कोराडी (Koradi) औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या राखविषयक वापराबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेत कोराडी आणि खापरखेड़ा प्रकल्पांतून निर्माण होणारी कोळशाची राख आता सर्व उद्योजकांना मोफत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
कोतवाली (Kotwali) परिसरातील बुधवार बाजारजवळ बी-पार्क प्रकल्पाच्या बांधकामस्थळी शनिवारी सकाळी मोठा अपघात घडला. नागपूर महापालिकेच्या बी-पार्क प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या खोदकामादरम्यान पाइल अचानक घसरून दोन पोकलेन मशीनवर कोसळली. या घटनेत तीन कामगार जखमी झाले असून, प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
NMC takes action against absent sanitation workers | लक्ष्मीनगर झोनमधील वार्ड क्रमांक १६ मधील सोमलवाडा हजेरी स्टँडवर अनुपस्थित आढळलेल्या पाच स्वच्छता कर्मचाऱ्यांवर नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. याआधीही कामावर अनुपस्थित राहणाऱ्या ९६ स्वच्छता कर्मचाऱ्यांवर मनपाने कारवाई केली होती.
नागपूर पोलिसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत कामठी परिसरात एक भव्य अमली पदार्थविरोधी जनजागृती रॅलीचे (Anti drug awareness rally) आयोजन करण्यात आले. या रॅलीत नागपूरचे पालकमंत्री आणि पोलिस आयुक्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
२५ जून १९७५ रोजी देशात लागू झालेल्या आपत्कालाच्या (Emergency) ५० वर्षांनंतरही त्या काळातील आठवणी आजही ताज्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नागपूर महानगरतर्फे याच दिवशी, म्हणजेच येत्या २५ जून रोजी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
नागपूरमध्ये (Nagpur) अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टीतील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घर आणि मालकी हक्क देण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतला असून, त्याअंतर्गत ४२६ झोपडपट्टीधारकांना घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'प्रधानमंत्री सूर्यघर योजने' (PM Suryaghar scheme) अंतर्गत नागपूर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 33,641 घरांवर सौर पॅनल्स बसवले गेले आहेत. ही संख्या राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा सर्वाधिक आहे.
नागपूर जिल्ह्यातील भीलगाव खैरी (Bhilgaon Khairi) परिसरात मंगळवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. येथील ‘अंकित पल्प्स अॅन्ड बोर्ड्स’ या मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज तयार करणाऱ्या कंपनीच्या डी-ॲक्शन विभागात अचानक स्फोट झाला. या स्फोटात एक कामगाराचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
कोच्चीहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटला बॉम्बने (Bomb) उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर मंगळवारी सकाळी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने लँडिंग करण्यात आलं. विमानात एकूण १५७ प्रवासी व क्रू सदस्य होते.इंडिगोची फ्लाइट क्रमांक 6E 2706 सकाळी 9.20 वाजता कोच्चीहून दिल्लीसाठी रवाना झाली होती.
नागपूरच्या औद्योगिक नकाशावर आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उमटणार आहे. मॅक्स एरोस्पेस (Max Aerospace) अँड एव्हिएशन प्रा. लि. ही खासगी कंपनी राज्य सरकारच्या सहकार्याने नागपूरमध्ये ८ हजार कोटी रुपयांचा हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प उभारणार आहे.
Police raid sex racket in Nagpur Hotel Sargam | शहरातील वाठोडा भागातील बिडगाव परिसरात असलेल्या हॉटेल सर्गममध्ये सुरू असलेल्या देहव्यापार रॅकेटवर नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (SSB) मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही धडक कारवाई १ जुलै रोजी दुपारी तीन वाजता सुरू होऊन सायंकाळी साडेसातपर्यंत सुरू होती.
राज्यभरात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी (School ID scam) आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातून गुरुवारी करण्यात आलेल्या या अटकेमुळे प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत.
Accident in Nagpur Youth dies after falling under NMC garbage truck | शहरातील वाठोडा परिसरात शुक्रवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याच दुचाकीवर मागे बसलेली महिला आणि १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाले. तिघंही एका दुचाकीवरून जात असताना, डंपिंग यार्डजवळ मनपाच्या कचरा संकलन करणाऱ्या ट्रकची धडक बसली.
समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) पुन्हा एकदा अपघाताची गंभीर घटना घडली आहे. नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा या अपघातात मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी आणि दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत.
वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) लावणं अनिवार्य करण्यात आलं असून, जुन्या वाहनांनाही ही अट लागू करण्यात आली आहे. मात्र, अनेक वाहनधारकांनी अद्याप हा नियम पाळलेला नाही, त्यामुळे परिवहन विभागाने आता कठोर भूमिका घेतली आहे.
उत्तराखंडमधील (Uttarakhand) पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, यमुनोत्री धामजवळील जानकीचट्टी या भागात गेले चार दिवसांपासून सुमारे १५० मराठी पर्यटक अडकले आहेत. दरड कोसळून रस्ते बंद झाल्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग बंद झाला आहे.
भारत निवडणूक आयोगाने (Election Commission) देशभरातील निष्क्रिय आणि नियमभंग करणाऱ्या राजकीय पक्षांवर कडक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. तब्बल 345 नोंदणीकृत परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची (RUPPs) नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदाय भारताच्या बाजूने उभा राहिल्याचे दिसून येत आहे. FATF (Financial Action Task Force) ने या हल्ल्यासाठी आर्थिक पुरवठा झाल्याचे स्पष्ट संकेत देत पाकिस्तानला फटकारलं आहे.
इराणमधील (Iran) तणावपूर्ण परिस्थितीमुळे सुमारे १५०० भारतीय विद्यार्थी तिथे अडकले असून, त्यांचा आपल्या कुटुंबीयांशी संपर्क तुटला आहे. इस्रायलने इराणवर जोरदार हवाई हल्ले सुरू केल्याने देशात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. इंटरनेट सेवा बंद असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
भारताविरोधी कट्टर कारवायांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या जैश-ए-मोहम्मद (Jaish e Mohammed) या दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ नेता मौलाना अब्दुल अजीज इसार याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर गुप्तचर यंत्रणा आणि दहशतवादी नेटवर्कमध्ये खळबळ उडाली आहे.
विधान परिषदेचे भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी एका मोठ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश करत राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. लाड यांनी विधान परिषदेत माहिती दिली की, त्यांच्या नावाने बनावट लेटरहेड तयार करून ३.२० कोटी रुपयांचा सरकारी निधी बीड जिल्ह्यासाठी वर्ग करण्याचा प्रयत्न काहींनी केला.
हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात उभ्या राहिलेल्या मराठी जनतेच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. सरकारने हिंदी सक्ती संदर्भातील जीआर मागे घेतला आहे. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदात बदल झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळाचा आढावा घेत कार्यकर्त्यांसाठी एक हृदयस्पर्शी पत्र लिहिलं आहे. रविंद्र चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्तीनंतर बावनकुळे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानत आणि दिलगिरी व्यक्त करत भावनिक शब्दांत निरोप दिला आहे.
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाविषयी सुरू असलेल्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला असून, आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या रूपाने पक्षाला नवे नेतृत्व मिळाले आहे. वरळी डोम, मुंबई येथे पार पडलेल्या भव्य समारंभात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत चव्हाण यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली.
आगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) पक्षाने बंडखोर नेत्यांना पुन्हा पक्षात सामावून घेण्याची मोहीम सुरू केली आहे. याच अनुषंगाने मंगळवारी काँग्रेसने ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजेंद्र मूळक यांचे निलंबन रद्द करत त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेतले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) पक्षाला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी आमदार कुणाल पाटील हे आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
राज्य सरकारच्या शक्तिपीठ हायवे प्रकल्पाविरोधात राज्यभरातून तीव्र विरोध होत असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “शेतकऱ्यांची जमीन म्हणजेच खरी शक्तिपीठ आहे,” असा पुनरुच्चार करत त्यांनी हायवे प्रकल्पाच्या विरोधात जनआंदोलन उभं करण्याचा इशारा दिला.
Opposition boycotts proceedings of Legislative Assembly | राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस शेतकरी प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर गाजला. सत्ताधाऱ्यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्यांचा निषेध नोंदवत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर जोरदार आवाज उठवत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला आणि अध्यक्षांनी त्यांना एका दिवसासाठी निलंबित केलं.
भाजपला (BJP) लवकरच नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे. या पदासाठी रविंद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर प्रमुख भाजप नेते उपस्थित होते. उद्या संध्याकाळी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.
लोकप्रिय मॉडेल, अभिनेत्री आणि २००२ मध्ये गाजलेल्या ‘कांटा लगा’ रिमिक्समुळे संपूर्ण देशात प्रसिद्धीच्या झोतात आलेली शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) हिचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. अवघ्या ४२व्या वर्षी तिनं या जगाचा निरोप घेतल्याने बॉलिवूड आणि तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
राज्यात शाळांमधील हिंदी सक्तीच्या निर्णयावरून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिने एक वेगळीच भूमिका घेतली आहे. तिने मराठी भाषेतील एक विनोदी रील शेअर करून भाषेविषयीचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
कॉमेडीच्या दुनियेत आपलं अढळ स्थान निर्माण करणारा कपिल शर्मा (Kapil Sharma) ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नव्या पर्वामुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. पहिल्याच भागात सलमान खानची उपस्थिती, नवज्योत सिंग सिद्धूंचं पुनरागमन आणि नेहमीसारखाच हास्याचा धमाका यामुळे शोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
भारताच्या सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शोंपैकी एक असलेला ‘बिग बॉस’ (Bigg Boss) आता आपल्या 19व्या पर्वासाठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. सलमान खानच्या करिष्म्याच्या साथीने या शोने अनेकदा टीआरपीच्या यादीत आघाडी घेतली आहे. यंदाचा हंगामही तितकाच रोचक ठरणार असल्याचं संकेत मिळत आहेत.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे. वेगवेगळ्या चकमकीत २४ नक्षलवादी मारले गेले. यादरम्यान एक सैनिक शहीद झाला आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
राज्यात १ जुलै २०२५ पासून नव्या वाहन कर (Vehicle tax) प्रणालीचा अंमल सुरू झाला आहे. यामुळे सर्व प्रकारच्या गाड्यांची ऑनरोड किंमत वाढणार आहे. विशेषतः सीएनजी व डिझेल वाहनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला अधिक झळ बसेल.
सोन्याच्या (Gold) दरात आज पुन्हा एकदा झपाट्याने वाढ झाली आहे. शेअर बाजारातील अस्थिरता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मागणीमुळे सोन्याच्या किमतीत तब्बल 540 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. चांदीही या तेजीपासून दूर राहिली नाही. तिच्या दरात 595 रुपयांनी वाढ झाल्याने, बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंनी उडी घेतली आहे
सामान्य जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये ०.५० टक्क्यांची कपात करत ही दर आता ५.५०% वर आणली आहे. त्यामुळे लवकरच गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या EMI मध्ये घट होण्याची शक्यता आहे.
IMF predicts India is economic superpowerit will overtake even Japan | जगभरात आर्थिक अनिश्चिततेचं वातावरण असतानाही भारताने स्थिरतेची आणि प्रगतीची दिशा पकडली आहे. रिझर्व्ह बँकेच्या एप्रिल महिन्यातील “अर्थव्यवस्थेची स्थिती” या अहवालात देशाच्या आर्थिक वाढीच्या प्रवासाला सकारात्मक पोषक परिस्थिती असल्याचं चित्र उभं राहिलं आहे.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.
रमजानच्या (Ramadan) पवित्र महिन्याच्या आगमनाचा उत्साह लोकांमध्ये दिसून येतो. शुक्रवारी चंद्र दिसला नाही, त्यानंतर उलेमांनी घोषणा केली की रमजान महिन्याचा पहिला उपवास रविवार, २ मार्च रोजी असेल. यासाठी रमजान महिन्यातील पहिली सेहरी रविवारी सकाळी फजरच्या अजानपूर्वी केली जाईल.
Record breaking darshan of devotees in Ayodhya | नुकतेच प्रयागराजमध्ये भव्य-दिव्या महाकुंभ मेळ्याचा समारोप झाला. महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जाऊन राम दर्शन घेत होते. यामुळे अयोध्येतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.सुमारे लाखो भाविक दररोज राम दर्शन घेत आहेत.
Chaturmasya Kartik Festival from 10 November | समर्थ सद्गुरू श्री सीताराम महाराज दत्त दरबारतर्फे 10 ते 13 नोव्हेंबर असे सलग चार दिवस चातुर्मास्य कार्तिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चातुर्मासातील अखंड श्रीगुरुचरित्र सप्ताहनुष्ठान समाप्ती, तसेच कार्तिकोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
IPL 2025 चा अंतिम सामना इतिहासात कोरला गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) ने अखेर आयपीएलचा चषक आपल्या नावावर केला. पंजाब किंग्जवर ६ धावांनी मिळवलेल्या विजयाने RCB ने तब्बल १८ वर्षांची प्रतीक्षा संपवली. पण या विजयाचा सगळ्यात भावनिक आणि अविस्मरणीय क्षण ठरला तो विराट कोहलीचा आनंदाश्रूंनी भरलेला सेलिब्रेशन.
आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला अवघ्या काही धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या पराभवाने फक्त संघाचंच नाही, तर टीमच्या सहमालकीण प्रिती झिंटाच्या (Preity Zinta) मनातही असह्य वेदना उमटल्या. सामन्यानंतरच्या क्षणी प्रिती झिंटाच्या डोळ्यांत आलेले अश्रू संपूर्ण स्टेडियम आणि लाखो चाहत्यांच्या मनाला स्पर्शून गेले.
भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे IPL (IPL)2025 हंगामाचे सामने स्थगित करण्यात आले होते. मात्र आता दोन्ही देशांमध्ये युद्धविराम जाहीर झाल्याने स्पर्धा पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL 2025 च्या हंगामाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला ‘ISIS कश्मीर’ या दहशतवादी संघटनेने थेट जीवे मारण्याची धमकी दिली असून, यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही धमकी मिळाल्याचं समोर आलं आहे.
भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि मराठमोळा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) याने (8 एप्रिल) अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधवने भाजपाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) व रीलस्टार धनश्री वर्मा यांचा पाच वर्षाचा संसार अखेर मोडला आहे.दोघांनीही आज घटस्फोटाची अधिकृत माहिती सोशल मीडियावर दिली. धनाश्री व युजवेंद्र यांच्या घटस्फोटामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Inter college handball competition | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग व ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन (महिला व पुरूष) हँडबॉल स्पर्धेचे शिव छत्रपती पुरस्कार विजेते मिलिंद माकडे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची खेळाडू मंजिरी तांबे (Manjiri Tambe) हिने जम्मू विद्यापीठ जम्मू येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत फाईल या वैयक्तिक गटात कांस्यपदक प्राप्त केले आहे.
BCCI Abolishes Impact Player Rule | आयपीएलच्या शेवटच्या हंगामात इम्पॅक्ट प्लेयर अनेक वादांचा विषय ठरला होता. अनेक बड्या खेळाडूंनी या नियमाविरोधात विधाने केली. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या नियमाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धांमधून इम्पॅक्ट प्लेयर हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
Will the Indian team make history | भारताच युवा क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असून तिथे दोन्ही देशात पाच कसोटींची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यास २० जून पासून सुरुवातही झाली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी करत ३०० च्या वर धावा काढल्या त्या ही फक्त तीन गडी गमावून. पहिल्याच दिवशी भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि नवनियुक्त कर्णधार शुभमन गिल यांनी शतके झळकावली. उपकर्णधार ऋषभ पंतने अर्धशतक झळकावले.
१ मे हा दिवस जागतिक कामगार दिन (World Labor Day) म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगभरातील कामगारांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. केवळ भारतातच नाही तर जगभरातील ८० हुन अधिक देशात या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते.