शहरातील ताजबाग, सक्करदरा आणि परिसरात मंगळवारी आयोजित शाही संदल (Royal sandal) मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी व्यापक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. रेल्वेमार्गाने सोमवारपासूनच १० ते १५ हजार भाविकांच्या आगमनाची शक्यता लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी, २२ जुलै रोजी ईमेलद्वारे बॉम्ब (Bomb) असल्याची धमकी मिळाल्याने खळबळ माजली. ही माहिती मिळताच विमानतळ प्रशासनाने तात्काळ खबरदारीचे उपाय सुरू केले, तर पोलिस दलही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
ताजबाग (Tajbagh) येथील उर्सच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तात्पुरती थांबवण्यात आली आहे.
टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) लवकरच नागपूरमध्ये एक भव्य स्टुडिओ स्थापन करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात दिली. यामुळे विदर्भातील कलाक्षेत्राला आणि स्थानिक कलाकारांना नवी दिशा मिळणार आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सध्या सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नागपूर विभागातील भाजपच्या आमदारांसोबत बैठक घेऊन आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा केली. ही बैठक मुंबईतील विधान भवनात पार पडली.
महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter session) यंदा ८ डिसेंबरपासून उपराजधानी नागपुरात भरवले जाणार आहे. गुरुवारी मुंबईत विधानभवनात झालेल्या कार्यमंत्रणा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर होते.
नागपूरमधील (Nagpur) ऐतिहासिक विधानभवन परिसर लवकरच नव्या रूपात दिसणार आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसराच्या विस्तारीकरणाचा आणि नव्या प्रशासकीय इमारतींचा सविस्तर आराखडा बुधवारी मुंबईतील विधानभवनात सादर करण्यात आला.
नागपूरमध्ये (Nagpur) युनियन बँकेच्या वर्तनामुळे राज्यभाषा मराठीचा अपमान झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांना केवळ एफआयआर मराठीत असल्याचं कारण देत विमा भरपाई नाकारण्यात आली. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) संतप्त प्रतिक्रिया देत बँकेविरोधात आंदोलन छेडले.
उत्तर भारतीय पंचांगानुसार सुरू झालेल्या श्रावण (Shravan) महिन्याच्या पहिल्या सोमवारला नागपूरात भक्तिभावाने भारलेलं दृश्य पाहायला मिळालं. शहरातील प्रमुख शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची रस्त्यांवर रांग लागली होती. 'ॐ नमः शिवाय'च्या घोषात मंदिर परिसर दुमदुमला होता.
CM Fadnavis tour of constituencies is scheduled for municipal elections | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकांची घोषणा जवळ आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या असून, राजकीय पक्षांनीही संघटनबांधणीला गती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेत मनपा निवडणुकांच्या तयारीचा नारळ फोडला आहे.
नाशिकमध्ये गाजत असलेल्या हनीट्रॅप प्रकरणात भाजपचे नेते प्रफुल्ल लोढा (Praful Lodha) यांना अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या अंधेरी परिसरातून ५ जुलै रोजी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांच्यावर ठेवले गेले असून, यामध्ये पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा, बलात्कार, आणि ब्लॅकमेलिंग यांचा समावेश आहे.
११ जुलै २००६ रोजी लोकल ट्रेनमध्ये झालेल्या सात बॉम्बस्फोटांप्रकरणी मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयाने सोमवारी मोठा निर्णय दिला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आणि विशेष न्यायालयाने दोषी ठरवलेल्या १२ आरोपींना हायकोर्टाने निर्दोष जाहीर करत त्यांच्या सुटकेचे आदेश दिले.
शहरातील मद्यधुंद वाहनचालकांविरोधात ट्राफिक विभागाने राबवलेल्या ‘ऑपरेशन यू-टर्न’ (Operation U Turn) या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. १० जुलैपासून सुरू झालेल्या या विशेष मोहिमेअंतर्गत एकूण १,३३९ वाहनांची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये ३३६ जण नशेच्या अवस्थेत वाहन चालवत असल्याचे आढळले.
नागपूर सेंट्रल जेलमधील (Nagpur Central Jail) कैद्यांमधील वाद विकोपाला जात असून बुधवारी पुन्हा एकदा अति क्रूर प्रकार समोर आला आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर जीवघेणा हल्ला करत त्याच्या गुप्तांगावर दातांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला असून, आरोग्य कारणाचा हवाला देत त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून त्यांनी आपले कृतज्ञता व्यक्त करतानाच राजीनाम्याची अधिकृत माहिती दिली.
बांगलादेशची राजधानी ढाका (Dhaka) येथे सोमवारी एक भीषण अपघात घडला. हवाई दलाचं F-7 BGI हे प्रशिक्षण लढाऊ विमान थेट शाळेच्या इमारतीवर कोसळलं. या अपघातात एक व्यक्ती ठार झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
देशातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळू शकतो. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या किंमती लवकरच कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिल्लीत झालेल्या एनर्जी डायलॉग 2025 या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, "जर कच्च्या तेलाच्या किंमती सध्याच्याच पातळीवर राहिल्या, तर येत्या तिमाहीत इंधनाच्या दरांमध्ये कपात होऊ शकते."
भारतात गुप्त माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानची (Pakistan) गुप्तचर संस्था आयएसआय नवनवीन मार्गांचा अवलंब करत असून, आता तिने नेपाळमार्गे हेरगिरी करण्याचा कट आखल्याचं उघड झालं आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, ऑपरेशन सिंदूर आणि युद्धविरामानंतरही पाकिस्तानच्या कारवाया थांबलेल्या नाहीत.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदाय भारताच्या बाजूने उभा राहिल्याचे दिसून येत आहे. FATF (Financial Action Task Force) ने या हल्ल्यासाठी आर्थिक पुरवठा झाल्याचे स्पष्ट संकेत देत पाकिस्तानला फटकारलं आहे.
इराणमधील (Iran) तणावपूर्ण परिस्थितीमुळे सुमारे १५०० भारतीय विद्यार्थी तिथे अडकले असून, त्यांचा आपल्या कुटुंबीयांशी संपर्क तुटला आहे. इस्रायलने इराणवर जोरदार हवाई हल्ले सुरू केल्याने देशात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. इंटरनेट सेवा बंद असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुभेच्छा देताना त्यांच्या राजकीय प्रवासाचं विशेष कौतुक केलं आहे.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे शिवसेना (शिंदे गट) आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. इंदूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या असून, योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलं आहे.
विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अडचणीत आलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी अखेर पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी रमी खेळल्याचा आरोप फेटाळून लावत, आपण दोषी आहोत हे सिद्ध झाल्यास राज्यपालांकडे थेट राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.
नाशिकच्या बहुचर्चित हनीट्रॅप प्रकरणामुळे (Honey trap case) राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर जोरदार शब्दांत हल्लाबोल केला आहे. विरोधकांकडून केवळ हवेतून आरोप केले जात आहेत, त्यांच्याकडे जर खरोखर कोणतेही ठोस पुरावे असतील, तर ते सरळ विधानसभेत मांडावेत, असं थेट आव्हानच त्यांनी दिलं
सामाजिक न्यायमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अलीकडील काही दिवसांपासून आर्थिक आरोप, व्हिडिओ वाद, आणि आता थेट त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने राजकीय वातावरण तापलं आहे.
लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) युवक विंगचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) अडचणीत आले आहेत. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ हस्तक्षेप करत सूरज चव्हाण यांना पदावरून बाजूला होण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
विधीमंडळाच्या सत्रादरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रम्मी (Rummy) खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओनंतर राज्यातील राजकारणात खळबळ माजली असून विरोधकांनी कृषी मंत्री आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
नागपूर शहरात अपघातांची संख्या झपाट्याने वाढत असून, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्लॅक स्पॉट्स म्हणजेच अपघातप्रवण ठिकाणांची तात्काळ तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके (Praveen Datke) यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत केली.
राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले असताना, परभणी जिल्ह्यातून काँग्रेससाठी (Congress) चिंतेची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार आणि सध्या जिल्हाप्रमुख असलेले सुरेश वरपूडकर हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत.
राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार हनीट्रॅपमुळेच कोसळले, असा दावा त्यांनी केला असून, एकनाथ शिंदेंच्या नाशिकमधील कथित प्रकरणाची सीडी आमच्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
बॉलिवूडमधील लाडकी जोडी सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी यांच्या घरी आज एक खास आनंदाचा क्षण उजाडला आहे. १६ जुलै २०२५ रोजी कियाराने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, हे कपल आता पालक झाले आहे. मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये कियाराची सामान्य प्रसूती झाली असून आई-बाळ दोघीही ठणठणीत असल्याचे समजते.
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) खान तिच्या फॅशन आणि स्पष्टवक्तेपणासाठी नेहमीच चर्चेत असते. नुकतीच तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तिने चांदीची मराठमोळी कोल्हापुरी चप्पल घातलेली होती. करीना सध्या लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्टी घालवते असून, तिथून तिने एक आरामदायी फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या पायात चपला दिसत आहेत.
लोकप्रिय मॉडेल, अभिनेत्री आणि २००२ मध्ये गाजलेल्या ‘कांटा लगा’ रिमिक्समुळे संपूर्ण देशात प्रसिद्धीच्या झोतात आलेली शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) हिचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. अवघ्या ४२व्या वर्षी तिनं या जगाचा निरोप घेतल्याने बॉलिवूड आणि तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
राज्यात शाळांमधील हिंदी सक्तीच्या निर्णयावरून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिने एक वेगळीच भूमिका घेतली आहे. तिने मराठी भाषेतील एक विनोदी रील शेअर करून भाषेविषयीचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे. वेगवेगळ्या चकमकीत २४ नक्षलवादी मारले गेले. यादरम्यान एक सैनिक शहीद झाला आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्राला मोठा धक्का देणारा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) घेतला आहे. मुंबईत कार्यरत असलेल्या भवानी सहकारी बँकेवर आरबीआयने गंभीर आर्थिक स्थिती लक्षात घेऊन बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 अंतर्गत कडक निर्बंध लावले आहेत.
मंगळवार, ८ जुलै रोजी सोन्या (Gold) -चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ५९९ रुपयांनी वाढून ९७,१९५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला असून, जीएसटीसह याची किंमत १,००,११० रुपये झाली आहे. चांदीतही १,१५९ रुपयांची मोठी उसळी नोंदवली असून ती १,१०,९२० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
केंद्र सरकारकडून लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना महत्त्वाचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जुलै 2025 पासून महागाई भत्त्यात (DA) चार टक्क्यांची वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या 55 टक्के असलेला DA वाढून 59 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या कार्यकाळातील अंतिम वाढ ठरू शकते.
राज्यात १ जुलै २०२५ पासून नव्या वाहन कर (Vehicle tax) प्रणालीचा अंमल सुरू झाला आहे. यामुळे सर्व प्रकारच्या गाड्यांची ऑनरोड किंमत वाढणार आहे. विशेषतः सीएनजी व डिझेल वाहनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला अधिक झळ बसेल.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.
रमजानच्या (Ramadan) पवित्र महिन्याच्या आगमनाचा उत्साह लोकांमध्ये दिसून येतो. शुक्रवारी चंद्र दिसला नाही, त्यानंतर उलेमांनी घोषणा केली की रमजान महिन्याचा पहिला उपवास रविवार, २ मार्च रोजी असेल. यासाठी रमजान महिन्यातील पहिली सेहरी रविवारी सकाळी फजरच्या अजानपूर्वी केली जाईल.
