भारत-पाकिस्तान सीमेवरून कारगिल मार्गे पाकिस्तानात गेलेल्या नागपूरच्या सुनीता जामगडे (Sunita Jamgade) प्रकरणात एक नवा वळण आलं आहे. कारगिल पोलिसांनी तिच्याविरोधात विशेष कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून तिला कारगिल येथे तपासासाठी नेण्याचे नियोजन सुरू होते.
नागपूर शहरातील विद्यार्थ्यांना साहसिक खेळांचा अनुभव देण्यासाठी आणि त्यांच्यात धाडसाची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने (NMC) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सूर्यनगर येथील लता मंगेशकर उद्यानात तब्बल ८ कोटी ७९ लाख १६ हजार ६९४ रुपयांच्या खर्चाने ‘अॅडव्हेंचर पार्क’ उभारण्यात येणार आहे.
नागपूर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत नागपूर महानगरपालिकेने वाठोडा परिसरात आधुनिक श्वान आश्रय (Modern dog shelter) केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ६ कोटी ८९ लाख ६७ हजार २८१ रुपयांचा खर्च मान्य करण्यात आला आहे.
राज्यात कोरोना (Corona) संसर्गाचा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. मंगळवारी २४ तासांमध्ये ८६ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, एकूण चार जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे, ज्यांच्या मृत्यूला इतर गंभीर आजारही कारणीभूत ठरले आहेत.
राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विदर्भासह अनेक भागांत शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे ठोस पावलं उचलली आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, "शेतकऱ्यांना सुरुवातीला १० हजार रुपयांचे तात्पुरते अनुदान देण्यात येणार आहे.
येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी (Dr Abhijit Chaudhary) यांनी सर्व संबंधित विभागप्रमुखांना मानसूनपूर्व कामांची पूर्तता तातडीने आणि प्रभावीपणे करण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी आयोजित आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) येत्या २५ मे रोजी नागपूरच्या दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या उपस्थितीत शहरात काही महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर प्रशासनाने तयारीला गती दिली आहे.
नागपूरातील नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकाचा (Itwari Railway Station) पुनर्विकास पूर्णत्वास गेला असून, या नव्या रूपातील स्थानकाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुरुवारी पार पडले. या कार्यक्रमात त्यांनी गोंदिया जंक्शनच्या सुधारित स्वरूपाचाही लोकार्पण केला.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने काँग्रेस (Congress) पक्षाने राज्यभरात तिरंगा रॅलीचे आयोजन केले असून, नागपूर शहरातही याचे आयोजन उत्साहात पार पडले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली भारत माता चौकातून शहीद चौकाकडे मार्गस्थ झाली.
राज्यातील उन्हाळ्याने हैराण झालेल्या जनतेला अखेर पावसाच्या (Rain) सरींचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १९ मेपासून २५ मे दरम्यान महाराष्ट्रात विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शहरात सुरु असलेल्या 'ऑपरेशन थंडर' मोहिमेंतर्गत अंमली पदार्थविरोधी लढ्याला वेग येत असून, जरीपटका परिसरात मेफेड्रोन (MD) ड्रग्ज विक्री करत असलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
Youth killed accident on Sakkardara flyover | सक्करदरा उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री एक भीषण अपघात घडला, ज्यात २५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. महेश प्रल्हाद मुंडे (वय २५, रा. आदिवासी सोसायटी, टेलिफोन नगर, दिघोरी) असे मृताचे नाव आहे.
लातूर (Latur) जिल्ह्यात तुळजापूर-लातूर महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. आशीव पाटी परिसरात दोन खासगी प्रवासी बस एकमेकांना जोरदार धडकून अपघात झाला. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून १५ ते २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मुळशी तालुक्यातील वैष्णवी (Vaishnavi) हगवणे आत्महत्येच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ माजवली असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने कठोर पावले उचलली आहेत. वैष्णवीच्या सासऱ्यांविरोधात कारवाई करत, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांना पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांवरून हटवण्यात आले असून, त्यांची पक्षातूनही हकालपट्टी करण्यात आली आहे.
आयपीएल २०२५ मध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयोजित केलेल्या विजयी रॅलीत चेंगराचेंगरी झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात आरसीबीसह इव्हेंट मॅनेजर ‘डीएनए’, कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आणि इतरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आयपीएल २०२५ जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या (RCB) सत्कारासाठी एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमलेल्या प्रचंड गर्दीने नियंत्रण सुटल्यामुळे भीषण चेंगराचेंगरीची घटना घडली. या अनपेक्षित घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून ३३ जण जखमी झाले आहेत.
संसदेला लवकरच प्रारंभ होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर' या गाजलेल्या प्रकरणावर चर्चा होणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी दिली आहे. हे अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होऊन १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
भारताविरोधी कट्टर कारवायांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या जैश-ए-मोहम्मद (Jaish e Mohammed) या दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ नेता मौलाना अब्दुल अजीज इसार याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर गुप्तचर यंत्रणा आणि दहशतवादी नेटवर्कमध्ये खळबळ उडाली आहे.
सोमवारी रात्री उशिरा आलेल्या सौम्य भूकंपामुळे (Earthquake) संपूर्ण पाकिस्तान हादरला, मात्र सर्वात मोठा परिणाम झाला तो कराचीच्या मालीर जिल्हा कारागृहात. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवताच तुरुंगात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अनेक कैदी आधीच त्यांच्या बॅरेकबाहेर होते आणि गोंधळाचा फायदा घेत तब्बल २१६ कैद्यांनी तुरुंगातून पलायन केलं.
Ukrainian drone attack as Indian MPs plane lands in Moscow | पाकिस्तानमधील वाढत्या दहशतवादाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्दाफाश करण्यासाठी भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ विविध राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहे. मात्र, या शिष्टमंडळाचा रशिया दौरा सुरू होत असतानाच एक अत्यंत धक्कादायक घटना घडली.
राजकीय वर्तुळात सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोन्ही बाजूंनी हालचाली सुरू झाल्याची चर्चा असून, दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरूनही संपर्क झाल्याचे संजय राऊत यांनी सूचक वक्तव्याद्वारे संकेत दिले आहेत.
काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते दिलीप कुमार सानंद यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत ११ हजार कार्यकर्त्यांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. येत्या १२ जून रोजी अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार असून, त्यामुळे काँग्रेसला विशेषतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना मोठा धक्का बसला आहे.
आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय हलचालींना वेग आला आहे. मनसे आणि ठाकरे गटातील संभाव्य युतीच्या चर्चा रंगात असतानाच, या चर्चांना बळ देणारी एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. मनसेचे अंधेरी पूर्वमधील प्रमुख पदाधिकारी वैभव दळवी (Vaibhav Dalvi) यांनी थेट मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी स्वतः त्यांच्या हाती शिवबंधन बांधून स्वागत केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला असून, ते सध्या अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत.
मुंबईवर अदानींसारख्या उद्योगपतींचे अतिक्रमण सुरू असून, केंद्र सरकारच्या मदतीने ही शहरं मराठी माणसाच्या हातून काढून घेण्याचा डाव सुरू आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वाडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सत्तेसाठी भाजपने पैशाचा आधार घेतल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी म्हटले की, "भाजपने सत्ता म्हणजे पैसा आणि पैसा म्हणजे सत्ता हे समीकरण अचूक जमवले आहे."
Aditya Thackeray on MNS Thackeray alliance | राज्यात आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता असल्यामुळे राजकीय घडामोडींना गती मिळाली आहे. विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये मोठी उलथापालथ घडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ही घोषणा नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली, ज्यावेळी खासदार संजय राऊत यांचा फोन आला आणि बडगुजर यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला
शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुन्हा एकदा रोखठोक शैलीत घणाघाती टीका केली आहे. महाजन हे पक्षफोडीच्या भाजप यंत्रणेतील प्रमुख दलाल असून, त्यांचीच वाणी भाजपला डुबवेल, असा थेट आरोप त्यांनी केला.
भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाबाबत मोठा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, पुढील काही दिवसांत ठाकरे गटाला गंभीर राजकीय धक्का बसू शकतो आणि पक्षाचे अस्तित्व टिकेल की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.
मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना त्यांच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल 'पद्मश्री' या राष्ट्रपदकाने गौरविण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
बॉलिवूडमधील चर्चित पण तितकाच वादग्रस्त दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) पुन्हा एकदा आपल्या वर्तनामुळे चर्चेत आला आहे. यावेळी त्याने अभिनेत्री कियारा आडवाणीच्या फोटोवर एक अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी करत सोशल मीडियावर गोंधळ उडवून दिला आहे.
‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या पर्वाचा विजेता आणि मराठमोळा गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका कालावधीनंतर बिग बॉस मराठी ५ मध्ये सहभागी झाल्यापासून त्याला नवी ओळख आणि लोकप्रियता मिळाली. याच पार्श्वभूमीवर एका विशेष मुलाखतीत अभिजीतने आपल्या करिअरबाबत आणि पुढील स्वप्नांबाबत मनमोकळेपणाने संवाद साधला.
ज्येष्ठ अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून ही माहिती आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे, “नमस्कार मित्रांनो, माझा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कृपया काळजी घ्या आणि मास्क वापरणं विसरू नका.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे. वेगवेगळ्या चकमकीत २४ नक्षलवादी मारले गेले. यादरम्यान एक सैनिक शहीद झाला आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
IMF predicts India is economic superpowerit will overtake even Japan | जगभरात आर्थिक अनिश्चिततेचं वातावरण असतानाही भारताने स्थिरतेची आणि प्रगतीची दिशा पकडली आहे. रिझर्व्ह बँकेच्या एप्रिल महिन्यातील “अर्थव्यवस्थेची स्थिती” या अहवालात देशाच्या आर्थिक वाढीच्या प्रवासाला सकारात्मक पोषक परिस्थिती असल्याचं चित्र उभं राहिलं आहे.
मागील काही महिन्यांमध्ये आकाशाला भिडलेला सोन्याचा (Gold) दर आता खाली येऊ लागला आहे. एप्रिलमध्ये १० ग्रॅमसाठी जवळपास १ लाख रुपये गाठणाऱ्या सोन्याच्या किमतीत सध्या तब्बल १० टक्क्यांची घट झाली आहे. सध्या १० ग्रॅमसाठी सोने सुमारे ९२,००० रुपयांवर आले असून, लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर ही सामान्य ग्राहकांसाठी खरेदीची चांगली संधी ठरू शकते.
सोन्याचे (Gold) दर लवकरच मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय सुरेश केडिया यांच्या म्हणण्यानुसार, आगामी चार ते सहा महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात १९ हजार रुपयांची घसरण होण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकतीच रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सने कपात केली असून, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कर्जदरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे SBI कडून गृहकर्ज किंवा MSME कर्ज घेणाऱ्या लाखो ग्राहकांना त्यांच्या EMI मध्ये थेट फायदा होणार आहे.
रमजानच्या (Ramadan) पवित्र महिन्याच्या आगमनाचा उत्साह लोकांमध्ये दिसून येतो. शुक्रवारी चंद्र दिसला नाही, त्यानंतर उलेमांनी घोषणा केली की रमजान महिन्याचा पहिला उपवास रविवार, २ मार्च रोजी असेल. यासाठी रमजान महिन्यातील पहिली सेहरी रविवारी सकाळी फजरच्या अजानपूर्वी केली जाईल.
Record breaking darshan of devotees in Ayodhya | नुकतेच प्रयागराजमध्ये भव्य-दिव्या महाकुंभ मेळ्याचा समारोप झाला. महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जाऊन राम दर्शन घेत होते. यामुळे अयोध्येतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.सुमारे लाखो भाविक दररोज राम दर्शन घेत आहेत.
Chaturmasya Kartik Festival from 10 November | समर्थ सद्गुरू श्री सीताराम महाराज दत्त दरबारतर्फे 10 ते 13 नोव्हेंबर असे सलग चार दिवस चातुर्मास्य कार्तिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी चातुर्मासातील अखंड श्रीगुरुचरित्र सप्ताहनुष्ठान समाप्ती, तसेच कार्तिकोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
Story of brother Yamraj and sister Yamuna । दरवर्षी कार्तिक मासातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. याला यम द्वितीया असेही म्हणतात. हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या विशेष प्रसंगी बहिण आपल्या भावाला टिळक लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते.
IPL 2025 चा अंतिम सामना इतिहासात कोरला गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) ने अखेर आयपीएलचा चषक आपल्या नावावर केला. पंजाब किंग्जवर ६ धावांनी मिळवलेल्या विजयाने RCB ने तब्बल १८ वर्षांची प्रतीक्षा संपवली. पण या विजयाचा सगळ्यात भावनिक आणि अविस्मरणीय क्षण ठरला तो विराट कोहलीचा आनंदाश्रूंनी भरलेला सेलिब्रेशन.
आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला अवघ्या काही धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या पराभवाने फक्त संघाचंच नाही, तर टीमच्या सहमालकीण प्रिती झिंटाच्या (Preity Zinta) मनातही असह्य वेदना उमटल्या. सामन्यानंतरच्या क्षणी प्रिती झिंटाच्या डोळ्यांत आलेले अश्रू संपूर्ण स्टेडियम आणि लाखो चाहत्यांच्या मनाला स्पर्शून गेले.
भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे IPL (IPL)2025 हंगामाचे सामने स्थगित करण्यात आले होते. मात्र आता दोन्ही देशांमध्ये युद्धविराम जाहीर झाल्याने स्पर्धा पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL 2025 च्या हंगामाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला ‘ISIS कश्मीर’ या दहशतवादी संघटनेने थेट जीवे मारण्याची धमकी दिली असून, यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही धमकी मिळाल्याचं समोर आलं आहे.
भारताचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि मराठमोळा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) याने (8 एप्रिल) अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधवने भाजपाच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) व रीलस्टार धनश्री वर्मा यांचा पाच वर्षाचा संसार अखेर मोडला आहे.दोघांनीही आज घटस्फोटाची अधिकृत माहिती सोशल मीडियावर दिली. धनाश्री व युजवेंद्र यांच्या घटस्फोटामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Inter college handball competition | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग व ज्योतिबा कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन (महिला व पुरूष) हँडबॉल स्पर्धेचे शिव छत्रपती पुरस्कार विजेते मिलिंद माकडे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची खेळाडू मंजिरी तांबे (Manjiri Tambe) हिने जम्मू विद्यापीठ जम्मू येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत फाईल या वैयक्तिक गटात कांस्यपदक प्राप्त केले आहे.
BCCI Abolishes Impact Player Rule | आयपीएलच्या शेवटच्या हंगामात इम्पॅक्ट प्लेयर अनेक वादांचा विषय ठरला होता. अनेक बड्या खेळाडूंनी या नियमाविरोधात विधाने केली. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या नियमाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धांमधून इम्पॅक्ट प्लेयर हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
१ मे हा दिवस जागतिक कामगार दिन (World Labor Day) म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगभरातील कामगारांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. केवळ भारतातच नाही तर जगभरातील ८० हुन अधिक देशात या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते.
सध्या मुलांमध्ये स्टोन आणि कॅन्सर (Cancer) होण्याचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सर सारख्या जीवघेण्या आणि असाध्य आजाराचे प्रमाण मुलांमध्ये वाढण्याचे कारण शोधण्यासाठी संशोधकांनी संशोधन केले. या संशोधनाचा अहवाल बमेडमध्ये प्रकाशित करण्यात आला.
नेपाळमधील (Nepal) नागरिक पुन्हा एकदा राजेशाही प्रस्थापित व्हावी यासाठी रस्त्यांवर उतरून आंदोलन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले असून या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात दोन जणांचा जीवही गेला आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीतील ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी (Meena Kumari) यांचा आज स्मृतिदिन. मीना कुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी एका सुन्नी मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव मेहजबिन असे होते. कलेचा वारसा त्यांना कुटुंबातूनच मिळाला. त्यांचे वडील अली बक्ष हे चित्रपट आणि पारशी रंगभूमीवरील कलाकार होते.