेस (Max Aerospace) अँड एव्हिएशन प्रा. लि. ही खासगी कंपनी राज्य सरकारच्या सहकार्याने नागपूरमध्ये ८ हजार कोटी रुपयांचा हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प उभारणार आहे.
पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत नागपूर महानगरपालिकेने (NMC) ८४ वर्षे जुन्या पिंपळवृक्षाचे सुरक्षितपणे स्थलांतर करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. महापालिकेच्या ‘ट्री ट्रान्सप्लांटर’ यंत्राच्या मदतीने हा दुर्मीळ आणि उल्लेखनीय उपक्रम पार पाडण्यात आला.
राज्यभरात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी (School ID scam) आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातून गुरुवारी करण्यात आलेल्या या अटकेमुळे प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत.
Accident in Nagpur Youth dies after falling under NMC garbage truck | शहरातील वाठोडा परिसरात शुक्रवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याच दुचाकीवर मागे बसलेली महिला आणि १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाले. तिघंही एका दुचाकीवरून जात असताना, डंपिंग यार्डजवळ मनपाच्या कचरा संकलन करणाऱ्या ट्रकची धडक बसली.
समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) पुन्हा एकदा अपघाताची गंभीर घटना घडली आहे. नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा या अपघातात मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी आणि दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत.
नागपूर शहरात सेक्सटॉर्शनचे (Sextortion) एक गंभीर प्रकरण उघडकीस आले असून, २५ वर्षीय तरुणाला जाळ्यात ओढून तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील २० वर्षीय सुंदरकुमार कुंदनकुमार सिंह या तरुणाला अटक केली आहे.
Massive explosion in pharma unit in Telangana ten workers killed | संगारेड्डी जिल्ह्यातील पशामिलाराम औद्योगिक क्षेत्रातील सिगाची इंडस्ट्रीज या औषधनिर्मिती कंपनीत सोमवारी सकाळी अचानक झालेल्या स्फोटात १० कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. अणुभट्टी युनिटमध्ये घडलेल्या या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
भारतात पहिल्यांदाच मोबाइल ॲपच्या माध्यमातून कुठूनही मतदान करण्याची सुविधा सुरू झाली असून, बिहार (Bihar) हे या नव्या उपक्रमात पुढाकार घेणारे पहिले राज्य ठरले आहे. राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी शुक्रवारी संध्याकाळी ही महत्त्वाची घोषणा केली.
दुचाकी वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी! केंद्र सरकार दुचाकी वाहनांवर टोल लावण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर विचार करत नाही, असे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी स्पष्ट केले आहे. काही माध्यमांतून पसरलेल्या अफवांवर त्यांनी थेट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (माजी ट्विटर) वर पोस्ट करत खंडन केले.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदाय भारताच्या बाजूने उभा राहिल्याचे दिसून येत आहे. FATF (Financial Action Task Force) ने या हल्ल्यासाठी आर्थिक पुरवठा झाल्याचे स्पष्ट संकेत देत पाकिस्तानला फटकारलं आहे.
इराणमधील (Iran) तणावपूर्ण परिस्थितीमुळे सुमारे १५०० भारतीय विद्यार्थी तिथे अडकले असून, त्यांचा आपल्या कुटुंबीयांशी संपर्क तुटला आहे. इस्रायलने इराणवर जोरदार हवाई हल्ले सुरू केल्याने देशात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. इंटरनेट सेवा बंद असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
भारताविरोधी कट्टर कारवायांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या जैश-ए-मोहम्मद (Jaish e Mohammed) या दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ नेता मौलाना अब्दुल अजीज इसार याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर गुप्तचर यंत्रणा आणि दहशतवादी नेटवर्कमध्ये खळबळ उडाली आहे.
भाजपला (BJP) लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. या पदासाठी रविंद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर प्रमुख भाजप नेते उपस्थित होते. उद्या संध्याकाळी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.
आझाद मैदानावरील भाषणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर तीव्र शब्दांत टीका करत जनसुरक्षा विधेयकाला विरोध दर्शवला आहे. हिंदी सक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता त्यांनी या नव्या विधेयकाला टार्गेट करत भाजप सरकारचा हेतू संशयास्पद असल्याचं स्पष्ट केलं.
Raj Thackeray announces victory rally on fifth July instead of march | मराठी भाषेवर लादल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात जनतेने उभारलेल्या आंदोलनानंतर अखेर राज्य सरकारने माघार घेतली आहे. त्रिभाषा सूत्रासंदर्भातील दोन्ही शासकीय आदेश रद्द करण्यात आले असून, त्याची घोषणा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मराठी (Marathi) भाषा आणि मराठी माणसाच्या प्रश्नावर कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम पवित्रा घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल काहीही असो, पहिली ते पाचवीत हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याचा कोणताही निर्णय मान्य केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने त्रिभाषा धोरणासंबंधी घेतलेला निर्णय अखेर मागे घेतला असून, यामागचं मुख्य कारण म्हणजे ठाकरे बंधूंची वाढती एकता आणि मराठी जनतेचा वाढता रोष, असं प्रतिपादन खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या मोर्च्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच, उत्तर भारतीय विकास सेनेने (North Indian Vikas Sena) मोठा दावा करत राजकीय वातावरण तापवलं आहे. "राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी महापौर उत्तर भारतीयच होणार," असा निर्धार सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी व्यक्त केला आहे.
