माघ शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश जयंतीनिमित्त (Ganesh Jayanti) नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळत आहे. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि झगमगती विद्युत रोषणाईने सजवण्यात आले असून, गुरुवार (२२ जानेवारी २०२६) पहाटेपासूनच विघ्नहर्त्या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
नागपुरात बंदी असलेल्या नायलॉन (Nylon) मांजाची सर्रास विक्री आणि वापर सुरू असताना, या प्रकरणी सरकारी यंत्रणांनी दिलेल्या माहितीकडे बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने गंभीरपणे पाहिले आहे.
आजचे युग पूर्णपणे डिजिटल (Digital) झाले असून, शिक्षण, खेळ आणि करमणुकीच्या सुविधा मुलांना सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मुलांना पूर्वीप्रमाणे जास्त मेहनत किंवा खोल एकाग्रतेची गरज भासत नाही. याचा थेट परिणाम त्यांच्या एकाग्रता, स्मरणशक्ती आणि विचारक्षमतेवर होताना दिसत आहे.
राज्यात 9 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर घेण्यात आलेल्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी (Municipal Election) आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदारांनी हळूहळू हजेरी लावण्यास सुरुवात केली.
राज्यभरात महापालिका निवडणुकांसाठी मतदानाचा उत्साह शिगेला असतानाच नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३१ मध्ये काँग्रेस (Congress) उमेदवार शिवानी चौधरी यांच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली असून, त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
प्रभाग क्रमांक २८ मधील आराधना नगर परिसरातील जीआरके कॉन्व्हेंट येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेला सुरुवातीला अडथळा निर्माण झाला. सकाळी मतदान सुरू होण्याच्या वेळेतच मशीनमध्ये दोष आढळून आल्याने मतदारांना काही काळ प्रतीक्षा करावी लागली.
रामटेक (Ramtek) तहसीलमध्ये घडलेल्या एका अविश्वसनीय घटनेने सर्वांनाच चकित केले आहे. मृत घोषित करण्यात आलेल्या १०३ वर्षीय वृद्ध महिलेला काही तासांतच श्वास येऊ लागल्याने अंत्यसंस्काराच्या तयारीदरम्यानच एकच खळबळ उडाली. हा प्रकार सध्या संपूर्ण जिल्ह्यात कुतूहल आणि चर्चेचा विषय ठरला आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत लोकशाही प्रक्रियेत नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.
पुणे ते नागपूर (Nagpur) दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी अडचण निर्माण झाली असून या मार्गावरील तब्बल २२ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दौंड ते मनमाडदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम हाती घेतल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे (Gulabrao Gawande) यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर नागपूरमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
In Malad Sexual assault on innocent puppy | मुंबईतील मालाड पूर्व भागात मानवतेला लज्जास्पद ठरेल अशी धक्कादायक घटना समोर आली असून, एका २० वर्षीय तरुणाने अडीच महिन्यांच्या श्वान पिल्लावर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे प्राणीप्रेमींसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे
पुणे (Pune) ग्रँड चॅलेंज सायकल टूरदरम्यान मुळशी–कोळवण मार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात ७० पेक्षा अधिक सायकलस्वार एकमेकांवर आदळले, तर अनेकजण रस्त्याबाहेर फेकले गेले. या घटनेमुळे जिल्हा प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील महालगीनगर येथील फ्रीडम फायटर कॉलनीत मोठी चोरी (Burglary) होण्यापूर्वीच टळली आहे. कॉलनीतील रहिवासी दिलीप देशमुख यांच्या घरात मध्यरात्री तीन अज्ञात चोरांनी शिरकाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र घरात बसवलेल्या सुरक्षा व्यवस्थेमुळे त्यांचा डाव उधळून लागला.
पुणे (Pune) महापालिकेच्या निवडणुकीत बिहारमधील चार महिलांनी बोगस मतदान केल्याचा जोरदार आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे. वानवडी येथील सनग्रेस स्कूल मतदान केंद्रावर या चार महिलांनी खोटे मतदान केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) डोडा जिल्ह्यात मंगळवारी एक भीषण अपघात घडला. भारतीय लष्कराचे ‘कॅस्पर’ (सैन्य वाहन) सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळल्याने ४ जवान शहीद झाले असून १२ जवान जखमी झाले आहेत. जखमींपैकी किमान तीन जवानांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
भारतीय जनता पार्टीचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितिन नबीन (Nitin Nabin) यांची निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करत भावनिक आणि महत्त्वपूर्ण भाष्य केले.
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (Elections) उद्या, 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून नागरिकांनी मतदानापूर्वी आपले नाव मतदार यादीत नोंदणीकृत आहे की नाही, याची खात्री करून घेण्याचे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे. मतदान प्रक्रिया सकाळी 7.30 वाजता सुरू होऊन सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत चालणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Trump) यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर एक फोटो शेअर करत स्वतःला थेट “व्हेनेझुएलाचा कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष” असल्याचे म्हटल्याने आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भारत (India)–अमेरिका व्यापार संबंधांबाबत मोठी आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक फोन केला असता तर भारत आणि अमेरिकेमध्ये मोठा व्यापारी करार कधीच झाला असता, असा दावा लुटनिक यांनी केला आहे.
अमेरिकेने व्हेनेझुएलावर (Venezuela) जोरदार कारवाई करत केवळ सैन्यहल्लाच नाही, तर थेट देशाचे अध्यक्ष मादुरो यांना अटक करून त्यांच्या पत्नीसह अमेरिकेत आणले आहे. सध्या मादुरो अमेरिकेच्या एका तुरुंगात आहेत. एका राष्ट्राध्यक्षाला कैद करण्याच्या घटनेनंतर संपूर्ण जगात मोठा धक्का बसला आहे.
आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जयंती साजरी होत असताना राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर व्हावा, अशी मागणी सुरू असतानाच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विदर्भातील अनेक शहरांमध्ये महापौरपदासाठी (Mayor) राजकीय हालचालींना वेग आला होता. बहुमताची गणिते, आघाड्यांचे संकेत आणि अंतर्गत चर्चा सुरू असतानाच आज महापौरपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये महापौरपदासाठी (Mayor) आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.
देशभरातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री सध्या स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या औद्योगिक परिषदेत सहभागी झाले आहेत. मात्र या दौऱ्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तीव्र आणि खोचक शब्दांत टीका केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मुंबई महानगरपालिकेतील गटनेतेपदाची जबाबदारी माजी महापौर आणि नगरसेविका किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याकडे सोपवली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, आगामी महापालिकेतील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
कल्याण–डोंबिवली महापालिकेत सत्तास्थापनेचे गणित दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचे होत चालले आहे. शिवसेना (शिंदे गट) कडून महापौरपद मिळवण्यासाठी हालचालींना वेग आला असून, ‘ऑपरेशन टायगर’(Operation Tiger)ची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार, याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. महापौरपद शिंदे गटाकडे जाणार की भाजप पहिल्यांदाच मुंबईचा महापौर करणार, यावरून महायुतीतच जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे वकील ॲड. असीम सरोदे यांच्या एका ट्विटने राज्याच्या राजकारणात नवी खळबळ उडवली आहे.
अमरावतीत राजकीय वातावरण ढवळून काढणारी घटना घडली आहे. माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून, हा फोन थेट पोलिस कंट्रोल रूमवर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आज मोठा बदल पाहायला मिळाला आहे. पक्षाने नितीन नबीन (Nitin Nabin) यांना राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवडून, नव्या युगाची सुरूवात केली आहे. दिल्लीच्या भाजप मुख्यालयात झालेल्या अधिकृत कार्यक्रमात त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.
महापालिका निवडणुकीत जास्त धावपळ आणि सभांच्या सलग कार्यक्रमांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) प्रकृती अस्वस्थ झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पूर्ण विश्रांती घ्यावी लागल्यामुळे शिंदेंनी शनिवारी त्यांच्या दिवसभरातील सर्व कार्यक्रम राखीव ठेवले आहेत.
मराठी कलाविश्वात सध्या मंगलघटिका सुरू असून, या आनंदी यादीत आणखी एका घरात सनईचा सूर घुमू लागला आहे. अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) यांच्या घरात कौटुंबिक आनंदाचा क्षण साजरा झाला असून, त्यांचा मोठा लेक सार्थक ओक याचा साखरपुडा थाटात पार पडला आहे.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि त्यांची पत्नी ट्विंकल खन्ना यांच्याशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. जुहू परिसरात त्यांच्या ताफ्यातील एका कारला भीषण रस्ते अपघात झाला. हा अपघात ते दोघे परदेशातून आपल्या २५व्या लग्नाच्या वाढदिवसानंतर मुंबईत परतत असताना झाला.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच शहरातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. ठाकरे (Thackeray) कुटुंबाचा अभेद्य किल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबईवर आता महायुतीने निर्णायक वर्चस्व मिळवले असून भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीचा महापौर विराजमान होणार आहे.
बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खान (Farah Khan) सध्या अभिनय वा चित्रपटांपेक्षा तिच्या यूट्यूब व्लॉगिंगमुळे अधिक चर्चेत आहे. दीड वर्षांपूर्वी सुरू केलेल्या यूट्यूब चॅनलवर फराह खानने अनोखी संकल्पना राबवली असून, तिचा स्वयंपाकी ‘दिलीप’सोबत ती थेट सेलिब्रिटींच्या घरी जाऊन स्वयंपाक करते.
छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या जोरदार चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. विशेष नक्षलविरोधी मोहिमेत सहभागी असलेले DRG चे पथक बेज्जी–चिंतागुफा परिसरातील दुर्गम जंगल पट्ट्यात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढवला.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) सरकार खाजगी कंपन्यांमधील कामगारांसाठी महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. राज्यात कामाचे तास सध्याच्या ९ तासांऐवजी १० तास करण्याचा विचार सुरु असून, ही माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
सराफा बाजारात आज सोन्या (Gold)-चांदीच्या दरांनी सर्व जुने विक्रम मोडीत काढत नवे उच्चांक गाठले आहेत. एका दिवसात झालेल्या जोरदार दरवाढीमुळे गुंतवणूकदारांसह दागिने खरेदी करणाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे. आजच्या व्यवहारात चांदीच्या दरात तब्बल १४,४७५ रुपयांची उसळी नोंदवली गेली, तर सोन्याच्या किमतीत २,८८३ रुपयांची भक्कम वाढ झाली आहे.
चांदीच्या (Silver) दरांनी पुन्हा एकदा जोरदार उसळी घेतली असून सराफा बाजारात तेजीचे वातावरण कायम आहे. देशभरातील बाजारात चांदीचे भाव सातत्याने नवे विक्रम नोंदवत आहेत. शनिवारी सकाळी नागपूर सराफा बाजारात चांदीचा दर थेट २ लाख ५३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचला.
सोने (Gold) आणि चांदीच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली वाढ आता विक्रमी टप्प्यावर पोहोचली आहे. जळगावच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी दरवाढ कायम राहिल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.
मुलीच्या (Girl) शिक्षणासाठी किंवा पुढील आयुष्यातील मोठ्या खर्चांसाठी सुरक्षित, स्थिर आणि खात्रीशीर गुंतवणूक शोधत असाल, तर सुकन्या समृद्धी योजना हा सध्या उपलब्ध असलेला सर्वात विश्वासार्ह पर्याय मानला जातो. केंद्र सरकार चालवणारी ही योजना पूर्णपणे सुरक्षित असून व्याजदर हमीदार आहे. 2025 साली योजनेचा व्याजदर 8.2% इतका निश्चित करण्यात आला आहे.
ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग (Bhimashankar Jyotirlinga) मंदिर येत्या तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
आज, २१ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार), दिवाळीचा (Diwali) सर्वात उत्साहवर्धक आणि शुभ दिवस — लक्ष्मीपूजनाचा दिवस साजरा केला जात आहे. हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावास्येच्या या पवित्र दिवशी धन, समृद्धी आणि आनंदाची आराधना केली जाते. देशभरात आज संध्याकाळी माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि कुबेर यांच्या पूजनाने घराघरांत मंगल वातावरण निर्माण होणार आहे.