Record breaking darshan of devotees in Ayodhya | नुकतेच प्रयागराजमध्ये भव्य-दिव्या महाकुंभ मेळ्याचा समारोप झाला. महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जाऊन राम दर्शन घेत होते. यामुळे अयोध्येतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.सुमारे लाखो भाविक दररोज राम दर्शन घेत आहेत.
Chaturmasya Kartik Festival from 10 November | समर्थ सद्गुरू श्री सीताराम महाराज दत्त दरबारतर्फे 10 ते 13 नोव्हेंबर असे सलग चार दिवस चातुर्मास्य कार्तिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चातुर्मासातील अखंड श्रीगुरुचरित्र सप्ताहनुष्ठान समाप्ती, तसेच कार्तिकोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या अंडर-19 वनडे मालिकेत वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर सर्वांची मने जिंकली. मालिकेत भारताने 3-2 असा विजय मिळवला, पण खरी चर्चा झाली ती सूर्यवंशीच्या तुफानी खेळीची.
IPL 2025 चा अंतिम सामना इतिहासात कोरला गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) ने अखेर आयपीएलचा चषक आपल्या नावावर केला. पंजाब किंग्जवर ६ धावांनी मिळवलेल्या विजयाने RCB ने तब्बल १८ वर्षांची प्रतीक्षा संपवली. पण या विजयाचा सगळ्यात भावनिक आणि अविस्मरणीय क्षण ठरला तो विराट कोहलीचा आनंदाश्रूंनी भरलेला सेलिब्रेशन.
आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला अवघ्या काही धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या पराभवाने फक्त संघाचंच नाही, तर टीमच्या सहमालकीण प्रिती झिंटाच्या (Preity Zinta) मनातही असह्य वेदना उमटल्या. सामन्यानंतरच्या क्षणी प्रिती झिंटाच्या डोळ्यांत आलेले अश्रू संपूर्ण स्टेडियम आणि लाखो चाहत्यांच्या मनाला स्पर्शून गेले.
भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे IPL (IPL)2025 हंगामाचे सामने स्थगित करण्यात आले होते. मात्र आता दोन्ही देशांमध्ये युद्धविराम जाहीर झाल्याने स्पर्धा पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL 2025 च्या हंगामाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला ‘ISIS कश्मीर’ या दहशतवादी संघटनेने थेट जीवे मारण्याची धमकी दिली असून, यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही धमकी मिळाल्याचं समोर आलं आहे.
भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि मराठमोळा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) याने (8 एप्रिल) अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधवने भाजपाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) व रीलस्टार धनश्री वर्मा यांचा पाच वर्षाचा संसार अखेर मोडला आहे.दोघांनीही आज घटस्फोटाची अधिकृत माहिती सोशल मीडियावर दिली. धनाश्री व युजवेंद्र यांच्या घटस्फोटामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Inter college handball competition | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग व ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन (महिला व पुरूष) हँडबॉल स्पर्धेचे शिव छत्रपती पुरस्कार विजेते मिलिंद माकडे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची खेळाडू मंजिरी तांबे (Manjiri Tambe) हिने जम्मू विद्यापीठ जम्मू येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत फाईल या वैयक्तिक गटात कांस्यपदक प्राप्त केले आहे.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
Will the Indian team make history | भारताच युवा क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असून तिथे दोन्ही देशात पाच कसोटींची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यास २० जून पासून सुरुवातही झाली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी करत ३०० च्या वर धावा काढल्या त्या ही फक्त तीन गडी गमावून. पहिल्याच दिवशी भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि नवनियुक्त कर्णधार शुभमन गिल यांनी शतके झळकावली. उपकर्णधार ऋषभ पंतने अर्धशतक झळकावले.
१ मे हा दिवस जागतिक कामगार दिन (World Labor Day) म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगभरातील कामगारांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. केवळ भारतातच नाही तर जगभरातील ८० हुन अधिक देशात या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते.