भारतीय राज्यघटनेने (Indian Constitution) दिलेली विधीमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय पालिका ही शक्तीस्थळे आपल्या देशाच्या विविधतेत एकता राखण्यास मोलाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन राज्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी संविधान दिनानिमित्त आयोजित भव्य रॅलीच्या शुभारंभप्रसंगी केले.
शिख धर्माचे नववे गुरु श्री गुरू तेग बहादूर साहिब यांच्या 350 व्या बलिदान दिनानिमित्त येत्या 7 डिसेंबरला नारा येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंद दी चादर (Hind ki Chadar) या कार्यक्रमासाठी सुमारे 5 लाख भाविक अपेक्षित असून त्यांच्यासाठी विविध सेवाने परिपूर्ण असलेल्या भव्य मंडप व कार्यक्रम स्थळाचे भूमिपूजन राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
‘एग्रो विजन’ या महत्त्वाच्या कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatreya Bharane) आज नागपुरात दाखल झाले. प्रदर्शनाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत शेतकऱ्यांच्या विविध अडचणी, नाफेड खरेदी आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर स्पष्ट भूमिका मांडली.
महापालिका निवडणुकांची चाहूल लागताच प्रभाग २३ मध्ये राजकीय समीकरणे नव्याने आकार घेऊ लागली आहेत. याच प्रभागातील सर्वसाधारण जागेसाठी तृतीयपंथीय समाजातील राणी ढवळे (Rani Dhawale) यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळावी, अशी औपचारिक मागणी केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आपली इच्छा व्यक्त केल्याची माहिती पुढे आली आहे.
कामठीची ओळख आणि अभिमान ठरलेलं जागतिक दर्जाचं ड्रॅगन पॅलेस (Dragon Palace) मंदिर यंदा आपल्या २६ व्या वर्धापनदिनाच्या औचित्याने भक्तिभाव, श्रद्धा आणि भव्यतेने उजळून निघालं. या विशेष प्रसंगी मंदिर प्रमुख व माजी मंत्री सुलेखा कुंभारे, तसेच जपानमधील ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत विशेष बुद्ध वंदनेने महोत्सवाचा प्रारंभ झाला.
नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दहावी उत्तीर्ण होऊन अकरावी-बारावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या ५० मेधावी विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०,००० रुपयांची आर्थिक मदत देण्यास मंजुरी दिली आहे. ही रक्कम दरवर्षी दोन हप्त्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे.
शेतकरी आंदोलन आणि न्यायव्यवस्थेविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी माजी आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांना बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने चांगलंच सुनावलं. न्यायालयाने स्पष्ट सांगितले की, लोकशाहीत आंदोलन करणे हा मूलभूत अधिकार असला तरी ते शिस्तीत आणि शांततेतच व्हायला हवे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार तुमसर नगरपरिषद (Tumsar Municipal Council) सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीचा तपशील निवडणूक निर्णय अधिकारी जनार्धन लोंढे (उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, भंडारा) यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि नगरपरिषद मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण उपस्थित होते.
नागपूर (Nagpur) शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक हरित आणि शाश्वत करण्यासाठी महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोराडी येथील ‘आपली बस’ ई-बस डेपोमध्ये 33 केव्ही/0.433 केव्ही क्षमतेचे अत्याधुनिक वीज सबस्टेशन उभारण्यात आले असून, त्याचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद (Nagar Parishad) आणि नगर पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. निवडणुका मुक्त, निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नागपूर (Nagpur) गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या सीमेत असलेल्या गरिखाना कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी उशिरा रात्री प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादाने जीव घेतला. 24 वर्षीय अमन मेश्राम या तरुणाचा चाकूच्या वारांमुळे मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
कळमेश्वर तालुक्यातील शंकरपट गावात रविवारी आयोजित साक्षगंधाच्या कार्यक्रमानंतर (Engagement ceremony) अचानक तणाव निर्माण झाला. कुटुंबातील जुन्या वादाचा ठिणगी पेटताच मारहाण आणि गोळीबार झाला. या धक्कादायक घटनेत एक युवक गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी तातडीच्या कारवाईत सात आरोपींना अटक केली आहे.
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने “ऑपरेशन शक्ती” अंतर्गत अजनी परिसरात धडक कारवाई करून स्पा सेंटरमध्ये सुरू असलेला देहव्यापाराचा (Prostitution) प्रकार उघडकीस आणला. पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले असून एका तरुणीची मुक्तता करण्यात आली आहे.
खापरखेडा (Khaparkheda) परिसरात शुक्रवारी घडलेल्या एका हृदयद्रावक प्रसंगाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. केवळ मोबाईल फोन मिळाला नाही, या कारणावरून १३ वर्षीय आठवीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने कुटुंबीयांसह समाजात प्रचंड दु:ख व चिंता निर्माण झाली आहे.
देशभरात संविधान दिनाचा (Constitution Day) उत्साह उसळला असताना, जुन्या संसद भवनातील मध्यवर्ती सभागृहात भव्य राष्ट्रीय कार्यक्रम पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अध्यक्षस्थानी असून, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य आणि दोन्ही सभागृहांचे खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परस्पर संमतीने सुरू झालेल्या प्रेमसंबंधांचा शेवट झाला म्हणून त्याला गुन्हा ठरवण्याचा प्रयत्न होऊ शकत नाही, असा स्पष्ट निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एका महत्त्वाच्या निर्णयातून मांडला. एका वकिलाविरुद्ध दाखल झालेल्या प्रकरणात कोर्टाने गुन्हा रद्द करत स्पष्ट केले की, स्वेच्छेने जुळलेले नाते तुटणे हा ‘बलात्कार’ ठरू शकत नाही.
भारतातील हवामान पुन्हा सक्रिय झाले असून भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा (Heavy rains) इशारा दिला आहे. २५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत देशाच्या अनेक भागांत पाऊस वाढण्याचे संकेत आहेत. वायव्य आणि मध्य भारतात तापमानात विशेष बदल होणार नसला, तरी दक्षिण आणि पूर्वेकडील प्रदेशांमध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे.
बांगलादेशच्या राजकीय इतिहासात अभूतपूर्व अशी घटना घडली आहे. देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केलेल्या कठोर दडपशाहीदरम्यान झालेल्या १४०० नागरिकांच्या मृत्यूचे जबाबदार म्हणून न्यायालयाने त्यांना दोषी मानले.
माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केलेल्या एका विधानाने जागतिक पातळीवर खळबळ उडवली आहे. ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, “पाकिस्तान गुप्तपणे अणु चाचण्या करत आहे.” या वक्तव्यामुळे दक्षिण आशियात, विशेषतः भारतात, चिंता व्यक्त केली जात आहे.
गाझा (Gaza) पट्टीत पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, इस्रायलने काल उशिरा रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांत किमान ६० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. इस्रायलने हे हल्ले अशा वेळी केले जेव्हा पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासविरोधात तीव्र कारवाईचे आदेश दिले होते. इस्रायलकडून युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप हमासवर करण्यात आला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. खासकरून महानगरपालिकांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याच्या आतच राजकीय पक्ष आपल्या तळीने प्रयत्न करत आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीण मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर (Prakash Bhoir) यांनी अचानक राजीनामा दिल्याने मनसेत धक्क्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मालवणमध्ये भाजप कार्यकर्ता विजय केनवडकर यांच्या निवासस्थानी झालेल्या तपासाबाबत निलेश राणे (Nilesh Rane) करत असलेल्या टीकेवर भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. “हा विषय चुकीच्या पद्धतीने सादर केला जात आहे,” असे ते म्हणाले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना डॉक्टरांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही दिवस विश्रांती घेण्याचा कडक सल्ला दिल्यानंतर ते राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांपासून दूर होते. ही माहिती राऊत यांनी स्वतः सोशल मीडियावरून जाहीर केली आणि त्यानंतर अनेक नेत्यांनी वैयक्तिक पातळीवर त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यास सुरुवात केली.
महाराष्ट्रातील आगामी निकाय निवडणुकांना वेग आला असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजप सरकारवर थेट निशाणा साधला आहे. भाजपने मोठ्या संख्येने उमेदवार निर्विरोध निवडून आणल्याच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता मनसे-शिवसेना युतीचा मुद्दा पुन्हा एकदा जोरात चर्चेत आला आहे. काँग्रेसने “मनसेला महाविकास आघाडीत स्थान मिळणार नाही” असा ठाम पवित्रा घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नवी खळबळ उडाली आहे.
आगामी पालिका निवडणुकीत भाजप–शिवसेना युतीला रोखण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) हातमिळवणी केली असली, तरी उमेदवारी जाहीर करताच या नव्या युतीत अंतर्गत नाराजी उसळल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः मनसेच्या ११ उमेदवारांना प्राधान्य दिल्याने उबाठा गटातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला आहे.
महाराष्ट्रातील सत्तासमीकरणांना अचानक वेग आला असून, शिवसेना (एकनाथ शिंदे) गट आणि भाजप (BJP) यांच्यातील तणाव पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे. सामना दैनिकाच्या अग्रलेखात केलेल्या टीकात्मक भाष्यामुळे महायुतीच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. या अग्रलेखात असा दावा करण्यात आला आहे की, शिंदेंच्या नेतृत्वाबद्दल भाजपकडून असमाधान वाढले असून, त्यांच्या गटातील तब्बल ३५ आमदार भाजपात जाण्याचे प्रयत्न वेगात सुरू आहेत.
गोंदिया नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मतदारांना धाडसी संदेश दिला आहे. आज गोंदियात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पटेल यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “उमेदवारांची कुंडली पाहूनच मतदान करा; चुकीची निवड झाली, तर पुढील काळात नगर परिषद विक्रीला जाण्यापासून कोणताही शक्ती वाचवू शकणार नाही.”
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आज पुन्हा एकदा बोचरी टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी शिंदेंची थेट खिल्ली उडवत म्हटले की, “दिल्लीचे बूट चाटत फिरणाऱ्यांना मराठा म्हणणे पराकाष्ठेचा विनोद आहे. दरवेळेला मुजरे मारणाऱ्यांनी शिवसेनाप्रमुखांचे विचार कसे काय पुढे न्यायचे?”
शिवसेनेने (Shiv Sena) पूर्व विदर्भातील राजकीय समीकरणांमध्ये नवीन ऊर्जा ओतणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागपूरसह संपूर्ण प्रदेशातील उत्तर भारतीय समाजाशी थेट संपर्क वाढवण्यासाठी उत्तर भारतीय सेलच्या समन्वयकपदी उत्तर भारतीय चेहरा म्हणून सुमुख मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रेक्षकांच्या उत्कंठेला शिगेला पोहोचवणाऱ्या ‘पती पत्नी और पंगा’ (Pati Patni Aur Panga) या लोकप्रिय कपल रिअॅलिटी शोचा भव्य समारोप पार पडला असून रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला या लाडक्या सेलिब्रिटी जोडप्याने विजेतेपदाची ट्रॉफी आपल्या नावे केली आहे.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल १२ दिवसांच्या उपचारांनंतर अखेर त्यांना घरी सोडण्यात आले असून डॉक्टर त्यांच्यावर घरच्या घरी उपचार करत आहेत. या काळात त्यांचा मुलगा सनी देओल (Sunny Deol) स्वतः वडिलांची काळजी घेत आहे.
बॉलीवूडमधील दिग्गज कलाकार धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
माजी मंत्री आणि शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर सध्या त्यांचा आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री भुमी पेडणेकर यांचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. दोघेही मुंबईतील वांद्रे परिसरातील एका रेस्टोरंटमध्ये एकत्र दिसले असून, या व्हिडीओने नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या जोरदार चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. विशेष नक्षलविरोधी मोहिमेत सहभागी असलेले DRG चे पथक बेज्जी–चिंतागुफा परिसरातील दुर्गम जंगल पट्ट्यात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढवला.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) सरकार खाजगी कंपन्यांमधील कामगारांसाठी महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. राज्यात कामाचे तास सध्याच्या ९ तासांऐवजी १० तास करण्याचा विचार सुरु असून, ही माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
मुलीच्या (Girl) शिक्षणासाठी किंवा पुढील आयुष्यातील मोठ्या खर्चांसाठी सुरक्षित, स्थिर आणि खात्रीशीर गुंतवणूक शोधत असाल, तर सुकन्या समृद्धी योजना हा सध्या उपलब्ध असलेला सर्वात विश्वासार्ह पर्याय मानला जातो. केंद्र सरकार चालवणारी ही योजना पूर्णपणे सुरक्षित असून व्याजदर हमीदार आहे. 2025 साली योजनेचा व्याजदर 8.2% इतका निश्चित करण्यात आला आहे.
दिवाळीनंतर (Gold) सोनं आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. काही दिवसांपूर्वी भाव वाढल्यानंतर आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. उलट चांदीच्या किमतींनी वाढ दाखवली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि दागिने घेणाऱ्यांसाठी हा महत्वाचा आर्थिक संकेत मानला जात आहे.
तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असताना, सोन्याच्या (Gold) दरात झालेली घसरण ही ग्राहकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने घट होत असून, लग्नसराईच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
नोव्हेंबर (November) महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे आर्थिक काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी सुट्ट्यांचे नियोजन जरूर करा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नोव्हेंबर 2025 साठी प्रसिद्ध केलेल्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार देशभरातील बँका एकूण १३ दिवस बंद राहणार आहेत.
आज, २१ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार), दिवाळीचा (Diwali) सर्वात उत्साहवर्धक आणि शुभ दिवस — लक्ष्मीपूजनाचा दिवस साजरा केला जात आहे. हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावास्येच्या या पवित्र दिवशी धन, समृद्धी आणि आनंदाची आराधना केली जाते. देशभरात आज संध्याकाळी माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि कुबेर यांच्या पूजनाने घराघरांत मंगल वातावरण निर्माण होणार आहे.
हिंदू धर्मातील एक प्रमुख सण, दसरा (Dussehra), दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपासना व भक्तीनंतर हा दिवस विशेष महत्त्वाचा ठरतो. देशभरात मंदिरे, घरे आणि सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
नवरात्र (Navratri) म्हटलं की आपल्या मनात लगेच उपवास, साबुदाणा खिचडी, कुट्टू पुरी, फळाहार आणि सात्विक जेवण डोळ्यांसमोर उभं राहतं. देशभरातील अनेक भागांत नवरात्र म्हणजे संयम, कांदा-लसूण वर्ज्य आणि मांसाहार पूर्णतः टाळण्याचा काळ असतो.
Amazing places associated with mythological story of Goddess Sati | भारत ही मंदिरांची आणि देवस्थानांची भूमी मानली जाते. महाराष्ट्रात विशेषतः ‘साडेतीन शक्तीपीठे’ म्हणून ओळखली जाणारी चार मंदिरे – तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुकामाता आणि वणीची सप्तशृंगी देवी – यांना धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे.
आयसीसी महिला विश्वचषक जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) यांनी आपल्या अधिकृत निवासस्थानी सत्कार केला. बुधवारी सायंकाळी ६ वाजता ७ लोक कल्याण मार्ग येथे झालेल्या या विशेष भेटीत मोदींनी संघातील प्रत्येक खेळाडूशी संवाद साधत त्यांचे मनापासून अभिनंदन केले.
महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल असा २०२५ चा विश्वविजय भारतीय महिलांनी आपल्या जिद्दीने आणि एकतेने साध्य केला आहे. या ऐतिहासिक पराक्रमाचा गौरव वाढवताना बीसीसीआयने (BCCI) तब्बल ५१ कोटी रुपयांचे पारितोषिक घोषित करत महिला क्रिकेटच्या गौरवकथेला नवा अध्याय जोडला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian women Cricket team) रविवारी इतिहास घडवत आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकावर आपले नाव कोरले. दमदार खेळ आणि अदम्य जिद्दीच्या जोरावर ‘वुमन इन ब्लू’ने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावले. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्व क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहिला.
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (२८ सप्टेंबर) आशिया कप (Asia Cup) २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला ५ विकेट्सने हरवून ट्रॉफी आपल्या नावावर केली. या सामन्याने भारतासाठी विशेष महत्त्व ठेवले कारण भारताने या स्पर्धेत पाकिस्तानवर सलग तीन विजय मिळवले – साखळी फेरी, सुपर फोर आणि अंतिम सामन्यात.
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत गांगुली यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पॅनेल विजयी झाले.
आशिया चषक (Asia Cup) टी-२० स्पर्धेतील थरार आता खऱ्या अर्थाने वाढणार आहे. शनिवारपासून सुपर-फोर फेरीला सुरुवात होणार असून रविवारी पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची प्रतीक्षा चाहत्यांना लागली आहे.
भारत-पाकिस्तान क्रिकेटमध्ये मैदानावरची धडक जितकी तुफानी असते, तितकीच निवृत्त खेळाडूंच्या वक्तव्यांमधूनही रंगतदार वाद निर्माण होत असतात. नुकताच असा एक किस्सा समोर आला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) आणि भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा मैदानावरील कामगिरीपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पत्नी नताशा स्टॅन्कोविकपासून विभक्त झाल्यानंतर त्याचे नाव अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्ससोबत जोडले गेले होते. काही काळापूर्वी ब्रिटिश सिंगर जास्मिन वालियाशी त्याचा संबंध असल्याच्या चर्चा झाल्या होत्या.
क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर अलीकडेच विवाहबंधनाकडे पहिले पाऊल टाकत साखरपुड्याच्या सोहळ्यात सहभागी झाला. १३ ऑगस्ट रोजी मुंबईतील खास आणि निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात अर्जुनची बालपणीची मैत्रीण सानिया चंडोक हिच्यासोबत त्याचा साखरपुडा पार पडला.
नागपूरच्या तेजस्वी बुद्धिबळपटू दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने भारतीय बुद्धिबळ क्षेत्राला ऐतिहासिक यश मिळवून दिलं आहे. रविवारी पार पडलेल्या 2025 फिडे महिला वर्ल्ड चेस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिव्याने ज्येष्ठ खेळाडू कोनेरू हम्पीचा पराभव करत विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.
८ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक साक्षरता (Literacy) दिन म्हणून साजरा केला गेला. मानवी समाज सुसंस्कृत बनून समाजाचे शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांपासून अज्ञानी लोकांची होणारी पिळवणूक, फसवणूक, शोषण आदीपासून मुक्तता व्हावी.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.
Will the Indian team make history | भारताच युवा क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असून तिथे दोन्ही देशात पाच कसोटींची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यास २० जून पासून सुरुवातही झाली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी करत ३०० च्या वर धावा काढल्या त्या ही फक्त तीन गडी गमावून. पहिल्याच दिवशी भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि नवनियुक्त कर्णधार शुभमन गिल यांनी शतके झळकावली. उपकर्णधार ऋषभ पंतने अर्धशतक झळकावले.