युज फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित नागपूर कला संघाच्या (Kala Sangh) तृतीय ‘कला महोत्सवा’चा शुभारंभ शनिवारी उत्साहात पार पडला. मुंबई येथील Sir J. J. School of Art, Architecture and Design चे कुलगुरू प्रा. हिम चॅटर्जी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ‘कला कार’चे अनावरण करून महोत्सवाची विधिवत सुरुवात करण्यात आली.
विकासार्थ विद्यार्थी आणि पवरण संरक्षण गतिविधी यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथील विधान भवनात १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दोन दिवसीय चौथ्या राष्ट्रीय पर्यावरण युवा संसदेला उत्साहात सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर (Dr Manali Kshirsagar) यांच्या हस्ते झाले.
शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत हरित क्रांती घडवणाऱ्या ५० अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस नागपूरच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. केंद्र शासनाच्या ‘पीएम ई-बस’ (PM e-buses) उपक्रमांतर्गत या बसेस नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ फेब्रुवारी रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लोकार्पित केल्या जाणार आहेत.
नागपूर महानगरपालिकेच्या अखत्यारित शहरातील कन्स्ट्रक्शन व डिमॉलिश (C&D) कचरा संकलन व प्रक्रिया करण्याचे कंत्राट राम नाईकी या खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे. शहराच्या विविध भागांतून जमा होणारा C&D कचरा भांडेवाडी (Bhandewadi) येथील प्रकल्पात प्रक्रिया करून ४० मिमी, २० मिमी, १० मिमी गिट्टी, रेती व माती स्वरूपात बायप्रॉडक्ट तयार करण्यात येतो. या कामासाठी महानगरपालिका कंपनीला प्रतिटन ४५० रुपये इतका मोबदला देते.
नागपूर महानगरपालिकेतील (Nagpur Municipal Corporation) सत्तास्थापनेबाबत सुरू असलेल्या चर्चांना जवळपास पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने महापालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित केली असून, अधिकृत घोषणा २ फेब्रुवारी रोजी अपेक्षित आहे.
नागपूर महानगरपालिकेतील (Nagpur Municipal Corporation) महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीबाबत सुरू असलेल्या सर्व तर्कवितर्कांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
आदिवासी व ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था अधिक व्यापक आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करणार असून, आरोग्य, शिक्षण व आर्थिक सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले.
माघ शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश जयंतीनिमित्त (Ganesh Jayanti) नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळत आहे. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि झगमगती विद्युत रोषणाईने सजवण्यात आले असून, गुरुवार (२२ जानेवारी २०२६) पहाटेपासूनच विघ्नहर्त्या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
नागपुरात बंदी असलेल्या नायलॉन (Nylon) मांजाची सर्रास विक्री आणि वापर सुरू असताना, या प्रकरणी सरकारी यंत्रणांनी दिलेल्या माहितीकडे बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने गंभीरपणे पाहिले आहे.
आजचे युग पूर्णपणे डिजिटल (Digital) झाले असून, शिक्षण, खेळ आणि करमणुकीच्या सुविधा मुलांना सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मुलांना पूर्वीप्रमाणे जास्त मेहनत किंवा खोल एकाग्रतेची गरज भासत नाही. याचा थेट परिणाम त्यांच्या एकाग्रता, स्मरणशक्ती आणि विचारक्षमतेवर होताना दिसत आहे.
मुंबईतील मुलुंड (Mulund) परिसरात शनिवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. उभारणी सुरू असलेल्या Mumbai Metro Line 4 च्या पुलाचा स्लॅब अचानक खाली रस्त्यावरून जात असलेल्या वाहनांवर कोसळला. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
नागपूरात (Nagpur) अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५१२ ग्रॅम मेथिलीनडायऑक्सी मेथॅम्फेटामाईन (एमडी) पावडर जप्त केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagavane) मृत्यू प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड घडली आहे. या प्रकरणातील सहाही आरोपींवर सत्र न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले असून, 23 फेब्रुवारीपासून खटल्याची नियमित सुनावणी सुरू होणार आहे. त्यामुळे आता या खटल्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Gondia doctor sold 10-day-old baby girl for Rs 3 lakh | ज्या वैद्यकीय व्यवसायाला समाजात देवदूतासमान मान दिला जातो, त्याच पवित्र पेशावर काळिमा फासणारी संतापजनक घटना विदर्भात उघडकीस आली आहे. अवघ्या १० दिवसांच्या नवजात बालिकेची उपचाराच्या बहाण्याने तब्बल ३ लाख रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या आंतरजिल्हा रॅकेटचा मुख्य सूत्रधार डॉक्टर नितेश बाजपेयी सध्या फरार आहे.
देशातील पहिल्या आपत्कालीन महामार्ग धावपट्टीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) यांच्या हस्ते आसाममधील मोरन येथे करण्यात आले. एकदिवसीय आसाम दौऱ्यावर असताना त्यांनी सुमारे ५ हजार ५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचेही लोकार्पण केले.
‘वंदे मातरम्’ (Vande Mataram) या राष्ट्रीय गीतावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. सध्या ज्या पद्धतीने हा मुद्दा पुढे आणला जात आहे, तो मुस्लीम समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पेन्शन (Pension) ही सरकारची बक्षिसी किंवा देणगी नसून कर्मचाऱ्याचा कायदेशीर आणि संविधानिक अधिकार आहे, असा ठाम निर्वाळा देत कोलकाता उच्च न्यायालयाने एका विधवा महिलेला मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने नाकारलेला पेन्शनचा अर्ज रद्द ठरवत न्यायालयाने संबंधित महिलेला पेन्शन आणि सेवानिवृत्तीचे सर्व लाभ तत्काळ देण्याचे आदेश दिले.
भारताने युरोपीय युनियन आणि अमेरिकेसोबत केलेल्या नव्या व्यापार करारांमुळे पाकिस्तानसमोर (Pakistan) आर्थिक अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. या करारांमुळे जागतिक बाजारात भारताची पकड अधिक मजबूत झाली असून, त्याचा फटका पाकिस्तानच्या प्रमुख निर्यात क्षेत्रांना, विशेषतः कापूस उद्योगाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बांगलादेशमधील (Bangladesh) एका विशेष न्यायालयाने माजी पंतप्रधान आणि पदच्युत नेत्या शेख हसीना यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवत एकूण १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी निवास प्रकल्पाशी संबंधित भूखंड वाटप घोटाळ्याप्रकरणी दाखल दोन स्वतंत्र प्रकरणांत हा निकाल देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाशी संबंधित घटनेची चर्चा सुरू असतानाच, आंतरराष्ट्रीय स्तरावरून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोलंबियामध्ये (Colombia) लहान प्रवासी विमान कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी शंकराचार्यांविषयी करण्यात आलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्यांवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. कोणत्याही धर्मगुरूंविरुद्ध अपशब्दांचा वापर करणे ही “शब्दांची हिंसा” असून ते पापाच्या श्रेणीत मोडते, असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आज पुण्यातील Ruby Hall Clinic येथून रुग्णालयातून सुटी देण्यात आली. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांना घरी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानाचा उल्लेख करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याचा आरोप होताच राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Sapkal) यांनी टिपू सुलतान यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. शौर्याच्या बाबतीत टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकक्ष मानले पाहिजे, अशी टिप्पणी सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना केली. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपाने तीव्र आक्षेप घेत माफीची मागणी केली आहे.
लिलावती रुग्णालयातील (Lilavati Hospital) कथित गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप करत स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तासमीकरणांमध्ये परभणी महापालिकेतील महापौर निवडीवरून नव्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे. परभणीत (Parbhani) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसने एकत्र येत महापौरपदाची निवडणूक लढवली आणि शिवसेना (यूबीटी) चे नगरसेवक सय्यद इक्बाल यांची महापौरपदी निवड झाली.
राज्य मंत्रालयात (Mantralaya) गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एका लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या घटनेनंतर मंत्रालय परिसरात खळबळ उडाली.
बृहन्मुंबई महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीवेळी सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील मंत्रीमंडळ सदस्य उपस्थित असताना सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवक आमनेसामने आले. जोरदार घोषणाबाजी आणि ‘५० खोके’च्या आरोळ्यांमध्येच निवड प्रक्रिया पूर्ण झाली.
चंद्रपूर (Chandrapur) महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत काँग्रेसला अनपेक्षित पराभव पत्करावा लागल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वाधिक २७ नगरसेवक असतानाही सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
राज्यभराचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी अखेर भाजपच्या रितू तावडे (Ritu Tawde) विराजमान झाल्या आहेत. तर शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची सूत्रे हाती घेतली. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते आज दोघांचा अधिकृत पदग्रहण सोहळा पार पडला. सभागृहात घोषणाबाजी आणि जल्लोषाच्या वातावरणात महायुतीच्या सदस्यांनी विजयाचा आनंद साजरा केला.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापले आहे. कथितरित्या लॉरेन्स बिश्नोई टोळीमार्फत (Bishnoi gang) बॉलीवूडमधील काही नामवंत कलाकारांना धमक्या दिल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष काँग्रेसने राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागांत सुरक्षा यंत्रणा कमकुवत झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
बॉलिवूडमधील लोकप्रिय विनोदी अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) सध्या आर्थिक अडचणींमुळे चर्चेत आला आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘अता पता लापता’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्याने सुमारे पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र चित्रपट अपेक्षित यश मिळवू शकला नाही आणि त्याचा आर्थिक फटका राजपाल यांना बसला.
मराठी चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शनवरील लोकप्रिय चेहरा प्राजक्ता माळी (Prajakta Mali) पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. यावेळी तिच्या कोणत्याही नव्या प्रकल्पामुळे नव्हे, तर प्रेमाविषयी मांडलेल्या तिच्या स्पष्ट आणि विचारपूर्ण भूमिकेमुळे ती चर्चेत आहे. ३६ व्या वर्षीही अविवाहित असलेल्या प्राजक्ताने अलीकडील मुलाखतीत नातेसंबंधांबद्दल आपले ठाम मत व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय व्याख्यानमालेवर बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संघप्रमुख मोहन भागवत यांच्या व्याख्यानाचे कौतुक करत त्यांनी ते प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या जोरदार चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. विशेष नक्षलविरोधी मोहिमेत सहभागी असलेले DRG चे पथक बेज्जी–चिंतागुफा परिसरातील दुर्गम जंगल पट्ट्यात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढवला.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) सरकार खाजगी कंपन्यांमधील कामगारांसाठी महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. राज्यात कामाचे तास सध्याच्या ९ तासांऐवजी १० तास करण्याचा विचार सुरु असून, ही माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
भारत (India) आणि अमेरिका यांच्यात महत्त्वपूर्ण व्यापार करार झाल्यानंतर दोन्ही देशांच्या व्यापार संबंधांना नवी दिशा मिळाली आहे. या करारानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ कमी करण्याची घोषणा केली. सुरुवातीला ५० टक्के असलेला टॅरिफ १८ टक्क्यांवर आणण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून, आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. या अहवालातून देशाच्या अर्थव्यवस्थेची (Economy) सद्यस्थिती, आगामी वर्षांचा अंदाज आणि संभाव्य आर्थिक आव्हानांचा आढावा घेण्यात आला आहे.
सराफा बाजारात आज सोन्या (Gold)-चांदीच्या दरांनी सर्व जुने विक्रम मोडीत काढत नवे उच्चांक गाठले आहेत. एका दिवसात झालेल्या जोरदार दरवाढीमुळे गुंतवणूकदारांसह दागिने खरेदी करणाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे. आजच्या व्यवहारात चांदीच्या दरात तब्बल १४,४७५ रुपयांची उसळी नोंदवली गेली, तर सोन्याच्या किमतीत २,८८३ रुपयांची भक्कम वाढ झाली आहे.
चांदीच्या (Silver) दरांनी पुन्हा एकदा जोरदार उसळी घेतली असून सराफा बाजारात तेजीचे वातावरण कायम आहे. देशभरातील बाजारात चांदीचे भाव सातत्याने नवे विक्रम नोंदवत आहेत. शनिवारी सकाळी नागपूर सराफा बाजारात चांदीचा दर थेट २ लाख ५३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचला.
‘जय साईराम’च्या घोषात आणि फुलांनी सजलेल्या रथाच्या साक्षीने शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) शिर्डीत १४ किलोमीटरच्या साई परिक्रमेचा (Sai Parikrama) उत्साहात प्रारंभ झाला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा रंगला.
ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग (Bhimashankar Jyotirlinga) मंदिर येत्या तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
आज, २१ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार), दिवाळीचा (Diwali) सर्वात उत्साहवर्धक आणि शुभ दिवस — लक्ष्मीपूजनाचा दिवस साजरा केला जात आहे. हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावास्येच्या या पवित्र दिवशी धन, समृद्धी आणि आनंदाची आराधना केली जाते. देशभरात आज संध्याकाळी माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि कुबेर यांच्या पूजनाने घराघरांत मंगल वातावरण निर्माण होणार आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करत मोठा अपसेट घडवून आणला. तब्बल १९ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशा प्रकारचा विजय मिळवत झिम्बाब्वेने इतिहासाची पुनरावृत्ती केली.
क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी आपल्या कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाचे औपचारिक आमंत्रण दिले. या भेटीमुळे अर्जुनच्या लग्नाच्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला आहे.
टीम इंडियाचा उदयोन्मुख क्रिकेटपटू रिंकू सिंह (Rinku Singh) यांचे फेसबुक खाते हॅक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत अलीगड पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली आहे.
वुमन्स प्रीमिअर लीग 2026 (WPL 2026) च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने दिल्ली कॅपिटल्सवर थरारक विजय मिळवत दुसऱ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले. बडोद्याच्या कोटांबी स्टेडियमवर झालेल्या या ऐतिहासिक लढतीत कर्णधार स्मृती मानधना हिच्या नेतृत्वाखाली आरसीबीने नवा इतिहास रचला.
भारताचा अनुभवी फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) संन्यास घेण्याचा विचार मनात आला असला तरी, तो अजून घ्यायचा नाही असं स्पष्ट केलं आहे. राहुलने सांगितलं की संन्यासासाठी ‘अजून थोडा वेळ बाकी आहे’ आणि तो वेळ आल्यावरही निर्णय घ्यायला उशीर करणार नाही.
भारत (India) आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज (२१ जानेवारी) नागपूरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) स्टेडियमवर खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेत २–१ असा अनपेक्षित पराभव स्वीकारल्यानंतर, टी-२० मालिकेत जोरदार पुनरागमन करण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.
भारतीय बॅडमिंटनला जागतिक व्यासपीठावर ओळख मिळवून देणारी ऑलिम्पिक पदकविजेती सायना नेहवाल (Saina Nehwal) हिने आपल्या कारकिर्दीला अधिकृत पूर्णविराम दिला आहे. सततच्या गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे आता सर्वोच्च पातळीवरील स्पर्धात्मक खेळ शक्य नसल्याने तिने बॅडमिंटनमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होत असून पहिला सामना वडोदरात (Vadodara) खेळवला जाणार आहे. हा सामना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण अनेक वर्षांनंतर भारतीय पुरुष संघ वडोदरात आंतरराष्ट्रीय सामना खेळत असून तोही एका अत्याधुनिक नव्या स्टेडियममध्ये होणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकप्तान स्मृती (Smriti) मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छलयांचे लग्न रद्द झाले आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या लग्नाची तारीख ७ डिसेंबर होती, पण स्मृतीने या दिवशी इंस्टाग्रामवरून लग्न रद्द असल्याची माहिती दिली.
फुटबॉल हा जगातील सर्वात आवडता खेळ मानला जातो. पुढील वर्षी होणाऱ्या फिफा विश्वचषकात (FIFA World Cup) एकूण 48 संघ हिस्सा घेणार आहेत, जे यापूर्वी कधीही झालेले नव्हते. या स्पर्धेची मेजबानी संयुक्तपणे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको करणार आहेत.
प्रत्येक वर्षी ६ डिसेंबर या दिवशी आपण भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महान समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे महापरिनिर्वाण दिन साजरे करतो. या दिवशी १९५६ मध्ये डॉ. आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांचा विचार, त्यांच्या संघर्षाची ज्योत अजूनही भारतीय समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात उजळत आहे.
८ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक साक्षरता (Literacy) दिन म्हणून साजरा केला गेला. मानवी समाज सुसंस्कृत बनून समाजाचे शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांपासून अज्ञानी लोकांची होणारी पिळवणूक, फसवणूक, शोषण आदीपासून मुक्तता व्हावी.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.