पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत नागपूर महानगरपालिकेने (NMC) ८४ वर्षे जुन्या पिंपळवृक्षाचे सुरक्षितपणे स्थलांतर करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. महापालिकेच्या ‘ट्री ट्रान्सप्लांटर’ यंत्राच्या मदतीने हा दुर्मीळ आणि उल्लेखनीय उपक्रम पार पाडण्यात आला.
शहरात ट्राफिक नियम तोडणाऱ्यांसाठी आता चुकांची माफी नाही. नागपूर शहरात आता AI तंत्रज्ञानावर आधारित इंटिग्रेटेड इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम (IITMS) बसवण्यात येत आहे. या प्रणालीद्वारे नियम मोडताच लगेच तुमच्या मोबाईलवर चालान पोहोचणार आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवरून कारगिल मार्गे पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या सुनीता जामगडे (Sunita Jamgade) प्रकरणात एक नवा वळण आलं आहे. कारगिल पोलिसांनी तिच्याविरोधात विशेष कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून तिला कारगिल येथे तपासासाठी नेण्याचे नियोजन सुरू होते.
नागपूर शहरातील विद्यार्थ्यांना साहसिक खेळांचा अनुभव देण्यासाठी आणि त्यांच्यात धाडसाची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने (NMC) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सूर्यनगर येथील लता मंगेशकर उद्यानात तब्बल ८ कोटी ७९ लाख १६ हजार ६९४ रुपयांच्या खर्चाने ‘अॅडव्हेंचर पार्क’ उभारण्यात येणार आहे.
नागपूर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत नागपूर महानगरपालिकेने वाठोडा परिसरात आधुनिक श्वान आश्रय (Modern dog shelter) केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ६ कोटी ८९ लाख ६७ हजार २८१ रुपयांचा खर्च मान्य करण्यात आला आहे.
राज्यात कोरोना (Corona) संसर्गाचा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. मंगळवारी २४ तासांमध्ये ८६ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, एकूण चार जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे, ज्यांच्या मृत्यूला इतर गंभीर आजारही कारणीभूत ठरले आहेत.
राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विदर्भासह अनेक भागांत शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे ठोस पावलं उचलली आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, "शेतकऱ्यांना सुरुवातीला १० हजार रुपयांचे तात्पुरते अनुदान देण्यात येणार आहे.
येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी (Dr Abhijit Chaudhary) यांनी सर्व संबंधित विभागप्रमुखांना मानसूनपूर्व कामांची पूर्तता तातडीने आणि प्रभावीपणे करण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी आयोजित आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) येत्या २५ मे रोजी नागपूरच्या दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या उपस्थितीत शहरात काही महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर प्रशासनाने तयारीला गती दिली आहे.
नागपूरातील नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकाचा (Itwari Railway Station) पुनर्विकास पूर्णत्वास गेला असून, या नव्या रूपातील स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुरुवारी पार पडले. या कार्यक्रमात त्यांनी गोंदिया जंक्शनच्या सुधारित स्वरूपाचाही लोकार्पण केला.
शहरातील मायो रुग्णालयाच्या (Mayo Hospital) ओपीडीजवळील सार्वजनिक शौचालयात मंगळवारी (१० जून) सायंकाळी साडेआठच्या सुमारास एका मध्यमवयीन पुरुषाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
माजी आमदार बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले असून, या गुन्ह्यामागचा कथित मास्टरमाइंड जीशान अख्तर ऊर्फ जस्सी पुरेवाल याला अखेर कॅनडातील सरे पोलिसांनी अटक केली आहे.
शहरातील अवैध हुक्का पार्लरवर कडक कारवाई करत नागपूर पोलिसांनी 'ऑपरेशन थंडर' (Operation Thunder) अंतर्गत शंकरनगरमधील निंबस लाउंज हुक्का पार्लरवर मध्यरात्री छापा टाकला. या धडक कारवाईत पार्लरच्या आत संभ्रांत घरातील काही तरुणींना हुक्का ओढताना रंगेहाथ पकडले गेले, तर पार्लरचा चालक समीर शेख याच्याविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या मुंब्रा (Mumbra) आणि दिवा स्थानकांदरम्यान सोमवारी (९ जून) सकाळी एक धक्कादायक रेल्वे अपघात घडला. धावत्या लोकलमधून आठ प्रवासी खाली पडले, ज्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आणि इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात गदारोळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
संपूर्ण देश हादरवून टाकणाऱ्या अहमदाबाद विमान अपघातातून काहींच्या जीव वाचल्याच्या कहाण्या मन सुन्न करणाऱ्या आहेत. अशाच एका कहाणीची नायिका ठरली आहे अकोल्याची ऐश्वर्या (Aishwarya) तोष्णीवाल. चटकन प्रसंगावधान राखत तिने मृत्यूच्या जबड्यातून सुटका केली, ही कथा थरारक आहे, पण त्याहून अधिक प्रेरणादायी आहे.
मी उडी मारली नाही... मी सीटसह बाहेर फेकलो गेलो, हे शब्द आहेत अहमदाबाद विमान दुर्घटनेत एकमेव बचावलेले प्रवासी रमेश विश्वकुमार (Ramesh Vishwakumar) यांचे. काल मेघानी परिसरात झालेल्या इतिहासातील सर्वात भीषण विमान अपघातात २४१ प्रवासी आणि २४ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण या भीषण अपघातातून फक्त रमेश विश्वकुमारचाच जीव वाचला.
एअर इंडियाच्या (Air India) एका विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यामुळे, १३ ऑक्टोबर रोजी थायलंडमधून दिल्लीकडे येणाऱ्या विमानाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये परत थायलंडमध्ये उतरवावे लागले. या धमकीमुळे विमानातील १५६ प्रवाशांचे जीवन धोक्यात आले होते, परंतु सर्व प्रवासी सुखरुप आहेत. धमकी देणाऱ्याचे अद्याप कोणतेही ठोस निर्देश समोर आलेले नाहीत.
भारताविरोधी कट्टर कारवायांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या जैश-ए-मोहम्मद (Jaish e Mohammed) या दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ नेता मौलाना अब्दुल अजीज इसार याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर गुप्तचर यंत्रणा आणि दहशतवादी नेटवर्कमध्ये खळबळ उडाली आहे.
सोमवारी रात्री उशिरा आलेल्या सौम्य भूकंपामुळे (Earthquake) संपूर्ण पाकिस्तान हादरला, मात्र सर्वात मोठा परिणाम झाला तो कराचीच्या मालीर जिल्हा कारागृहात. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवताच तुरुंगात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अनेक कैदी आधीच त्यांच्या बॅरेकबाहेर होते आणि गोंधळाचा फायदा घेत तब्बल २१६ कैद्यांनी तुरुंगातून पलायन केलं.
Ukrainian drone attack as Indian MPs plane lands in Moscow | पाकिस्तानमधील वाढत्या दहशतवादाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्दाफाश करण्यासाठी भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ विविध राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहे. मात्र, या शिष्टमंडळाचा रशिया दौरा सुरू होत असतानाच एक अत्यंत धक्कादायक घटना घडली.
NCP SP claims hundered seats in NMC syas Anil Deshmukh | नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी हालचालींना वेग दिला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)नेही आपली रणनिती स्पष्ट केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पक्ष १०० जागांवर उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात नवे रंग भरू लागले असतानाच गुरुवारी सकाळी एक अप्रत्याशित घटना घडली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एण्ड हॉटेलमध्ये अचानक बैठक झाली. जवळपास एका तासाहून अधिक काळ ही चर्चा रंगली, मात्र या भेटीचा कोणताही अधिकृत तपशील समोर आलेला नाही.
Vijay Wadettiwar slams BJP over Operation Sindoor | राज्यात 'ऑपरेशन सिंदूर'वरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या मोहिमेची तुलना "कॉम्प्युटर गेम"शी केल्यानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका करत थेट पाकिस्तानशी संबंध जोडले. यावर आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरातून भाजपला कडवे उत्तर दिले आहे.
महायुतीच्या सत्तेच्या पार्श्वभूमीवर राज्यात विरोधी पक्षांतील नेत्यांचे भाजपकडे वळण्याचे प्रमाण वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे कट्टर विरोधक सत्यजितसिंह पाटणकर (Satyajitsinh Patankar) यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
"मुंबईत सर्वाधिक झाडांची कत्तल ही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पर्यावरण मंत्री असताना झाली," असा गंभीर आरोप भाजपचे प्रवक्ते आशिष शेलार यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, ठाकरे यांनी प्रत्येक वर्षी ६ ते ७ हजार झाडं तोडून विकासकांना फायदा मिळवून दिला, त्यामुळे त्यांना पर्यावरणाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) (Shivsena UBT) गटाला अमरावती जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. शिवसेना (उबाठा) चे अमरावती जिल्हाध्यक्ष सुनील खराटे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला.
भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. धाराशिव येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून महायुतीत खळबळ उडाली असून, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
Two senior leaders of NCP SP join BJP | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चा २६ वा वर्धापन दिन पुण्यात मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच पक्षासाठी अडचणीत टाकणाऱ्या घडामोडी समोर आल्या आहेत. सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील दोन बड्या नेत्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करून शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमात एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपल्या पदावरून मुक्त होण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली. त्यांच्या या घोषणेमुळे सभागृहात क्षणभर खळबळ उडाली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या २६व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग मिळाला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपल्या पदातून मुक्त व्हावं, अशी इच्छा व्यक्त करून साऱ्यांचे लक्ष वेधले. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली – “जयंत पाटील यांनी राजीनामा दिला नाही, तसेच त्यांनी कोणतेही औपचारिक पत्र सादर केलेले नाही.”
बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे माजी पती संजय कपूर (Sanjay Kapoor) यांचं वयाच्या ५३व्या वर्षी अचानक निधन झालं आहे. युकेमध्ये पोलो खेळत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि काही क्षणांतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कपूर आणि सचदेव कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या AI-171 या विमानाचा अहमदाबादजवळ (Ahmedabad) झालेला अपघात संपूर्ण देशाला हादरवून गेला आहे. या दुर्घटनेत विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले आणि प्रचंड स्फोट झाला. विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. या अपघातानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.
आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्याच्या कामनेने आणि जन्मोजन्मी हाच जीवनसाथी मिळावा यासाठी वटपौर्णिमेचा सण अनेक स्त्रिया भक्तिभावाने साजरा करतात. अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हिनेसुद्धा हा सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा करत आपल्या पतीसाठी प्रार्थना केली.
मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना त्यांच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल 'पद्मश्री' या राष्ट्रपदकाने गौरविण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे. वेगवेगळ्या चकमकीत २४ नक्षलवादी मारले गेले. यादरम्यान एक सैनिक शहीद झाला आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
सामान्य जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये ०.५० टक्क्यांची कपात करत ही दर आता ५.५०% वर आणली आहे. त्यामुळे लवकरच गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या EMI मध्ये घट होण्याची शक्यता आहे.
IMF predicts India is economic superpowerit will overtake even Japan | जगभरात आर्थिक अनिश्चिततेचं वातावरण असतानाही भारताने स्थिरतेची आणि प्रगतीची दिशा पकडली आहे. रिझर्व्ह बँकेच्या एप्रिल महिन्यातील “अर्थव्यवस्थेची स्थिती” या अहवालात देशाच्या आर्थिक वाढीच्या प्रवासाला सकारात्मक पोषक परिस्थिती असल्याचं चित्र उभं राहिलं आहे.
मागील काही महिन्यांमध्ये आकाशाला भिडलेला सोन्याचा (Gold) दर आता खाली येऊ लागला आहे. एप्रिलमध्ये १० ग्रॅमसाठी जवळपास १ लाख रुपये गाठणाऱ्या सोन्याच्या किमतीत सध्या तब्बल १० टक्क्यांची घट झाली आहे. सध्या १० ग्रॅमसाठी सोने सुमारे ९२,००० रुपयांवर आले असून, लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर ही सामान्य ग्राहकांसाठी खरेदीची चांगली संधी ठरू शकते.
सोन्याचे (Gold) दर लवकरच मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय सुरेश केडिया यांच्या म्हणण्यानुसार, आगामी चार ते सहा महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात १९ हजार रुपयांची घसरण होण्याची शक्यता आहे.
रमजानच्या (Ramadan) पवित्र महिन्याच्या आगमनाचा उत्साह लोकांमध्ये दिसून येतो. शुक्रवारी चंद्र दिसला नाही, त्यानंतर उलेमांनी घोषणा केली की रमजान महिन्याचा पहिला उपवास रविवार, २ मार्च रोजी असेल. यासाठी रमजान महिन्यातील पहिली सेहरी रविवारी सकाळी फजरच्या अजानपूर्वी केली जाईल.
Record breaking darshan of devotees in Ayodhya | नुकतेच प्रयागराजमध्ये भव्य-दिव्या महाकुंभ मेळ्याचा समारोप झाला. महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जाऊन राम दर्शन घेत होते. यामुळे अयोध्येतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.सुमारे लाखो भाविक दररोज राम दर्शन घेत आहेत.
