राज्यात गेल्या काही दिवसांत पावसाचा (Rain) जोर कमी झाला असला तरी हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. सोमवारी राज्यातील दहा जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, बुधवारपासून पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषत: विदर्भातील काही भागांना अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.
मराठा साम्राज्याची अमूल्य धरोहर आणि नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजा रघुजी भोसले (Raghuji Bhosale) यांची ऐतिहासिक तलवार आता अधिकृतपणे महाराष्ट्राच्या मालकीची झाली आहे. लंडनमध्ये झालेल्या नीलामीत ही तलवार राज्य सरकारने २९ एप्रिल रोजी विकत घेतली होती.
कोराडी (Koradi) येथील श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थानातील बांधकामाधीन महाद्वाराचा स्लॅब कोसळल्याच्या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. रविवारी त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
सायबर गुन्ह्यांच्या बळी ठरलेल्या नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागपूर पोलिसांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १० कोटी रुपयांची परतफेड करण्यात आली. या कार्यक्रमात सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘गरुड दृष्टि’ (Garud Drishti) या अभिनव प्रकल्पाचे महत्त्व विशेषतः अधोरेखित करण्यात आले.
नागपूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी (Sanitation worker) राजू उपाध्ये यांच्या आत्महत्येनंतर आशी नगर परिसरात तीव्र जनक्षोभ उसळला आहे. मृतदेह झोन कार्यालयासमोर ठेवून कुटुंबीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन छेडले असून, संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“धर्म (Religion) म्हणजे केवळ ईश्वरपूजा नव्हे, तर तो सामाजिक जबाबदारीची आणि माणुसकीची शिकवण देणारा मार्ग आहे,” असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. नागपूर येथे ‘धर्म जागरण न्यास’च्या प्रांतीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सहकार नगर परिसरातील बिनपरवाना चिकन-मटन विक्री केंद्रांवर कारवाई होत नसल्यामुळे संतप्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) थेट नागपूर महापालिकेच्या झोन-एक कार्यालयात धडक दिली. या आंदोलनात मनसे कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्तांना जिवंत कोंबड्यांची भेट देत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
नागपूर शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या सीताबर्डी टनेल (Sitabardi Tunnel) प्रकल्पावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तात्पुरती स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला असून प्रकल्पाच्या अंमलबजावणीला सध्या अडथळा निर्माण होणार नाही.
शहरात मान्सूनची (Monsoon) गती पुन्हा मंदावल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा प्रचंड वाढला आहे. गेल्या काही दिवसांत पावसाने पाठ फिरवली असून त्याचा परिणाम नागपूरच्या तापमानात थेट दिसून येतो आहे. सध्या शहराचं कमाल तापमान ३४ अंश सेल्सियसच्या वर गेले असून, किमान तापमानदेखील २५ अंशांपेक्षा अधिक आहे.
नागपूरच्या गोरेवाडा (Gorewada) आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेने एकच खळबळ उडवली आहे. बुधवारी रात्री झूच्या संरक्षित परिसरात अचानक एका जंगलातून आलेल्या नर बिबट्याने प्रवेश केला आणि पिंजऱ्यात असलेल्या मादी बिबट्यावर थेट हल्ला चढवला.
Woman lost her life after her hair got stuck in a cotton processing machine in Nagpur | कोतवाली परिसरात रविवारी घडलेल्या भीषण अपघातात ४० वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला. काम सुरू असताना तिचे केस कापूस प्रक्रिया करणाऱ्या मशीनमध्ये अडकले आणि त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) हिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निजामुद्दीन भागात गुरुवारी (७ ऑगस्ट) रात्री पार्किंगच्या किरकोळ कारणावरून तिच्या चुलत भावाचा खून करण्यात आला. आसिफ कुरेशी (वय अंदाजे ४०) याच्यावर दोन तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला करत त्याचा जीव घेतला.
नागपूरच्या (Nagpur) गुन्हेगारी क्षेत्राला हादरवणारी घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजीव गांधी नगर परिसरातील पुलाखाली कुख्यात गुंड समीर शेख ऊर्फ येडा शमशेर (वय ३०) याचा निर्घृण खून करण्यात आला.
शहरातील नरेंद्र नगर परिसरातील लोटस सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये (Service apartment) सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर नागपूर पोलिसांनी धाड टाकून एक आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, हे रॅकेट गेल्या काही दिवसांपासून गुपचूपपणे चालू असल्याचे उघड झाले आहे.
उपराष्ट्रपती (Vice President) जगदीप धनखड यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिलेल्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले असून, निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे राजधानीत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
विदर्भातील (Vidarbha) नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या युरिया खताच्या तीव्र टंचाईमुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू आहेत. अनेक कृषी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याने त्यांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. सरकारकडून यावर अद्याप ठोस उपाययोजना न झाल्याने संतप्त काँग्रेस खासदारांनी गुरुवारी केंद्रीय रसायन व खत मंत्री जे.पी. नड्डा यांच्या संसदीय कार्यालयाबाहेर आंदोलन छेडले.
रक्षाबंधन (Raksha Bandhan) म्हणजे फक्त एक पवित्र धागा नाही, तर बहिणीच्या मायेचा आणि भावाच्या जबाबदारीचा बंध असतो. श्रावण पौर्णिमेला साजरा होणारा हा सण केवळ परंपरा नव्हे, तर एक भावनिक आणि सांस्कृतिक नाळ आहे, जी बंधुप्रेम अधिक घट्ट करते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताशी संबंधित दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट करत, भारतावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी एकीकडे भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवण्यात आपली भूमिका महत्त्वाची असल्याचा दावा केला, तर दुसरीकडे भारताने अमेरिकन वस्तूंवर लावलेल्या आयात शुल्कावर नाराजी व्यक्त करत टॅरिफ वाढवण्याचा इशाराही दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यात भारत (India) आणि ब्रिटन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यात आलं आहे. ब्रिटिश पंतप्रधान केर स्टारमर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
भारतात गुप्त माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानची (Pakistan) गुप्तचर संस्था आयएसआय नवनवीन मार्गांचा अवलंब करत असून, आता तिने नेपाळमार्गे हेरगिरी करण्याचा कट आखल्याचं उघड झालं आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, ऑपरेशन सिंदूर आणि युद्धविरामानंतरही पाकिस्तानच्या कारवाया थांबलेल्या नाहीत.
राज्यातील महायुती सरकारच्या काही महत्त्वाच्या आणि लोकप्रिय योजनांमुळे आमदारांना मिळणारा निधी मागील दहा महिन्यांपासून वितरित झालेला नाही, असा दावा शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी गोटात चर्चा रंगली आहे.
लोकशाही वाचवण्यासाठी ३०० हून अधिक खासदारांनी दिल्लीच्या रस्त्यावर उतरून निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) केलेल्या मोर्च्यानंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आयोगावर तीव्र शब्दांत टीका केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत विदर्भ आणि मुंबईतील भाजप तसेच काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश केला. या स्वागत सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत करताच भाजपवर तीव्र शब्दात टीका केली.
विधानसभा निवडणुकांनंतर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या बाहेर पडण्याची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. आता काँग्रेसलाही (Congress) मोठा फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील आदिवासी समाजातील प्रभावशाली नेत्या आणि काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे.
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शाब्दिक चकमकीचा स्फोट झाला असून, महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Bawankule) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र प्रहार केला आहे. त्यांनी ठाकरे यांच्या भूतकाळावर बोट ठेवत, “महाराष्ट्रातील जनतेला खंडणीखोरांचा सरदार कोण आहे हे चांगलेच माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत लोकांनी ‘मुख्यमंत्री’ आणि ‘थीफ मिनिस्टर’ यामधला स्पष्ट फरक दाखवून दिला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) (एकनाथ शिंदे गट) आक्रमक मोडमध्ये आली असून, विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील भाजपला मोठे खिंडार पाडले आहे. भाजपच्या तब्बल 70 कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी २२ जुलै रोजी प्रकृती अस्वास्थ्य कारण देत पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जवळपास पंधरा दिवस उलटून गेले असले तरी ते कुठे आहेत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत मोठ्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यानंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत भाजपचं वर्तन संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे.
मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेली ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) युती आता प्रत्यक्षात आली आहे. मुंबईतील बेस्ट कामगार सहकारी पतपेढीच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन मराठी पक्ष एकत्र आले असून, येत्या १८ ऑगस्ट रोजी ही ऐतिहासिक युती मतदारांसमोर पहिल्यांदाच सादर होणार आहे.
महाराष्ट्रात सध्या राजकीय हालचालींना गती मिळाली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shinde) यांच्या दिल्ली भेटीने या घडामोडींना अधिकच उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यातील संबंधांवर चर्चांचा मारा सुरु असताना, शिंदे यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू झाले.
‘गली बॉय’ चित्रपटात ‘माया’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री आणि मॉडेल श्रुती चौहान सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेता अहान पांडे (Ahan Pandey) आणि तिच्या नात्याबाबत अफवा पसरल्यानंतर चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण झालं होतं. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या आणि चर्चेत राहणाऱ्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ (Bigg Boss) चा १९वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यंदाचा हा सीझन पारंपरिक चौकटीत न बसता, तब्बल ५ मोठ्या बदलांसह नव्या स्वरूपात सादर होणार आहे.
मागील आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘सैयारा’ (Saiyara) हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. प्रत्येक ठिकाणी फक्त याच चित्रपटाचीच चर्चा रंगलेली दिसून येतेय. अहान पांडे आणि अनित पड्डा या नवोदित जोडीच्या अभिनयाने रसिकांना भुरळ घातली असून, पहिल्याच सिनेमातून या दोघांची कारकीर्द झपाट्याने उंचावली आहे. पण या यशस्वी प्रवासात आणखी एक नाव विशेषत्वाने चर्चेत आलंय – फहीम अब्दुल्ला.
भारतात #MeToo चळवळीची सुरूवात करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताने (Tanushree Dutta) नुकताच एक भावनिक आणि धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती रडत-रडत आपले हालकष अनुभव सांगताना दिसते. स्वतःच्या घरात गेल्या अनेक वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत तिने अनेकांना हादरवून टाकलं आहे.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे. वेगवेगळ्या चकमकीत २४ नक्षलवादी मारले गेले. यादरम्यान एक सैनिक शहीद झाला आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
दररोज दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे UPI व्यवहार करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. सध्या अशा प्रकारच्या डिजिटल व्यवहारांवर कोणताही वस्तू आणि सेवा कर (GST) लावण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नाही, असं अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलं आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्नाटकातील कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना 22 जुलै 2025 रोजी रद्द केला आहे. यामुळे 23 जुलैपासून बँकेचे सर्व व्यवहार थांबवण्यात आले असून, ठेवीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
उद्योगजगतामधील मोठं नाव असलेल्या अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या उद्योगसमूहावर सक्तवसुली संचालनालयाने (ED) गुरुवारी जोरदार कारवाई केली. कथित आर्थिक गैरव्यवहार आणि संशयित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही धाडसत्र सुरू असून, देशभरात एकाच वेळी ५० पेक्षा अधिक ठिकाणी तपास यंत्रणांनी छापे घातले आहेत.
राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्राला मोठा धक्का देणारा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) घेतला आहे. मुंबईत कार्यरत असलेल्या भवानी सहकारी बँकेवर आरबीआयने गंभीर आर्थिक स्थिती लक्षात घेऊन बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 अंतर्गत कडक निर्बंध लावले आहेत.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.
रमजानच्या (Ramadan) पवित्र महिन्याच्या आगमनाचा उत्साह लोकांमध्ये दिसून येतो. शुक्रवारी चंद्र दिसला नाही, त्यानंतर उलेमांनी घोषणा केली की रमजान महिन्याचा पहिला उपवास रविवार, २ मार्च रोजी असेल. यासाठी रमजान महिन्यातील पहिली सेहरी रविवारी सकाळी फजरच्या अजानपूर्वी केली जाईल.