हिंदू धर्मातील एक प्रमुख सण, दसरा (Dussehra), दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपासना व भक्तीनंतर हा दिवस विशेष महत्त्वाचा ठरतो. देशभरात मंदिरे, घरे आणि सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
भारत (India) आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज (२१ जानेवारी) नागपूरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) स्टेडियमवर खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेत २–१ असा अनपेक्षित पराभव स्वीकारल्यानंतर, टी-२० मालिकेत जोरदार पुनरागमन करण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.
भारतीय बॅडमिंटनला जागतिक व्यासपीठावर ओळख मिळवून देणारी ऑलिम्पिक पदकविजेती सायना नेहवाल (Saina Nehwal) हिने आपल्या कारकिर्दीला अधिकृत पूर्णविराम दिला आहे. सततच्या गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे आता सर्वोच्च पातळीवरील स्पर्धात्मक खेळ शक्य नसल्याने तिने बॅडमिंटनमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होत असून पहिला सामना वडोदरात (Vadodara) खेळवला जाणार आहे. हा सामना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण अनेक वर्षांनंतर भारतीय पुरुष संघ वडोदरात आंतरराष्ट्रीय सामना खेळत असून तोही एका अत्याधुनिक नव्या स्टेडियममध्ये होणार आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकप्तान स्मृती (Smriti) मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छलयांचे लग्न रद्द झाले आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या लग्नाची तारीख ७ डिसेंबर होती, पण स्मृतीने या दिवशी इंस्टाग्रामवरून लग्न रद्द असल्याची माहिती दिली.
फुटबॉल हा जगातील सर्वात आवडता खेळ मानला जातो. पुढील वर्षी होणाऱ्या फिफा विश्वचषकात (FIFA World Cup) एकूण 48 संघ हिस्सा घेणार आहेत, जे यापूर्वी कधीही झालेले नव्हते. या स्पर्धेची मेजबानी संयुक्तपणे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको करणार आहेत.
आयसीसी महिला विश्वचषक जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) यांनी आपल्या अधिकृत निवासस्थानी सत्कार केला. बुधवारी सायंकाळी ६ वाजता ७ लोक कल्याण मार्ग येथे झालेल्या या विशेष भेटीत मोदींनी संघातील प्रत्येक खेळाडूशी संवाद साधत त्यांचे मनापासून अभिनंदन केले.
महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल असा २०२५ चा विश्वविजय भारतीय महिलांनी आपल्या जिद्दीने आणि एकतेने साध्य केला आहे. या ऐतिहासिक पराक्रमाचा गौरव वाढवताना बीसीसीआयने (BCCI) तब्बल ५१ कोटी रुपयांचे पारितोषिक घोषित करत महिला क्रिकेटच्या गौरवकथेला नवा अध्याय जोडला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian women Cricket team) रविवारी इतिहास घडवत आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकावर आपले नाव कोरले. दमदार खेळ आणि अदम्य जिद्दीच्या जोरावर ‘वुमन इन ब्लू’ने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावले. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्व क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहिला.
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (२८ सप्टेंबर) आशिया कप (Asia Cup) २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला ५ विकेट्सने हरवून ट्रॉफी आपल्या नावावर केली. या सामन्याने भारतासाठी विशेष महत्त्व ठेवले कारण भारताने या स्पर्धेत पाकिस्तानवर सलग तीन विजय मिळवले – साखळी फेरी, सुपर फोर आणि अंतिम सामन्यात.
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत गांगुली यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पॅनेल विजयी झाले.
प्रत्येक वर्षी ६ डिसेंबर या दिवशी आपण भारतरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महान समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे महापरिनिर्वाण दिन साजरे करतो. या दिवशी १९५६ मध्ये डॉ. आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांचा विचार, त्यांच्या संघर्षाची ज्योत अजूनही भारतीय समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात उजळत आहे.
८ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक साक्षरता (Literacy) दिन म्हणून साजरा केला गेला. मानवी समाज सुसंस्कृत बनून समाजाचे शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांपासून अज्ञानी लोकांची होणारी पिळवणूक, फसवणूक, शोषण आदीपासून मुक्तता व्हावी.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.