बुधवारी मध्यरात्रीनंतर नागपूरपासून (Nagpur) अवघ्या ४० किमी अंतरावर असलेल्या चकडोह-बाजारगाव येथील सोलर ग्रुपच्या T-15 विस्फोटक निर्मिती केंद्रात प्रचंड स्फोट झाला. या अपघातात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल ३० जण जखमी झाले आहेत. यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
मंगळवारी सकाळी नागपूर विमानतळावर (Nagpur airport) भीषण अपघात टळला. नागपूरहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या (फ्लाईट क्रमांक 6E…) विमानाला सकाळी ७.०५ वाजता उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच एका पक्ष्याने धडक दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी अलीकडेच आपली जंबो कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यानंतर शुक्रवारी तिवारी यांनी आपल्या नव्या टीमसह केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Gadkari) यांची भेट घेतली. या वेळी गडकरींनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी अधिक ताकदीने काम करण्याचे आवाहन केले.
अंडरवर्ल्ड डॉन आणि शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळी (Arun Gawli) याला सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन. कोटिस्वर सिंह यांच्या खंडपीठाने गवळी यांची प्रलंबित याचिका, त्यांचे वय (७६ वर्षे) आणि आतापर्यंतचा कारावास लक्षात घेऊन हा निर्णय दिला.
नागपूर महानगरपालिका निवडणूक (NMC Elections) 2025 साठी नव्या प्रभाग रचनेचा प्रारूप जाहीर करण्यात आला आहे. 22 ऑगस्टच्या मध्यरात्री हा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला. नव्या रचनेनुसार एकूण 38 प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. त्यापैकी 37 प्रभागांमध्ये प्रत्येकी चार वॉर्ड तर एका प्रभागात तीन वॉर्ड असतील.
शनिवारी नागपूरच्या रस्त्यांवर पारंपरिक पीळी मारबतची (Marbat) मिरवणूक धडाक्यात निघणार असून, या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी मिरवणुकीचा मार्ग प्रत्यक्ष पाहून सुरक्षा आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला.
शहरातील खासगी बसांच्या प्रवेशबंदीचा प्रश्न आता न्यायालयात गेला आहे. नागपूर खासगी बस (Private bus) ऑपरेटर संघटनेने ट्रॅफिक पोलिसांच्या आदेशाला आव्हान देत बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Bawankule) यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी वाठोड्यातील ४२ वर्षीय किशोर चरणदास मेष्राम याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. छत्रपतीनगर, कामठी येथील हॉटेल व्यवसायिक व भाजप कार्यकर्ता प्रमोद हिरामन गेडाम यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
काही दिवसांत श्री गणेशाच्या आगमनाची मंगलधून सुरू होणार असून यंदाच्या गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) नागपूर महानगर पालिकेची यंत्रणा सज्ज आहे. मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेतला. विशेषत: गणेश प्रतिमांच्या विसर्जनासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची त्यांनी तपासणी केली.
वाढत्या शहरी दबावाला तोंड देत नागपूरचा सुनियोजित विकास साधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “नवा नागपूर” (New Nagpur) या महत्त्वाकांक्षी योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. ही संकल्पना नवी मुंबईच्या धर्तीवर राबवली जाणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
परळी (Parli) रेल्वे स्थानकावर सहा वर्षीय निरागस बालिकेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी अवघ्या पाच तासांत आरोपीला जेरबंद केले.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत मंगळवारी निलंबित पोलिस निरीक्षक (Suspended police inspector) सुनील नागरगोजेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
Contractor commits suicide in Nagpur | नागपूरमध्ये एका धक्कादायक घटनेत शासकीय कंत्राटदार पीव्ही वर्मा यांनी गळ्याला दोर लावून आत्महत्या केली आहे. माहिती नुसार, वर्धा जिल्ह्यातील एमआयडी देवळी येथे काम सुरु असताना त्यांचे जवळपास ३० कोटी रुपये थकीत बिल शासनाकडे प्रलंबित होते. आर्थिक तंगीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
Shocking murdered in broad daylight in Nagpur | अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुलमोहर कॉलनीत आज दुपारी धक्कादायक घटना घडली. एका अल्पवयीन मुलाने १६ वर्षीय विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला करून तिचा जागीच खून केला. दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.
इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी रेड्डींना पूर्ण पाठिंबा देत लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करणे हीच खरी गरज असल्याचे स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या मनोज जरांगे (Jarange) पाटील यांच्या आमरण उपोषणाने आज आझाद मैदान दणाणून गेलं. “आरक्षणाशिवाय माघार नाही” या निर्धारामुळे आंदोलनाला मोठं बळ मिळालं असून हजारो मराठा बांधव मैदानात आणि बाहेर रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत.
आजपासून महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) जल्लोष अधिकृतरीत्या सुरू झाला आहे. सार्वजनिक मंडळांपासून ते प्रत्येकाच्या घरापर्यंत बाप्पाचे आगमन उत्साहात होत असून, “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” या गजरांनी संपूर्ण राज्य भारावून गेले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Trump) यांनी भारतावर तब्बल ५० टक्क्यांपर्यंतचे आयात शुल्क लादले आहे. या निर्णयामुळे भारताच्या निर्यातीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, तसेच ग्लोबल व्यापारात ट्रम्प टॅरिफ हा सध्या चर्चेचा मुख्य मुद्दा ठरला आहे. मात्र, या धक्क्याला तोलून धरण्यासाठी भारत सरकार मोठा पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्याने जागतिक व्यापारी मंडळात खळबळ उडाली आहे. सध्या भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू असताना, लवकरच आणखी २५ टक्के टॅरिफ वाढवण्याचा मानस असल्याची माहिती आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताशी संबंधित दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट करत, भारतावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी एकीकडे भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवण्यात आपली भूमिका महत्त्वाची असल्याचा दावा केला, तर दुसरीकडे भारताने अमेरिकन वस्तूंवर लावलेल्या आयात शुल्कावर नाराजी व्यक्त करत टॅरिफ वाढवण्याचा इशाराही दिला.
मराठा (Maratha) समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत स्थानिक समिती स्थापन करून अर्जदार खरोखरच कुणबी वंशाचे आहेत का हे ठरवले जाणार आहे. मात्र, सरकारचा हा निर्णय फसवणूक असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे.
मराठा (Maratha) समाजाच्या मागण्यांनंतर सरकारने हैदराबाद गॅझेटिअरला मान्यता देत शासन आदेश काढला. या निर्णयामुळे मराठा बांधवांत आनंदाचं वातावरण आहे, मात्र ओबीसी समाजातून नाराजी व्यक्त केली जात होती.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुका दिवाळीनंतर जाहीर होतील, अशी चर्चा रंगत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानात मोठ्या आंदोलनाची हाक दिली होती. पाच दिवस सलग सुरू राहिलेल्या या आंदोलनात लाखो मराठा बांधव सहभागी झाले. मात्र, या काळात शहरातील वाहतूक कोंडी वाढली आणि गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) आलेल्या भाविकांनाही प्रचंड गैरसोय सहन करावी लागली. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांना प्रकृतीच्या कारणास्तव मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उद्या तातडीने शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार आहे, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा झालेला नाही.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा शेवट सरकारने जीआर काढून केल्यानंतर आता ओबीसी (OBC) समाजामध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सरकारने जरांगे यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मान्य केल्याने ओबीसी नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी ठामपणे सांगितले की, काहीही घडले तरी मागे हटणार नाहीत. त्यांच्या मागण्यांमध्ये हैदराबाद आणि सातारा संस्थांचा गॅझेट तत्काळ अंमलात आणावा, अशी विनंती होती. आता राज्य सरकारने जरांगे यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले असून मोठा निर्णय घेतला आहे.
मराठा आरक्षण (Maratha reservation) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलकांनी व्यापलेले रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार न्यायालयाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार असल्याचे जाहीर केले.
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या संघर्षात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. मागण्या न मानल्यास “आम्ही ५ कोटी मराठे मुंबईत दाखल होऊ”, असा दम त्यांनी भरला.
महात्मा गांधींच्या प्रपौत्र तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी माओवाद्यांबाबत केलेल्या विवादित वक्तव्यासून राजकीय वाद उभा झाला आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना गांधी यांनी सांगितले, "जसे स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांविरुद्ध आंदोलन केले, तसेच नक्सली त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी संघर्ष करीत आहेत."
बॉलिवूडमध्ये नृत्यकला, अभिनय आणि सौंदर्याचा मिलाफ म्हटला की, माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हे नाव हमखास घ्यावं लागतं. ८० आणि ९० च्या दशकात रुपेरी पडद्यावर माधुरीचा दबदबा होता. तिच्या एकापेक्षा एक सरस चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी (Yogi) आदित्यनाथ यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट ‘अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अनेक दिवस सेन्सॉर बोर्डाच्या मंजुरीसाठी अडकून पडलेला हा चित्रपट अखेर प्रदर्शित होणार असून त्याची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
बॉलिवूडच्या एकेकाळच्या लोकप्रिय अभिनेत्री आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी (Hema Malini) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. या वेळी राजकारणामुळे नव्हे, तर कोट्यवधी रुपयांच्या प्रॉपर्टी डीलमुळे त्या माध्यमांच्या लक्षात आल्या आहेत. अलीकडेच त्यांनी अंधेरी पश्चिमच्या ओशिवरा परिसरातील ओबेरॉय स्प्रिंग सोसायटीतील दोन आलिशान अपार्टमेंट विकले आहेत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजधानीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने (Sumona Chakraborty) केलेली एक सोशल मीडिया पोस्ट वादग्रस्त ठरली आहे. दक्षिण मुंबईत तिच्या गाडीला आंदोलकांनी अडवून त्रास दिल्याचा दावा सुमोनाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये केला होता.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे. वेगवेगळ्या चकमकीत २४ नक्षलवादी मारले गेले. यादरम्यान एक सैनिक शहीद झाला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) सरकार खाजगी कंपन्यांमधील कामगारांसाठी महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. राज्यात कामाचे तास सध्याच्या ९ तासांऐवजी १० तास करण्याचा विचार सुरु असून, ही माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
भारतीय (India) अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग पाहता देश पुढील काही वर्षांत अमेरिकेलाही मागे टाकू शकतो, असं नवं चित्र समोर आलं आहे. ईवाय (EY) इकॉनॉमी वॉचच्या ताज्या अहवालानुसार, भारत २०३० पर्यंत तब्बल २० ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था गाठू शकतो, तर २०३८ पर्यंत तो ३४ ट्रिलियन डॉलर्सवर झेपावत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आर्थिक महासत्ता देश बनेल.
सप्टेंबरच्या पहिल्या दिवसापासून आर्थिक व्यवहारांमध्ये (Financial transactions) काही महत्त्वाचे बदल लागू होत आहेत, जे घरगुती बजेटवर थेट परिणाम करू शकतात. चांदी खरेदी-विक्रीत पारदर्शकता, SBI क्रेडिट कार्डचे शुल्क, एलपीजी दर, ATM व्यवहार नियम आणि FD व्याजदरांमध्ये बदल या सगळ्याचा समावेश आहे.
देशातील मोबाईल युजर्ससाठी पुन्हा एकदा अप्रिय बातमी समोर येत आहे. एअरटेल (Airtel), जिओ आणि व्होडाफोन आयडिया या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या लवकरच रिचार्ज प्लॅनचे दर वाढवण्याची शक्यता आहे. आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना या निर्णयाचा थेट आर्थिक फटका बसणार आहे.
दररोज दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे UPI व्यवहार करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाचा खुलासा करण्यात आला आहे. सध्या अशा प्रकारच्या डिजिटल व्यवहारांवर कोणताही वस्तू आणि सेवा कर (GST) लावण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नाही, असं अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलं आहे.
26 ऑगस्ट 2025 रोजी देशभरात हरतालिका (Hartalika) तृतीया साजरी केली जाणार आहे. हा दिवस महिलांसाठी विशेष महत्वाचा आहे, कारण त्या निर्जल उपवास ठेवून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसमृद्ध वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करतात. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला येणारा हा उपवास सर्वात कठीण व्रतांपैकी एक मानला जातो.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.
