नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक अतुलनीय व्यक्तिमत्व आणि हजारो रुग्णांच्या जीवावर काम करणारे विख्यात न्युरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे (Dr Chandrashekhar Pakhmode) (वय ५५) यांचे ३१ डिसेंबर, बुधवार रोजी पहाटे हृदयविकाराच्या अचानक आलेल्या झटक्यामुळे निधन झाले. त्यांच्या या अकाली निधनामुळे वैद्यकीय क्षेत्र आणि समाजात मोठा शोककळा पसरली आहे.
नागपूर (Nagpur) शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, त्यांना शुद्ध पेयजल मिळावे यासाठी 'ऑरेंज सिटी वॉटर' (ओसीडब्ल्यू) ने एक विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. अनधिकृत पाणी वापराकडून कायदेशीर महानगरपालिका नळ जोडणीकडे वळलेल्या नागरिकांचा अनुभव या मोहिमेद्वारे लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे.
नागपूर महानगरपालिका निवडणूक (Nagpur Municipal Corporation) २०२६च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने उमेदवारीबाबत आपली रणनीती उघड केली आहे. अधिकृत उमेदवार यादी जाहीर होण्याआधीच भाजपकडून एबी फॉर्मचे वितरण सुरू झाले असून, यावेळी पक्षाने मोठा प्रयोग करत अनेक प्रस्थापित व ज्येष्ठ नेत्यांना डावलले आहे. त्याचवेळी तरुण, नव्या चेहऱ्यांना आणि पक्षात नव्याने प्रवेश केलेल्यांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आली आहे.
कडबी चौक परिसरातील ‘बबल्स किड्स प्ले झोन’ (Bubbles Kids Play Zone) ला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीत प्ले झोनमधील खेळणी, सजावटीचे साहित्य व इतर उपकरणे जळून खाक झाली. या घटनेत सुमारे १.५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगराध्यक्षांना (Mayor) पगाराऐवजी मानधन व भत्ते दिले जात आहेत. राज्यातील नगरपरिषदा तीन वर्गांमध्ये विभागल्या आहेत – अ, ब आणि क. यानुसार मानधन आणि अतिथ्य भत्त्याची रक्कम ठरते.
बुटीबोरी (Butibori) एमआयडीसी परिसरातील अवाडा कंपनीत झालेल्या भीषण दुर्घटनेत सहा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून नऊ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त करत मृतकांच्या कुटुंबीयांसह जखमींसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
नागपूरमधील कोराडी (Koradi) थर्मल पावर प्लांटमध्ये देखभाल कामकाजाच्या दरम्यान गॅस गळतीची घटना उघडकीस आली आहे. अचानक गॅस पसरल्यामुळे प्लांटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तब्येत खराब झाली, ज्यामुळे तणावपूर्ण वातावरण तयार झाले.
नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) सार्वत्रिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होताच शहरात राजकीय वातावरण तापले आहे. याबाबत महापालिका आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली.
नागपूर शहरातील रिझर्व्ह बँक चौक ते ऑटोमोटिव्ह चौक या सिमेंट रस्त्याच्या उद्घाटन व विविध विकासकामांच्या भूमिपूजनावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Gadkari) यांनी अतिक्रमणांच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडली. नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांना उद्देशून त्यांनी मिश्कील पण ठाम शब्दांत प्रशासनाला इशारा दिला.
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचा समारोप; पुढचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून मुंबईत सुरू होणार
सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या पूर्वसंध्येला नागपूरमधील (Nagpur) यशोधरा नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली. घरगुती वादातून पतीने पत्नीवर अमानुष मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी यशोधरा नगर पोलिसांनी काही तासांतच आरोपी पतीला अटक केली आहे.
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधून (Nagpur) मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. बेंगळुरू येथील एका नवविवाहित तरुणाने नागपूरमधील हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून, या घटनेनंतर त्याच्या आईनेही विष प्राशन करून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला आहे.
उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी आरोपी आणि भाजपचा माजी आमदार कुलदीपसिंह सेंगर (Kuldeep Singh Sengar) याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे. सेंगर यांची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करून दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला जामीन आदेश सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केला आहे.
नवी मुंबई परिसरात अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटनांनी चिंतेचं वातावरण असतानाच आता भिवंडीमध्येही (Bhiwandi) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील विविध भागांतून अवघ्या दोन दिवसांत चार अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
आधार कार्ड (Aadhaar card) हे आज प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. बँकिंग, सरकारी योजना, सिमकार्ड, पॅन यांसारख्या अनेक सेवांसाठी आधारचा वापर होत असल्याने त्याची सुरक्षा तितकीच महत्त्वाची ठरते. याच पार्श्वभूमीवर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांसाठी नवीन अपडेटेड आधार ॲप लॉन्च केले असून, डेटा सुरक्षेबाबत महत्त्वाचा इशाराही दिला आहे.
देशातील केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ८व्या वेतन आयोगाबाबत (8th Pay Commission) उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वेतनवाढ, भत्ते आणि थकबाकी याबाबत विविध चर्चा सुरू असतानाच आयोगाच्या कामकाजाला गती मिळाल्याचे संकेत आहेत.
राष्ट्रीयीकृत बँकांनी (Nationalized banks) शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रति हेक्टरी कर्जाची मर्यादा १ लाख ४५ हजार रुपयांपर्यंत करण्यात आली आहे, जी आधी १ लाख १० हजार होती. या वाढीमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात होणारी मदत अपेक्षित आहे.
प्रसिद्ध सरोद वादक शिराज अली खान यांनी नुकताच बांगलादेशमध्ये (Bangladesh) भारतीय नागरिकांसमोर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा थरारक अनुभव सांगितला आहे. चार संगीत कार्यक्रमांसाठी ते बांगलादेशला गेले होते, पण तिथे भारतीय असल्याचा उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी आपली खरी ओळख लपवून जीव वाचवला.
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Putin) अलीकडेच भारताला भेट देऊन परतले आहेत. त्यांच्या या दौऱ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे महत्त्व देण्यात आले होते, कारण हा भारत-रशिया संबंध अधिक मजबूत करण्याचा एक महत्वपूर्ण टप्पा होता.
पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा दहशतवादाचा कहर पाहायला मिळाला. नोकुंडी परिसरातील लष्कराच्या तळाजवळ वसलेल्या विशेष निवासी वसाहतीवर रविवारी मध्यरात्री आत्मघातकी स्फोट घडवून आणण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन फ्रंट या संघटनेने स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ घडवणारी घडामोड समोर आली आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) ताण निर्माण झाला असून, तब्बल १२ महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची युती तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतील सत्तासमीकरणे पूर्णतः बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘अजित पवारांनी (Ajit Pawar) उमेदवारी अर्ज दाखल केला’ अशी बातमी समोर येताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र या चर्चेमागील वास्तव वेगळेच असल्याचे पुढे आले आहे.
नागपूर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत. उमेदवार निवडीवरून नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन करत थेट पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Bawankule) यांची गाडी अडवली. या घटनेमुळे शहराच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (BMC Election) मुंबईतील राजकीय हालचालींना वेग आला असून उमेदवारीवरून राजी-नाराजीचे नाट्य रंगत आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या (Candidates) याद्या जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून मोठ्या गुप्ततेत नावे निश्चित केली जात आहेत.
अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या वाटांवर असलेले ठाकरे बंधू अखेर आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा करत मराठी राजकारणात नवा अध्याय उघडला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या एका थेट घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वळणबिंदू निर्माण झाला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्रितपणे लढणार असल्याचे जाहीर करताच, या शहरात महाविकास आघाडीचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
येत्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये महत्त्वपूर्ण सहमती झाली आहे. अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या चारही महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवणार असून, जागावाटपाची अधिकृत घोषणा आज संध्याकाळपर्यंत करण्यात येईल, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे (Bawankule) यांनी दिली.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने (Congress) पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची मोठी यादी जाहीर करत राजकीय वातावरण तापवले आहे. एकूण ८१ जागांपैकी ४८ उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून ही यादी आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केली.
महाराष्ट्रात ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस म्हणाले की, सध्याचे ठाकरे यांचे राजकारण हे फक्त मतं जमवण्यासाठी जोडे चाटण्याच्या कृत्यांवर आधारित आहे.
आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच महायुतीतील अंतर्गत गणित उघड होत आहे. भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जागावाटपावर एकमत झाले असले, तरी या फॉर्म्युलात शिंदेसेनेच्या हाती काहीही ठोस सत्ता येणार नाही, असा स्पष्ट राजकीय सूर उमटू लागला आहे.
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने (Salman Khan) आपला ६०वा वाढदिवस यंदा शहराच्या गोंगाटापासून दूर, पनवेलजवळील फार्महाऊसवर अत्यंत खास आणि शांत वातावरणात साजरा केला. या खासगी सेलिब्रेशनला केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्रपरिवार उपस्थित होते.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाभीजी घर पर हैं’मधील अंगुरी भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रेने (Shubhangi Atre) मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. तब्बल दहा वर्षे ही भूमिका साकारल्यानंतर शुभांगीने अखेर यामागचं खरं कारण उघड केलं आहे.
हॉलिवूड दिग्दर्शक जेम्स कॅमरूनच्या ‘अवतार’ फ्रँचायझीबाबत बॉलिवूड अभिनेता गोविंदाने (Govinda) याआधी केलेला एक दावा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘अवतार’ चित्रपटासाठी आपल्यालाच सर्वप्रथम विचारणा करण्यात आली होती, मात्र आपण ही ऑफर नाकारली, असे गोविंदाने एका मुलाखतीत सांगितले होते. या वक्तव्यामुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) यांनी महाराष्ट्रातील शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेतले. मंदिर परिसरात त्यांनी विधीवत पूजा-अर्चा करून साईबाबांचे आशीर्वाद घेतले.
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या जोरदार चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. विशेष नक्षलविरोधी मोहिमेत सहभागी असलेले DRG चे पथक बेज्जी–चिंतागुफा परिसरातील दुर्गम जंगल पट्ट्यात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढवला.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) सरकार खाजगी कंपन्यांमधील कामगारांसाठी महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. राज्यात कामाचे तास सध्याच्या ९ तासांऐवजी १० तास करण्याचा विचार सुरु असून, ही माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
चांदीच्या (Silver) दरांनी पुन्हा एकदा जोरदार उसळी घेतली असून सराफा बाजारात तेजीचे वातावरण कायम आहे. देशभरातील बाजारात चांदीचे भाव सातत्याने नवे विक्रम नोंदवत आहेत. शनिवारी सकाळी नागपूर सराफा बाजारात चांदीचा दर थेट २ लाख ५३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचला.
सोने (Gold) आणि चांदीच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली वाढ आता विक्रमी टप्प्यावर पोहोचली आहे. जळगावच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी दरवाढ कायम राहिल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.
मुलीच्या (Girl) शिक्षणासाठी किंवा पुढील आयुष्यातील मोठ्या खर्चांसाठी सुरक्षित, स्थिर आणि खात्रीशीर गुंतवणूक शोधत असाल, तर सुकन्या समृद्धी योजना हा सध्या उपलब्ध असलेला सर्वात विश्वासार्ह पर्याय मानला जातो. केंद्र सरकार चालवणारी ही योजना पूर्णपणे सुरक्षित असून व्याजदर हमीदार आहे. 2025 साली योजनेचा व्याजदर 8.2% इतका निश्चित करण्यात आला आहे.
दिवाळीनंतर (Gold) सोनं आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी भाव वाढल्यानंतर आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. उलट चांदीच्या किमतींनी वाढ दाखवली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि दागिने घेणाऱ्यांसाठी हा महत्वाचा आर्थिक संकेत मानला जात आहे.
ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग (Bhimashankar Jyotirlinga) मंदिर येत्या तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
आज, २१ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार), दिवाळीचा (Diwali) सर्वात उत्साहवर्धक आणि शुभ दिवस — लक्ष्मीपूजनाचा दिवस साजरा केला जात आहे. हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावास्येच्या या पवित्र दिवशी धन, समृद्धी आणि आनंदाची आराधना केली जाते. देशभरात आज संध्याकाळी माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि कुबेर यांच्या पूजनाने घराघरांत मंगल वातावरण निर्माण होणार आहे.
हिंदू धर्मातील एक प्रमुख सण, दसरा (Dussehra), दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपासना व भक्तीनंतर हा दिवस विशेष महत्त्वाचा ठरतो. देशभरात मंदिरे, घरे आणि सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
नवरात्र (Navratri) म्हटलं की आपल्या मनात लगेच उपवास, साबुदाणा खिचडी, कुट्टू पुरी, फळाहार आणि सात्विक जेवण डोळ्यांसमोर उभं राहतं. देशभरातील अनेक भागांत नवरात्र म्हणजे संयम, कांदा-लसूण वर्ज्य आणि मांसाहार पूर्णतः टाळण्याचा काळ असतो.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकप्तान स्मृती (Smriti) मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छलयांचे लग्न रद्द झाले आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या लग्नाची तारीख ७ डिसेंबर होती, पण स्मृतीने या दिवशी इंस्टाग्रामवरून लग्न रद्द असल्याची माहिती दिली.
फुटबॉल हा जगातील सर्वात आवडता खेळ मानला जातो. पुढील वर्षी होणाऱ्या फिफा विश्वचषकात (FIFA World Cup) एकूण 48 संघ हिस्सा घेणार आहेत, जे यापूर्वी कधीही झालेले नव्हते. या स्पर्धेची मेजबानी संयुक्तपणे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको करणार आहेत.
आयसीसी महिला विश्वचषक जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) यांनी आपल्या अधिकृत निवासस्थानी सत्कार केला. बुधवारी सायंकाळी ६ वाजता ७ लोक कल्याण मार्ग येथे झालेल्या या विशेष भेटीत मोदींनी संघातील प्रत्येक खेळाडूशी संवाद साधत त्यांचे मनापासून अभिनंदन केले.
महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल असा २०२५ चा विश्वविजय भारतीय महिलांनी आपल्या जिद्दीने आणि एकतेने साध्य केला आहे. या ऐतिहासिक पराक्रमाचा गौरव वाढवताना बीसीसीआयने (BCCI) तब्बल ५१ कोटी रुपयांचे पारितोषिक घोषित करत महिला क्रिकेटच्या गौरवकथेला नवा अध्याय जोडला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian women Cricket team) रविवारी इतिहास घडवत आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकावर आपले नाव कोरले. दमदार खेळ आणि अदम्य जिद्दीच्या जोरावर ‘वुमन इन ब्लू’ने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावले. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्व क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहिला.
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (२८ सप्टेंबर) आशिया कप (Asia Cup) २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला ५ विकेट्सने हरवून ट्रॉफी आपल्या नावावर केली. या सामन्याने भारतासाठी विशेष महत्त्व ठेवले कारण भारताने या स्पर्धेत पाकिस्तानवर सलग तीन विजय मिळवले – साखळी फेरी, सुपर फोर आणि अंतिम सामन्यात.
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत गांगुली यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पॅनेल विजयी झाले.
आशिया चषक (Asia Cup) टी-२० स्पर्धेतील थरार आता खऱ्या अर्थाने वाढणार आहे. शनिवारपासून सुपर-फोर फेरीला सुरुवात होणार असून रविवारी पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची प्रतीक्षा चाहत्यांना लागली आहे.
भारत-पाकिस्तान क्रिकेटमध्ये मैदानावरची धडक जितकी तुफानी असते, तितकीच निवृत्त खेळाडूंच्या वक्तव्यांमधूनही रंगतदार वाद निर्माण होत असतात. नुकताच असा एक किस्सा समोर आला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) आणि भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा मैदानावरील कामगिरीपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पत्नी नताशा स्टॅन्कोविकपासून विभक्त झाल्यानंतर त्याचे नाव अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्ससोबत जोडले गेले होते. काही काळापूर्वी ब्रिटिश सिंगर जास्मिन वालियाशी त्याचा संबंध असल्याच्या चर्चा झाल्या होत्या.
प्रत्येक वर्षी ६ डिसेंबर या दिवशी आपण भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महान समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे महापरिनिर्वाण दिन साजरे करतो. या दिवशी १९५६ मध्ये डॉ. आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांचा विचार, त्यांच्या संघर्षाची ज्योत अजूनही भारतीय समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात उजळत आहे.
८ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक साक्षरता (Literacy) दिन म्हणून साजरा केला गेला. मानवी समाज सुसंस्कृत बनून समाजाचे शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांपासून अज्ञानी लोकांची होणारी पिळवणूक, फसवणूक, शोषण आदीपासून मुक्तता व्हावी.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.