Sushma Andhare attack on BJP over Hindi mandatory | मराठी भाषेच्या प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) पुन्हा एकदा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत मराठी अस्मितेसाठी दोन्ही पक्षांनी संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.
राज्यात शालेय शिक्षणामध्ये हिंदी सक्तीवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनीच डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा त्रिभाषा अहवाल स्वीकारून हिंदी सक्तीचे धोरण मंजूर केले होते.
राज्य सरकारच्या शाळांतील हिंदी सक्तीच्या निर्णयावरून वातावरण तापले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षप्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी या मुद्द्यावर संतुलित भूमिका मांडली आहे. पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती अयोग्य असल्याचं ते म्हणाले, मात्र देशातील अर्ध्याहून अधिक जनता हिंदीत संवाद साधते, हेही वास्तव आहे, असं ते स्पष्टपणे म्हणाले.
राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीने लादण्याच्या निर्णयाविरोधात जनआंदोलनाचे स्वरूप घेणाऱ्या लढ्याला आता नवे वळण मिळाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख व्यक्तिमत्वं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) या मुद्द्यावर एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.
लोकप्रिय मॉडेल, अभिनेत्री आणि २००२ मध्ये गाजलेल्या ‘कांटा लगा’ रिमिक्समुळे संपूर्ण देशात प्रसिद्धीच्या झोतात आलेली शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) हिचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. अवघ्या ४२व्या वर्षी तिनं या जगाचा निरोप घेतल्याने बॉलिवूड आणि तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
राज्यात शाळांमधील हिंदी सक्तीच्या निर्णयावरून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिने एक वेगळीच भूमिका घेतली आहे. तिने मराठी भाषेतील एक विनोदी रील शेअर करून भाषेविषयीचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
कॉमेडीच्या दुनियेत आपलं अढळ स्थान निर्माण करणारा कपिल शर्मा (Kapil Sharma) ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नव्या पर्वामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. पहिल्याच भागात सलमान खानची उपस्थिती, नवज्योत सिंग सिद्धूंचं पुनरागमन आणि नेहमीसारखाच हास्याचा धमाका यामुळे शोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
भारताच्या सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शोंपैकी एक असलेला ‘बिग बॉस’ (Bigg Boss) आता आपल्या 19व्या पर्वासाठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. सलमान खानच्या करिष्म्याच्या साथीने या शोने अनेकदा टीआरपीच्या यादीत आघाडी घेतली आहे. यंदाचा हंगामही तितकाच रोचक ठरणार असल्याचं संकेत मिळत आहेत.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे. वेगवेगळ्या चकमकीत २४ नक्षलवादी मारले गेले. यादरम्यान एक सैनिक शहीद झाला आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
सोन्याच्या (Gold) दरात आज पुन्हा एकदा झपाट्याने वाढ झाली आहे. शेअर बाजारातील अस्थिरता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मागणीमुळे सोन्याच्या किमतीत तब्बल 540 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. चांदीही या तेजीपासून दूर राहिली नाही. तिच्या दरात 595 रुपयांनी वाढ झाल्याने, बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंनी उडी घेतली आहे
सामान्य जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये ०.५० टक्क्यांची कपात करत ही दर आता ५.५०% वर आणली आहे. त्यामुळे लवकरच गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या EMI मध्ये घट होण्याची शक्यता आहे.
IMF predicts India is economic superpowerit will overtake even Japan | जगभरात आर्थिक अनिश्चिततेचं वातावरण असतानाही भारताने स्थिरतेची आणि प्रगतीची दिशा पकडली आहे. रिझर्व्ह बँकेच्या एप्रिल महिन्यातील “अर्थव्यवस्थेची स्थिती” या अहवालात देशाच्या आर्थिक वाढीच्या प्रवासाला सकारात्मक पोषक परिस्थिती असल्याचं चित्र उभं राहिलं आहे.
मागील काही महिन्यांमध्ये आकाशाला भिडलेला सोन्याचा (Gold) दर आता खाली येऊ लागला आहे. एप्रिलमध्ये १० ग्रॅमसाठी जवळपास १ लाख रुपये गाठणाऱ्या सोन्याच्या किमतीत सध्या तब्बल १० टक्क्यांची घट झाली आहे. सध्या १० ग्रॅमसाठी सोने सुमारे ९२,००० रुपयांवर आले असून, लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर ही सामान्य ग्राहकांसाठी खरेदीची चांगली संधी ठरू शकते.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.
रमजानच्या (Ramadan) पवित्र महिन्याच्या आगमनाचा उत्साह लोकांमध्ये दिसून येतो. शुक्रवारी चंद्र दिसला नाही, त्यानंतर उलेमांनी घोषणा केली की रमजान महिन्याचा पहिला उपवास रविवार, २ मार्च रोजी असेल. यासाठी रमजान महिन्यातील पहिली सेहरी रविवारी सकाळी फजरच्या अजानपूर्वी केली जाईल.
Record breaking darshan of devotees in Ayodhya | नुकतेच प्रयागराजमध्ये भव्य-दिव्या महाकुंभ मेळ्याचा समारोप झाला. महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जाऊन राम दर्शन घेत होते. यामुळे अयोध्येतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.सुमारे लाखो भाविक दररोज राम दर्शन घेत आहेत.
Chaturmasya Kartik Festival from 10 November | समर्थ सद्गुरू श्री सीताराम महाराज दत्त दरबारतर्फे 10 ते 13 नोव्हेंबर असे सलग चार दिवस चातुर्मास्य कार्तिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चातुर्मासातील अखंड श्रीगुरुचरित्र सप्ताहनुष्ठान समाप्ती, तसेच कार्तिकोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
IPL 2025 चा अंतिम सामना इतिहासात कोरला गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) ने अखेर आयपीएलचा चषक आपल्या नावावर केला. पंजाब किंग्जवर ६ धावांनी मिळवलेल्या विजयाने RCB ने तब्बल १८ वर्षांची प्रतीक्षा संपवली. पण या विजयाचा सगळ्यात भावनिक आणि अविस्मरणीय क्षण ठरला तो विराट कोहलीचा आनंदाश्रूंनी भरलेला सेलिब्रेशन.
आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला अवघ्या काही धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या पराभवाने फक्त संघाचंच नाही, तर टीमच्या सहमालकीण प्रिती झिंटाच्या (Preity Zinta) मनातही असह्य वेदना उमटल्या. सामन्यानंतरच्या क्षणी प्रिती झिंटाच्या डोळ्यांत आलेले अश्रू संपूर्ण स्टेडियम आणि लाखो चाहत्यांच्या मनाला स्पर्शून गेले.
भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे IPL (IPL)2025 हंगामाचे सामने स्थगित करण्यात आले होते. मात्र आता दोन्ही देशांमध्ये युद्धविराम जाहीर झाल्याने स्पर्धा पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL 2025 च्या हंगामाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला ‘ISIS कश्मीर’ या दहशतवादी संघटनेने थेट जीवे मारण्याची धमकी दिली असून, यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही धमकी मिळाल्याचं समोर आलं आहे.
भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि मराठमोळा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) याने (8 एप्रिल) अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधवने भाजपाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) व रीलस्टार धनश्री वर्मा यांचा पाच वर्षाचा संसार अखेर मोडला आहे.दोघांनीही आज घटस्फोटाची अधिकृत माहिती सोशल मीडियावर दिली. धनाश्री व युजवेंद्र यांच्या घटस्फोटामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Inter college handball competition | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग व ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन (महिला व पुरूष) हँडबॉल स्पर्धेचे शिव छत्रपती पुरस्कार विजेते मिलिंद माकडे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची खेळाडू मंजिरी तांबे (Manjiri Tambe) हिने जम्मू विद्यापीठ जम्मू येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत फाईल या वैयक्तिक गटात कांस्यपदक प्राप्त केले आहे.
BCCI Abolishes Impact Player Rule | आयपीएलच्या शेवटच्या हंगामात इम्पॅक्ट प्लेयर अनेक वादांचा विषय ठरला होता. अनेक बड्या खेळाडूंनी या नियमाविरोधात विधाने केली. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या नियमाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धांमधून इम्पॅक्ट प्लेयर हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
Will the Indian team make history | भारताच युवा क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असून तिथे दोन्ही देशात पाच कसोटींची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यास २० जून पासून सुरुवातही झाली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी करत ३०० च्या वर धावा काढल्या त्या ही फक्त तीन गडी गमावून. पहिल्याच दिवशी भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि नवनियुक्त कर्णधार शुभमन गिल यांनी शतके झळकावली. उपकर्णधार ऋषभ पंतने अर्धशतक झळकावले.
१ मे हा दिवस जागतिक कामगार दिन (World Labor Day) म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगभरातील कामगारांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. केवळ भारतातच नाही तर जगभरातील ८० हुन अधिक देशात या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते.
सध्या मुलांमध्ये स्टोन आणि कॅन्सर (Cancer) होण्याचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सर सारख्या जीवघेण्या आणि असाध्य आजाराचे प्रमाण मुलांमध्ये वाढण्याचे कारण शोधण्यासाठी संशोधकांनी संशोधन केले. या संशोधनाचा अहवाल बमेडमध्ये प्रकाशित करण्यात आला.