Record breaking darshan of devotees in Ayodhya | नुकतेच प्रयागराजमध्ये भव्य-दिव्या महाकुंभ मेळ्याचा समारोप झाला. महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जाऊन राम दर्शन घेत होते. यामुळे अयोध्येतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.सुमारे लाखो भाविक दररोज राम दर्शन घेत आहेत.
Chaturmasya Kartik Festival from 10 November | समर्थ सद्गुरू श्री सीताराम महाराज दत्त दरबारतर्फे 10 ते 13 नोव्हेंबर असे सलग चार दिवस चातुर्मास्य कार्तिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चातुर्मासातील अखंड श्रीगुरुचरित्र सप्ताहनुष्ठान समाप्ती, तसेच कार्तिकोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
नागपूरच्या तेजस्वी बुद्धिबळपटू दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने भारतीय बुद्धिबळ क्षेत्राला ऐतिहासिक यश मिळवून दिलं आहे. रविवारी पार पडलेल्या 2025 फिडे महिला वर्ल्ड चेस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिव्याने ज्येष्ठ खेळाडू कोनेरू हम्पीचा पराभव करत विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान भारताला मोठा झटका बसला आहे. संघाचा उपकर्णधार आणि प्रमुख यष्टीरक्षक ऋषभ पंतला (Rishabh Pant) दुखापतीमुळे मालिकेच्या पुढील सामन्यांतून माघार घ्यावी लागली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला सहा आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या अंडर-19 वनडे मालिकेत वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर सर्वांची मने जिंकली. मालिकेत भारताने 3-2 असा विजय मिळवला, पण खरी चर्चा झाली ती सूर्यवंशीच्या तुफानी खेळीची.
IPL 2025 चा अंतिम सामना इतिहासात कोरला गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) ने अखेर आयपीएलचा चषक आपल्या नावावर केला. पंजाब किंग्जवर ६ धावांनी मिळवलेल्या विजयाने RCB ने तब्बल १८ वर्षांची प्रतीक्षा संपवली. पण या विजयाचा सगळ्यात भावनिक आणि अविस्मरणीय क्षण ठरला तो विराट कोहलीचा आनंदाश्रूंनी भरलेला सेलिब्रेशन.
आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला अवघ्या काही धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या पराभवाने फक्त संघाचंच नाही, तर टीमच्या सहमालकीण प्रिती झिंटाच्या (Preity Zinta) मनातही असह्य वेदना उमटल्या. सामन्यानंतरच्या क्षणी प्रिती झिंटाच्या डोळ्यांत आलेले अश्रू संपूर्ण स्टेडियम आणि लाखो चाहत्यांच्या मनाला स्पर्शून गेले.
भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे IPL (IPL)2025 हंगामाचे सामने स्थगित करण्यात आले होते. मात्र आता दोन्ही देशांमध्ये युद्धविराम जाहीर झाल्याने स्पर्धा पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL 2025 च्या हंगामाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला ‘ISIS कश्मीर’ या दहशतवादी संघटनेने थेट जीवे मारण्याची धमकी दिली असून, यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही धमकी मिळाल्याचं समोर आलं आहे.
भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि मराठमोळा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) याने (8 एप्रिल) अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधवने भाजपाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) व रीलस्टार धनश्री वर्मा यांचा पाच वर्षाचा संसार अखेर मोडला आहे.दोघांनीही आज घटस्फोटाची अधिकृत माहिती सोशल मीडियावर दिली. धनाश्री व युजवेंद्र यांच्या घटस्फोटामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
Will the Indian team make history | भारताच युवा क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असून तिथे दोन्ही देशात पाच कसोटींची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यास २० जून पासून सुरुवातही झाली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी करत ३०० च्या वर धावा काढल्या त्या ही फक्त तीन गडी गमावून. पहिल्याच दिवशी भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि नवनियुक्त कर्णधार शुभमन गिल यांनी शतके झळकावली. उपकर्णधार ऋषभ पंतने अर्धशतक झळकावले.
१ मे हा दिवस जागतिक कामगार दिन (World Labor Day) म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगभरातील कामगारांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. केवळ भारतातच नाही तर जगभरातील ८० हुन अधिक देशात या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते.