नागपूर महानगरपालिकेच्या अखत्यारित शहरातील कन्स्ट्रक्शन व डिमॉलिश (C&D) कचरा संकलन व प्रक्रिया करण्याचे कंत्राट राम नाईकी या खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे. शहराच्या विविध भागांतून जमा होणारा C&D कचरा भांडेवाडी (Bhandewadi) येथील प्रकल्पात प्रक्रिया करून ४० मिमी, २० मिमी, १० मिमी गिट्टी, रेती व माती स्वरूपात बायप्रॉडक्ट तयार करण्यात येतो. या कामासाठी महानगरपालिका कंपनीला प्रतिटन ४५० रुपये इतका मोबदला देते.
नागपूर महानगरपालिकेतील (Nagpur Municipal Corporation) सत्तास्थापनेबाबत सुरू असलेल्या चर्चांना जवळपास पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने महापालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित केली असून, अधिकृत घोषणा २ फेब्रुवारी रोजी अपेक्षित आहे.
नागपूर महानगरपालिकेतील (Nagpur Municipal Corporation) महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीबाबत सुरू असलेल्या सर्व तर्कवितर्कांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
आदिवासी व ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था अधिक व्यापक आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करणार असून, आरोग्य, शिक्षण व आर्थिक सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले.
माघ शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश जयंतीनिमित्त (Ganesh Jayanti) नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळत आहे. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि झगमगती विद्युत रोषणाईने सजवण्यात आले असून, गुरुवार (२२ जानेवारी २०२६) पहाटेपासूनच विघ्नहर्त्या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
नागपुरात बंदी असलेल्या नायलॉन (Nylon) मांजाची सर्रास विक्री आणि वापर सुरू असताना, या प्रकरणी सरकारी यंत्रणांनी दिलेल्या माहितीकडे बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने गंभीरपणे पाहिले आहे.
आजचे युग पूर्णपणे डिजिटल (Digital) झाले असून, शिक्षण, खेळ आणि करमणुकीच्या सुविधा मुलांना सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मुलांना पूर्वीप्रमाणे जास्त मेहनत किंवा खोल एकाग्रतेची गरज भासत नाही. याचा थेट परिणाम त्यांच्या एकाग्रता, स्मरणशक्ती आणि विचारक्षमतेवर होताना दिसत आहे.
राज्यात 9 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर घेण्यात आलेल्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी (Municipal Election) आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदारांनी हळूहळू हजेरी लावण्यास सुरुवात केली.
राज्यभरात महापालिका निवडणुकांसाठी मतदानाचा उत्साह शिगेला असतानाच नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३१ मध्ये काँग्रेस (Congress) उमेदवार शिवानी चौधरी यांच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली असून, त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
प्रभाग क्रमांक २८ मधील आराधना नगर परिसरातील जीआरके कॉन्व्हेंट येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेला सुरुवातीला अडथळा निर्माण झाला. सकाळी मतदान सुरू होण्याच्या वेळेतच मशीनमध्ये दोष आढळून आल्याने मतदारांना काही काळ प्रतीक्षा करावी लागली.
शहरात वन विभागाने अवैध सागवान तस्करीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. मालगाव-कापसी (Malgaon-Kapsi) परिसरातून अंदाजे ४० लाख रुपयांचा सागवान जप्त करण्यात आला. या कारवाईनंतर अवैध तस्करांमध्ये दहशत पसरली असून, वन विभागाने आरोपींची शोधाशोध सुरू केली आहे.
पोलिसांची खाकी वर्दी हा समाजात सुरक्षा आणि न्यायाचा प्रतीक मानला जातो. मात्र, अहिल्यानगर (Ahilyanagar) पोलिस दलातील एका हवालदाराने या वर्दीला काळा डाग लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
वाघोळी (Wagholi) भागातून एक धक्कादायक आणि मनाला हादरवून टाकणारा प्रकार समोर आला आहे. एका आईने आपल्या ११ वर्षांच्या मुलाचा गळाफाडून खून केल्याचा संशय आहे. याच वेळी तिने १३ वर्षांच्या मुलीवरही गंभीर हल्ला केला, मात्र मुलगी वाचली असून सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. तिची प्रकृती गंभीर आहे पण स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
मेहेगाव (Mehegaon) येथे घडलेल्या निर्घृण खून प्रकरणात तुमसर पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या २४ तासांत गुन्हा उघडकीस आणत तिघा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन तुमसर येथे अप.क्र. 33/2026 नुसार भा.न्या.सं. कलम 103(1) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी 2026) संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026 (Union Budget 2026)-27 सादर केला. सलग नवव्यांदा अर्थसंकल्प मांडताना त्यांनी गरीबी निर्मूलन, रोजगारनिर्मिती, गुंतवणूक वाढ आणि ‘विकसित भारत’ या उद्दिष्टांवर सरकारची ठाम भूमिका स्पष्ट केली. जीएसटी सुलभीकरण, पायाभूत सुविधा, आरोग्य-शिक्षण, महिला विकास आणि पर्यटन क्षेत्राला विशेष चालना देण्यावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) (UGC) लागू केलेल्या नव्या नियमांवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत त्यांची अंमलबजावणी तात्पुरती थांबवली आहे.
मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांचे निधन झाल्याची माहिती समोर येताच राज्यातील राजकारण हादरले असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे. मंगळवारी सकाळी आलेल्या या धक्कादायक वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला.
बांगलादेशमधील (Bangladesh) एका विशेष न्यायालयाने माजी पंतप्रधान आणि पदच्युत नेत्या शेख हसीना यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवत एकूण १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी निवास प्रकल्पाशी संबंधित भूखंड वाटप घोटाळ्याप्रकरणी दाखल दोन स्वतंत्र प्रकरणांत हा निकाल देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाशी संबंधित घटनेची चर्चा सुरू असतानाच, आंतरराष्ट्रीय स्तरावरून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोलंबियामध्ये (Colombia) लहान प्रवासी विमान कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Trump) यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर एक फोटो शेअर करत स्वतःला थेट “व्हेनेझुएलाचा कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष” असल्याचे म्हटल्याने आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) महापौरपदाची सूत्रे आता भाजपच्या नगरसेविका मंजूषा नागपुरे यांच्या हाती जाणार असून, शहराच्या प्रशासनात महिलांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. महापौरपदासाठी एकमेव उमेदवार असल्याने ही निवडणूक बिनविरोध होत असून अधिकृत शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने (BJP) वर्चस्व सिद्ध करत 29 पैकी तब्बल 27 महापालिकांवर सत्ता मिळवली आहे. मात्र, सत्ताधारी पक्ष एकत्र असतानाही अनेक ठिकाणी निवडणुकीदरम्यान परस्परांवर टीकेची झोड उठल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे रणसंग्राम रंगत असताना, राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. ७ तारखेला होणारे मतदान आणि ९ तारखेला जाहीर होणाऱ्या निकालांच्या पार्श्वभूमीवर तिकीट वाटपावरून अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे. अशातच कोकणात शिंदे (Shinde) गटाला धक्का देणारी मोठी कारवाई समोर आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनाबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या संपूर्ण घटनेबाबत राज्यातील सुमारे ८० टक्के लोकांच्या मनात शंका असल्याचा दावा करत, केवळ सीआयडी चौकशी पुरेशी ठरणार नाही, असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
महापालिका निवडणूक निकालानंतर अचानक संपर्काबाहेर गेलेल्या ठाकरे (Thackeray) गटाच्या नगरसेवकांमुळे निर्माण झालेल्या संभ्रमाला आता हळूहळू उत्तर मिळू लागले आहे. या चार नगरसेवकांपैकी एक असलेले मधुर म्हात्रे तब्बल १६ दिवसांनंतर आपल्या घरी परतले असून, त्यांच्या आगमनाने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
राज्याच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय जोडला. या पदावर निवड झालेल्या त्या राज्यातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.
ठाणे महानगरपालिकेतील (Thane Municipal Corporation) महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक कोणताही संघर्ष न होता बिनविरोध पार पडली. शिवसेना (शिंदे गट) यांच्या शर्मिला पिंपळोलकर या महापौरपदी, तर भाजपच्या कृष्णा पाटील या उपमहापौरपदी विराजमान होणार आहेत. येत्या ३ फेब्रुवारी रोजी या निवडीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.
सुनेत्रा पवार यांच्या नावाची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरू असताना शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर कडवी टीका केली आहे. “महाराष्ट्र अजूनही अजितदादांच्या निधनाच्या दुःखातून सावरलेला नाही. अशा वेळी या विषयावर राजकीय प्रतिक्रिया देणं योग्य नाही,” असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
मुंबई : भीषण विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे बारामती आणि मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे.
ठाम भूमिका, शिस्तप्रिय कार्यशैली आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) यांनी प्रचारकी चित्रपटांबाबत आपली भूमिका पुन्हा एकदा ठामपणे मांडली आहे. “मी कधीही प्रोपगंडा चित्रपटांचा भाग होणार नाही,” असं स्पष्ट विधान त्यांनी केलं आहे. केरळमधील तिरुवअनंतपुरम येथे झालेल्या ‘मातृभूमी इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ लेटर्स 2026’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर बिग बॉस मराठी सिझन ५ चे विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) भावूक झाले आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भावपूर्ण पोस्ट शेअर करत अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सनी देओल यांच्या मुख्य भूमिकेतील ‘बॉर्डर 2’ (Border 2) या चित्रपटाने केवळ पाच दिवसांतच बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. निर्मात्यांनी बुधवारी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
चित्रपट ‘बॉर्डर 2’ (Border 2) बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे. चित्रपटाने रिलीजच्या चौथ्या दिवशी, म्हणजेच गणतंत्र दिनी, तब्बल 63.59 कोटी रुपयांची कमाई केली असून, निर्मात्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या जोरदार चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. विशेष नक्षलविरोधी मोहिमेत सहभागी असलेले DRG चे पथक बेज्जी–चिंतागुफा परिसरातील दुर्गम जंगल पट्ट्यात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढवला.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) सरकार खाजगी कंपन्यांमधील कामगारांसाठी महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. राज्यात कामाचे तास सध्याच्या ९ तासांऐवजी १० तास करण्याचा विचार सुरु असून, ही माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून, आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. या अहवालातून देशाच्या अर्थव्यवस्थेची (Economy) सद्यस्थिती, आगामी वर्षांचा अंदाज आणि संभाव्य आर्थिक आव्हानांचा आढावा घेण्यात आला आहे.
सराफा बाजारात आज सोन्या (Gold)-चांदीच्या दरांनी सर्व जुने विक्रम मोडीत काढत नवे उच्चांक गाठले आहेत. एका दिवसात झालेल्या जोरदार दरवाढीमुळे गुंतवणूकदारांसह दागिने खरेदी करणाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे. आजच्या व्यवहारात चांदीच्या दरात तब्बल १४,४७५ रुपयांची उसळी नोंदवली गेली, तर सोन्याच्या किमतीत २,८८३ रुपयांची भक्कम वाढ झाली आहे.
चांदीच्या (Silver) दरांनी पुन्हा एकदा जोरदार उसळी घेतली असून सराफा बाजारात तेजीचे वातावरण कायम आहे. देशभरातील बाजारात चांदीचे भाव सातत्याने नवे विक्रम नोंदवत आहेत. शनिवारी सकाळी नागपूर सराफा बाजारात चांदीचा दर थेट २ लाख ५३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचला.
सोने (Gold) आणि चांदीच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली वाढ आता विक्रमी टप्प्यावर पोहोचली आहे. जळगावच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी दरवाढ कायम राहिल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.
ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग (Bhimashankar Jyotirlinga) मंदिर येत्या तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
आज, २१ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार), दिवाळीचा (Diwali) सर्वात उत्साहवर्धक आणि शुभ दिवस — लक्ष्मीपूजनाचा दिवस साजरा केला जात आहे. हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावास्येच्या या पवित्र दिवशी धन, समृद्धी आणि आनंदाची आराधना केली जाते. देशभरात आज संध्याकाळी माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि कुबेर यांच्या पूजनाने घराघरांत मंगल वातावरण निर्माण होणार आहे.
हिंदू धर्मातील एक प्रमुख सण, दसरा (Dussehra), दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपासना व भक्तीनंतर हा दिवस विशेष महत्त्वाचा ठरतो. देशभरात मंदिरे, घरे आणि सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) संन्यास घेण्याचा विचार मनात आला असला तरी, तो अजून घ्यायचा नाही असं स्पष्ट केलं आहे. राहुलने सांगितलं की संन्यासासाठी ‘अजून थोडा वेळ बाकी आहे’ आणि तो वेळ आल्यावरही निर्णय घ्यायला उशीर करणार नाही.
भारत (India) आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज (२१ जानेवारी) नागपूरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) स्टेडियमवर खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेत २–१ असा अनपेक्षित पराभव स्वीकारल्यानंतर, टी-२० मालिकेत जोरदार पुनरागमन करण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.
भारतीय बॅडमिंटनला जागतिक व्यासपीठावर ओळख मिळवून देणारी ऑलिम्पिक पदकविजेती सायना नेहवाल (Saina Nehwal) हिने आपल्या कारकिर्दीला अधिकृत पूर्णविराम दिला आहे. सततच्या गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे आता सर्वोच्च पातळीवरील स्पर्धात्मक खेळ शक्य नसल्याने तिने बॅडमिंटनमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होत असून पहिला सामना वडोदरात (Vadodara) खेळवला जाणार आहे. हा सामना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण अनेक वर्षांनंतर भारतीय पुरुष संघ वडोदरात आंतरराष्ट्रीय सामना खेळत असून तोही एका अत्याधुनिक नव्या स्टेडियममध्ये होणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकप्तान स्मृती (Smriti) मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छलयांचे लग्न रद्द झाले आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या लग्नाची तारीख ७ डिसेंबर होती, पण स्मृतीने या दिवशी इंस्टाग्रामवरून लग्न रद्द असल्याची माहिती दिली.
फुटबॉल हा जगातील सर्वात आवडता खेळ मानला जातो. पुढील वर्षी होणाऱ्या फिफा विश्वचषकात (FIFA World Cup) एकूण 48 संघ हिस्सा घेणार आहेत, जे यापूर्वी कधीही झालेले नव्हते. या स्पर्धेची मेजबानी संयुक्तपणे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको करणार आहेत.
आयसीसी महिला विश्वचषक जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) यांनी आपल्या अधिकृत निवासस्थानी सत्कार केला. बुधवारी सायंकाळी ६ वाजता ७ लोक कल्याण मार्ग येथे झालेल्या या विशेष भेटीत मोदींनी संघातील प्रत्येक खेळाडूशी संवाद साधत त्यांचे मनापासून अभिनंदन केले.
महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल असा २०२५ चा विश्वविजय भारतीय महिलांनी आपल्या जिद्दीने आणि एकतेने साध्य केला आहे. या ऐतिहासिक पराक्रमाचा गौरव वाढवताना बीसीसीआयने (BCCI) तब्बल ५१ कोटी रुपयांचे पारितोषिक घोषित करत महिला क्रिकेटच्या गौरवकथेला नवा अध्याय जोडला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian women Cricket team) रविवारी इतिहास घडवत आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकावर आपले नाव कोरले. दमदार खेळ आणि अदम्य जिद्दीच्या जोरावर ‘वुमन इन ब्लू’ने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावले. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्व क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहिला.
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (२८ सप्टेंबर) आशिया कप (Asia Cup) २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला ५ विकेट्सने हरवून ट्रॉफी आपल्या नावावर केली. या सामन्याने भारतासाठी विशेष महत्त्व ठेवले कारण भारताने या स्पर्धेत पाकिस्तानवर सलग तीन विजय मिळवले – साखळी फेरी, सुपर फोर आणि अंतिम सामन्यात.
प्रत्येक वर्षी ६ डिसेंबर या दिवशी आपण भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महान समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे महापरिनिर्वाण दिन साजरे करतो. या दिवशी १९५६ मध्ये डॉ. आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांचा विचार, त्यांच्या संघर्षाची ज्योत अजूनही भारतीय समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात उजळत आहे.
८ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक साक्षरता (Literacy) दिन म्हणून साजरा केला गेला. मानवी समाज सुसंस्कृत बनून समाजाचे शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांपासून अज्ञानी लोकांची होणारी पिळवणूक, फसवणूक, शोषण आदीपासून मुक्तता व्हावी.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.