रमजानच्या (Ramadan) पवित्र महिन्याच्या आगमनाचा उत्साह लोकांमध्ये दिसून येतो. शुक्रवारी चंद्र दिसला नाही, त्यानंतर उलेमांनी घोषणा केली की रमजान महिन्याचा पहिला उपवास रविवार, २ मार्च रोजी असेल. यासाठी रमजान महिन्यातील पहिली सेहरी रविवारी सकाळी फजरच्या अजानपूर्वी केली जाईल.
Record breaking darshan of devotees in Ayodhya | नुकतेच प्रयागराजमध्ये भव्य-दिव्या महाकुंभ मेळ्याचा समारोप झाला. महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जाऊन राम दर्शन घेत होते. यामुळे अयोध्येतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.सुमारे लाखो भाविक दररोज राम दर्शन घेत आहेत.
क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर अलीकडेच विवाहबंधनाकडे पहिले पाऊल टाकत साखरपुड्याच्या सोहळ्यात सहभागी झाला. १३ ऑगस्ट रोजी मुंबईतील खास आणि निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात अर्जुनची बालपणीची मैत्रीण सानिया चंडोक हिच्यासोबत त्याचा साखरपुडा पार पडला.
नागपूरच्या तेजस्वी बुद्धिबळपटू दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने भारतीय बुद्धिबळ क्षेत्राला ऐतिहासिक यश मिळवून दिलं आहे. रविवारी पार पडलेल्या 2025 फिडे महिला वर्ल्ड चेस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिव्याने ज्येष्ठ खेळाडू कोनेरू हम्पीचा पराभव करत विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान भारताला मोठा झटका बसला आहे. संघाचा उपकर्णधार आणि प्रमुख यष्टीरक्षक ऋषभ पंतला (Rishabh Pant) दुखापतीमुळे मालिकेच्या पुढील सामन्यांतून माघार घ्यावी लागली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला सहा आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या अंडर-19 वनडे मालिकेत वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर सर्वांची मने जिंकली. मालिकेत भारताने 3-2 असा विजय मिळवला, पण खरी चर्चा झाली ती सूर्यवंशीच्या तुफानी खेळीची.
IPL 2025 चा अंतिम सामना इतिहासात कोरला गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) ने अखेर आयपीएलचा चषक आपल्या नावावर केला. पंजाब किंग्जवर ६ धावांनी मिळवलेल्या विजयाने RCB ने तब्बल १८ वर्षांची प्रतीक्षा संपवली. पण या विजयाचा सगळ्यात भावनिक आणि अविस्मरणीय क्षण ठरला तो विराट कोहलीचा आनंदाश्रूंनी भरलेला सेलिब्रेशन.
आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला अवघ्या काही धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या पराभवाने फक्त संघाचंच नाही, तर टीमच्या सहमालकीण प्रिती झिंटाच्या (Preity Zinta) मनातही असह्य वेदना उमटल्या. सामन्यानंतरच्या क्षणी प्रिती झिंटाच्या डोळ्यांत आलेले अश्रू संपूर्ण स्टेडियम आणि लाखो चाहत्यांच्या मनाला स्पर्शून गेले.
भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे IPL (IPL)2025 हंगामाचे सामने स्थगित करण्यात आले होते. मात्र आता दोन्ही देशांमध्ये युद्धविराम जाहीर झाल्याने स्पर्धा पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL 2025 च्या हंगामाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला ‘ISIS कश्मीर’ या दहशतवादी संघटनेने थेट जीवे मारण्याची धमकी दिली असून, यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही धमकी मिळाल्याचं समोर आलं आहे.
भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि मराठमोळा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) याने (8 एप्रिल) अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधवने भाजपाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
Will the Indian team make history | भारताच युवा क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असून तिथे दोन्ही देशात पाच कसोटींची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यास २० जून पासून सुरुवातही झाली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी करत ३०० च्या वर धावा काढल्या त्या ही फक्त तीन गडी गमावून. पहिल्याच दिवशी भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि नवनियुक्त कर्णधार शुभमन गिल यांनी शतके झळकावली. उपकर्णधार ऋषभ पंतने अर्धशतक झळकावले.
१ मे हा दिवस जागतिक कामगार दिन (World Labor Day) म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगभरातील कामगारांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. केवळ भारतातच नाही तर जगभरातील ८० हुन अधिक देशात या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते.