शहराच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस विशेष ठरला.नागपूर महानगर पालिका (Nagpur Municipal Corporation) मध्ये पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत महिलांच्या नेतृत्वाला अभूतपूर्व संधी देत नवा पायंडा पाडण्यात आला. महापौर आणि उपमहापौर पदांनंतर आता स्थायी समितीसह सर्व महत्त्वाच्या विषय समित्यांच्या अध्यक्षपदी महिलांची निवड करण्यात आली असून मनपात ‘महिलाराज’ अधिकृतपणे सुरू झाल्याचे चित्र आहे.
नागपूर (Nagpur) महानगरपालिका येथे महिलांच्या हाती पूर्ण नेतृत्व देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय पुढे आला आहे. विविध समित्यांच्या निवडणुका जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने सर्व समित्यांच्या अध्यक्षपदी महिलांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
शहरातील अजनी भागात हरवलेल्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा शोध नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अवघ्या एका तासात लावून कुटुंबीयांना मोठा दिलासा दिला. पोलिसांच्या तत्पर आणि समन्वयित हालचालींमुळे संभाव्य अनर्थ टळला.
नागपूर जिल्ह्यातील Ramtek तालुक्यात वाघाच्या हल्ल्याची आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. देवलापार परिसरातील सावरा गावाजवळ शेतात काम करत असलेल्या महिलेवर वाघाने झडप घालून तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (RTO) एका अधिकाऱ्यावर गणवेश न परिधान करता ड्युटी बजावत असताना वाहनचालकांकडून बेकायदेशीर पैसे उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून शहरात चर्चा रंगली आहे.
युज फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित नागपूर कला संघाच्या (Kala Sangh) तृतीय ‘कला महोत्सवा’चा शुभारंभ शनिवारी उत्साहात पार पडला. मुंबई येथील Sir J. J. School of Art, Architecture and Design चे कुलगुरू प्रा. हिम चॅटर्जी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ‘कला कार’चे अनावरण करून महोत्सवाची विधिवत सुरुवात करण्यात आली.
विकासार्थ विद्यार्थी आणि पवरण संरक्षण गतिविधी यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथील विधान भवनात १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दोन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय पर्यावरण युवा संसदेला उत्साहात सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर (Dr Manali Kshirsagar) यांच्या हस्ते झाले.
शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत हरित क्रांती घडवणाऱ्या ५० अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस नागपूरच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. केंद्र शासनाच्या ‘पीएम ई-बस’ (PM e-buses) उपक्रमांतर्गत या बसेस नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ फेब्रुवारी रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लोकार्पित केल्या जाणार आहेत.
नागपूर महानगरपालिकेच्या अखत्यारित शहरातील कन्स्ट्रक्शन व डिमॉलिश (C&D) कचरा संकलन व प्रक्रिया करण्याचे कंत्राट राम नाईकी या खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे. शहराच्या विविध भागांतून जमा होणारा C&D कचरा भांडेवाडी (Bhandewadi) येथील प्रकल्पात प्रक्रिया करून ४० मिमी, २० मिमी, १० मिमी गिट्टी, रेती व माती स्वरूपात बायप्रॉडक्ट तयार करण्यात येतो. या कामासाठी महानगरपालिका कंपनीला प्रतिटन ४५० रुपये इतका मोबदला देते.
नागपूर महानगरपालिकेतील (Nagpur Municipal Corporation) सत्तास्थापनेबाबत सुरू असलेल्या चर्चांना जवळपास पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने महापालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित केली असून, अधिकृत घोषणा २ फेब्रुवारी रोजी अपेक्षित आहे.
बहुचर्चित नाशिक–अक्कलकोट (Nashik-Akkalkote) हरितक्षेत्र द्रुतमार्ग प्रकल्पाबाबत महत्त्वाची प्रगती झाली असून National Highways Authority of India (NHAI) ने पुढील दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. जमीन संपादन प्रक्रियेला गती देण्यात आल्याने दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला आता वेग येण्याची चिन्हे आहेत.
कळमना (Kalamana) भागातील मिनीमाता नगर परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. घरासमोर खेळत असताना उघड्या पाण्याच्या टाकीत पडून अवघ्या दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी संबंधित शेजाऱ्याला अटक केली आहे.
राज्यातील कछार जिल्ह्यातील सिलचर परिसरात एका २८ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार (Gang rape) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणी आपल्या मित्रासोबत कारने फिरण्यासाठी गेली असताना काही अज्ञात व्यक्तींनी कार अडवून दोघांनाही मारहाण केली आणि त्यानंतर तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
जिल्ह्यातील अकोट शहरात ५०० रुपयांच्या बनावट (Fake) नोटा चलनात आढळल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका घटनेनंतर या प्रकरणाची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.
चित्रपटसृष्टीतील श्रीमंत अभिनेत्रींचा उल्लेख झाला की आजच्या घडीला जुही चावला यांचे नाव घेतले जाते. मात्र सत्तरच्या दशकात एक अशी अभिनेत्री होती, जिने केवळ अभिनयातच नव्हे तर राजकारणातही अफाट यश मिळवत प्रचंड संपत्ती उभी केली. त्या म्हणजे तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री Jayalalithaa
केंद्रातील भारत सरकार ‘केरळ’ (Kerala) राज्याचे अधिकृत नाव बदलून ‘केरळम’ करण्याच्या प्रस्तावावर आज होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली असून अंतिम शिक्कामोर्तब बैठकीत होऊ शकते.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी सकाळी लखनऊ (Lucknow) येथे दाखल झाले. येथून ते थेट सुलतानपूरकडे रवाना झाले असून, तेथे खासदार-आमदार (एमपी-एमएलए) न्यायालयात त्यांना आपला जबाब नोंदवायचा आहे.
अमेरिकेसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण इराणमध्ये ५.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप (Earthquake) झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. जर्मनीच्या GFZ German Research Centre for Geosciences (जीएफझेड) या भूगर्भीय संशोधन संस्थेच्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ३:४३ वाजता हा भूकंप झाला.
भारताने युरोपीय युनियन आणि अमेरिकेसोबत केलेल्या नव्या व्यापार करारांमुळे पाकिस्तानसमोर (Pakistan) आर्थिक अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. या करारांमुळे जागतिक बाजारात भारताची पकड अधिक मजबूत झाली असून, त्याचा फटका पाकिस्तानच्या प्रमुख निर्यात क्षेत्रांना, विशेषतः कापूस उद्योगाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बांगलादेशमधील (Bangladesh) एका विशेष न्यायालयाने माजी पंतप्रधान आणि पदच्युत नेत्या शेख हसीना यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवत एकूण १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी निवास प्रकल्पाशी संबंधित भूखंड वाटप घोटाळ्याप्रकरणी दाखल दोन स्वतंत्र प्रकरणांत हा निकाल देण्यात आला आहे.
देशाची राजधानी दिल्लीचे (Delhi) नाव बदलून ‘इंद्रप्रस्थ’ करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे (Bharatiya Janata Party) खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे. राजधानीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करत त्यांनी नामांतराची आवश्यकता अधोरेखित केली आहे.
संविधानाचे संरक्षण आणि लोकशाही मूल्यांचे जतन हेच माझ्या राजकीय प्रवासामागचे खरे उद्दिष्ट आहे,असे ठाम विधान काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारे विधान केले आहे. एकनाथ शिंदे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत आणि त्यांना तशी संधी भाजप देणार नाही, असा थेट दावा त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील राजकीय समीकरणांबाबत नव्याने चर्चा रंगू लागली आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांना प्रकृती अस्वस्थ झाल्याने पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या आरोग्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांची तब्येत सध्या स्थिर असून पुढील ४८ तासांत त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.
राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित भारत मंडपम येथे आयोजित एआय इम्पॅक्ट समिटदरम्यान झालेल्या कथित निदर्शनांवरून देशातील राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी काँग्रेस पक्षावर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.
भारत-अमेरिका (India-US) व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या करारामुळे देशातील कापूस, सोयाबीन आणि मका उत्पादक शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणावर सुरू असलेल्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी नव्या अर्थाने उजाळा दिला आहे. शिवनेरी येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “एकत्र काम करण्याची आमची इच्छा कालही होती, आजही आहे आणि पुढेही राहील.
पुण्यातील सुमारे १८०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेली जमीन ३०० कोटी रुपयांत खरेदी केल्याच्या वादग्रस्त व्यवहारप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने पार्थ पवार (Parth Pawar) यांना दिलासा दिला आहे. महसूल सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर करण्यात आला असून, त्यात पार्थ पवार यांचा थेट संबंध नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
देवगिरी बंगल्यावर काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीस आमदार हिरामण खोसकर उशिरा पोहोचले होते. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी शंकराचार्यांविषयी करण्यात आलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यांवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. कोणत्याही धर्मगुरूंविरुद्ध अपशब्दांचा वापर करणे ही “शब्दांची हिंसा” असून ते पापाच्या श्रेणीत मोडते, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अभिनेते विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मनदाना यांना त्यांच्या विवाहपूर्व विशेष शुभेच्छा पाठवल्या आहेत. २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या त्यांच्या भव्य विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी अभिनंदनाचा संदेश पाठवून या नवदांपत्याला उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिले.
लोकप्रिय पार्श्वगायक अरिजीत सिंग (Arijit Singh) याने काही आठवड्यांपूर्वी प्लेबॅक गायनातून निवृत्ती जाहीर करून चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. मात्र आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केलेल्या त्याच्या नव्या भावनिक संदेशामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील चर्चित जोडी विजय (Vijay) देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाच्या चर्चा आता शिगेला पोहोचल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानातील उदयपूर येथे दोघांचा विवाहसोहळा पार पडण्याची शक्यता आहे.
ओ रोमियो (O Romeo) या चित्रपटाने अवघ्या १३ दिवसांत जागतिक स्तरावर १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. १३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून वर्ल्डवाइड कलेक्शन १००.१० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या जोरदार चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. विशेष नक्षलविरोधी मोहिमेत सहभागी असलेले DRG चे पथक बेज्जी–चिंतागुफा परिसरातील दुर्गम जंगल पट्ट्यात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढवला.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) सरकार खाजगी कंपन्यांमधील कामगारांसाठी महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. राज्यात कामाचे तास सध्याच्या ९ तासांऐवजी १० तास करण्याचा विचार सुरु असून, ही माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सोनं (Gold)–चांदीच्या स्थानिक बाजारात किंचित घसरण नोंदवली गेली आहे. मजबूत अमेरिकन डॉलर आणि जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सोनं–चांदीच्या भावात कमी दिसून आली असून, सामान्य खरेदीदारांनाही किंचित दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याच्या (Gold) किमतींमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली आहे. अमेरिकेतील राजकीय आणि आर्थिक निर्णयांचा थेट परिणाम जागतिक सराफा बाजारावर दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या जागतिक टॅरिफची घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे मोर्चा वळवला आहे.
मागील काही दिवस घसरणीच्या मार्गावर असलेल्या सोन्या (Gold) आणि चांदीच्या किमतींमध्ये आता अचानक वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील ताज्या घटनांचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावर दिसत असून, या वाढीमुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांनाही चिंता–उत्सुकता दोन्ही वाढल्या आहेत.
सराफा बाजारात आज सोन्याच्या (Gold) दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली. २४ कॅरेट सोन्याचा भाव तब्बल २,९०३ रुपयांनी घसरत १,५१,१९५ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. हा दर सोन्याच्या १,७६,१२१ रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकापेक्षा २४,९२६ रुपये म्हणजेच जवळपास २५ हजार रुपयांनी कमी आहे.
‘जय साईराम’च्या घोषात आणि फुलांनी सजलेल्या रथाच्या साक्षीने शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) शिर्डीत १४ किलोमीटरच्या साई परिक्रमेचा (Sai Parikrama) उत्साहात प्रारंभ झाला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा रंगला.
माघ शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश जयंतीनिमित्त (Ganesh Jayanti) नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळत आहे. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि झगमगती विद्युत रोषणाईने सजवण्यात आले असून, गुरुवार (२२ जानेवारी २०२६) पहाटेपासूनच विघ्नहर्त्या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग (Bhimashankar Jyotirlinga) मंदिर येत्या तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
आज, २१ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार), दिवाळीचा (Diwali) सर्वात उत्साहवर्धक आणि शुभ दिवस — लक्ष्मीपूजनाचा दिवस साजरा केला जात आहे. हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावास्येच्या या पवित्र दिवशी धन, समृद्धी आणि आनंदाची आराधना केली जाते. देशभरात आज संध्याकाळी माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि कुबेर यांच्या पूजनाने घराघरांत मंगल वातावरण निर्माण होणार आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करत मोठा अपसेट घडवून आणला. तब्बल १९ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशा प्रकारचा विजय मिळवत झिम्बाब्वेने इतिहासाची पुनरावृत्ती केली.
क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाचे औपचारिक आमंत्रण दिले. या भेटीमुळे अर्जुनच्या लग्नाच्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला आहे.
टीम इंडियाचा उदयोन्मुख क्रिकेटपटू रिंकू सिंह (Rinku Singh) यांचे फेसबुक खाते हॅक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत अलीगड पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली आहे.
वुमन्स प्रीमिअर लीग 2026 (WPL 2026) च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने दिल्ली कॅपिटल्सवर थरारक विजय मिळवत दुसऱ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले. बडोद्याच्या कोटांबी स्टेडियमवर झालेल्या या ऐतिहासिक लढतीत कर्णधार स्मृती मानधना हिच्या नेतृत्वाखाली आरसीबीने नवा इतिहास रचला.
भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) संन्यास घेण्याचा विचार मनात आला असला तरी, तो अजून घ्यायचा नाही असं स्पष्ट केलं आहे. राहुलने सांगितलं की संन्यासासाठी ‘अजून थोडा वेळ बाकी आहे’ आणि तो वेळ आल्यावरही निर्णय घ्यायला उशीर करणार नाही.
भारत (India) आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज (२१ जानेवारी) नागपूरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) स्टेडियमवर खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेत २–१ असा अनपेक्षित पराभव स्वीकारल्यानंतर, टी-२० मालिकेत जोरदार पुनरागमन करण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.
भारतीय बॅडमिंटनला जागतिक व्यासपीठावर ओळख मिळवून देणारी ऑलिम्पिक पदकविजेती सायना नेहवाल (Saina Nehwal) हिने आपल्या कारकिर्दीला अधिकृत पूर्णविराम दिला आहे. सततच्या गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे आता सर्वोच्च पातळीवरील स्पर्धात्मक खेळ शक्य नसल्याने तिने बॅडमिंटनमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होत असून पहिला सामना वडोदरात (Vadodara) खेळवला जाणार आहे. हा सामना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण अनेक वर्षांनंतर भारतीय पुरुष संघ वडोदरात आंतरराष्ट्रीय सामना खेळत असून तोही एका अत्याधुनिक नव्या स्टेडियममध्ये होणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकप्तान स्मृती (Smriti) मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छलयांचे लग्न रद्द झाले आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या लग्नाची तारीख ७ डिसेंबर होती, पण स्मृतीने या दिवशी इंस्टाग्रामवरून लग्न रद्द असल्याची माहिती दिली.
फुटबॉल हा जगातील सर्वात आवडता खेळ मानला जातो. पुढील वर्षी होणाऱ्या फिफा विश्वचषकात (FIFA World Cup) एकूण 48 संघ हिस्सा घेणार आहेत, जे यापूर्वी कधीही झालेले नव्हते. या स्पर्धेची मेजबानी संयुक्तपणे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको करणार आहेत.
प्रत्येक वर्षी ६ डिसेंबर या दिवशी आपण भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महान समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे महापरिनिर्वाण दिन साजरे करतो. या दिवशी १९५६ मध्ये डॉ. आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांचा विचार, त्यांच्या संघर्षाची ज्योत अजूनही भारतीय समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात उजळत आहे.
८ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक साक्षरता (Literacy) दिन म्हणून साजरा केला गेला. मानवी समाज सुसंस्कृत बनून समाजाचे शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांपासून अज्ञानी लोकांची होणारी पिळवणूक, फसवणूक, शोषण आदीपासून मुक्तता व्हावी.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.