Chaturmasya Kartik Festival from 10 November | समर्थ सद्गुरू श्री सीताराम महाराज दत्त दरबारतर्फे 10 ते 13 नोव्हेंबर असे सलग चार दिवस चातुर्मास्य कार्तिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चातुर्मासातील अखंड श्रीगुरुचरित्र सप्ताहनुष्ठान समाप्ती, तसेच कार्तिकोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
Story of brother Yamraj and sister Yamuna । दरवर्षी कार्तिक मासातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. याला यम द्वितीया असेही म्हणतात. हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या विशेष प्रसंगी बहिण आपल्या भावाला टिळक लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते.
IPL 2025 चा अंतिम सामना इतिहासात कोरला गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) ने अखेर आयपीएलचा चषक आपल्या नावावर केला. पंजाब किंग्जवर ६ धावांनी मिळवलेल्या विजयाने RCB ने तब्बल १८ वर्षांची प्रतीक्षा संपवली. पण या विजयाचा सगळ्यात भावनिक आणि अविस्मरणीय क्षण ठरला तो विराट कोहलीचा आनंदाश्रूंनी भरलेला सेलिब्रेशन.
आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला अवघ्या काही धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या पराभवाने फक्त संघाचंच नाही, तर टीमच्या सहमालकीण प्रिती झिंटाच्या (Preity Zinta) मनातही असह्य वेदना उमटल्या. सामन्यानंतरच्या क्षणी प्रिती झिंटाच्या डोळ्यांत आलेले अश्रू संपूर्ण स्टेडियम आणि लाखो चाहत्यांच्या मनाला स्पर्शून गेले.
भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे IPL (IPL)2025 हंगामाचे सामने स्थगित करण्यात आले होते. मात्र आता दोन्ही देशांमध्ये युद्धविराम जाहीर झाल्याने स्पर्धा पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL 2025 च्या हंगामाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला ‘ISIS कश्मीर’ या दहशतवादी संघटनेने थेट जीवे मारण्याची धमकी दिली असून, यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही धमकी मिळाल्याचं समोर आलं आहे.
भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि मराठमोळा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) याने (8 एप्रिल) अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधवने भाजपाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) व रीलस्टार धनश्री वर्मा यांचा पाच वर्षाचा संसार अखेर मोडला आहे.दोघांनीही आज घटस्फोटाची अधिकृत माहिती सोशल मीडियावर दिली. धनाश्री व युजवेंद्र यांच्या घटस्फोटामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Inter college handball competition | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग व ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन (महिला व पुरूष) हँडबॉल स्पर्धेचे शिव छत्रपती पुरस्कार विजेते मिलिंद माकडे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची खेळाडू मंजिरी तांबे (Manjiri Tambe) हिने जम्मू विद्यापीठ जम्मू येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत फाईल या वैयक्तिक गटात कांस्यपदक प्राप्त केले आहे.
BCCI Abolishes Impact Player Rule | आयपीएलच्या शेवटच्या हंगामात इम्पॅक्ट प्लेयर अनेक वादांचा विषय ठरला होता. अनेक बड्या खेळाडूंनी या नियमाविरोधात विधाने केली. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या नियमाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धांमधून इम्पॅक्ट प्लेयर हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
१ मे हा दिवस जागतिक कामगार दिन (World Labor Day) म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगभरातील कामगारांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. केवळ भारतातच नाही तर जगभरातील ८० हुन अधिक देशात या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते.
सध्या मुलांमध्ये स्टोन आणि कॅन्सर (Cancer) होण्याचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सर सारख्या जीवघेण्या आणि असाध्य आजाराचे प्रमाण मुलांमध्ये वाढण्याचे कारण शोधण्यासाठी संशोधकांनी संशोधन केले. या संशोधनाचा अहवाल बमेडमध्ये प्रकाशित करण्यात आला.
नेपाळमधील (Nepal) नागरिक पुन्हा एकदा राजेशाही प्रस्थापित व्हावी यासाठी रस्त्यांवर उतरून आंदोलन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले असून या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात दोन जणांचा जीवही गेला आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीतील ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी (Meena Kumari) यांचा आज स्मृतिदिन. मीना कुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी एका सुन्नी मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव मेहजबिन असे होते. कलेचा वारसा त्यांना कुटुंबातूनच मिळाला. त्यांचे वडील अली बक्ष हे चित्रपट आणि पारशी रंगभूमीवरील कलाकार होते.