नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दहावी उत्तीर्ण होऊन अकरावी-बारावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या ५० मेधावी विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०,००० रुपयांची आर्थिक मदत देण्यास मंजुरी दिली आहे. ही रक्कम दरवर्षी दोन हप्त्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे.
शेतकरी आंदोलन आणि न्यायव्यवस्थेविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी माजी आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांना बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने चांगलंच सुनावलं. न्यायालयाने स्पष्ट सांगितले की, लोकशाहीत आंदोलन करणे हा मूलभूत अधिकार असला तरी ते शिस्तीत आणि शांततेतच व्हायला हवे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार तुमसर नगरपरिषद (Tumsar Municipal Council) सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीचा तपशील निवडणूक निर्णय अधिकारी जनार्धन लोंढे (उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, भंडारा) यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि नगरपरिषद मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण उपस्थित होते.
नागपूर (Nagpur) शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक हरित आणि शाश्वत करण्यासाठी महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोराडी येथील ‘आपली बस’ ई-बस डेपोमध्ये 33 केव्ही/0.433 केव्ही क्षमतेचे अत्याधुनिक वीज सबस्टेशन उभारण्यात आले असून, त्याचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद (Nagar Parishad) आणि नगर पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. निवडणुका मुक्त, निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येत्या ७ ते १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात होणाऱ्या खासदार सांस्कृतिक महोत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी नागपूर (Nagpur) शहर वाहतूक पोलिसांनी विशेष वाहतूक आराखडा लागू केला आहे.
नागपुरात (Nagpur) शनिवारी सकाळी एक भयावह प्रसंग घडला. प्रवाशांनी भरलेली एसटी बस अचानक धुराने भरून गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही क्षणांतच बसमध्ये गोंधळ माजला आणि जीव वाचवण्यासाठी अनेक प्रवाशांनी खिडक्यांतून उड्या मारत बाहेर पडले.
राज्यातील शेतकऱ्यांच्या (Farmers) संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा झालेल्या चर्चेनंतर राज्यातील सर्व शेतकऱ्यांची ३० जूनपर्यंत संपूर्ण कर्जमाफी केली जाईल, अशी अधिकृत घोषणा केली.
शहरातील लतामंगेशकर रुग्णालयात (Lata Mangeshkar Hospital) घडलेली एक गंभीर घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मागील काही दिवसांत या रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर चार महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मृत्यूंमुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.
महिलांना आर्थिक स्थैर्य आणि स्वावलंबनाचा नवा मार्ग दाखवण्यासाठी नागपूर जिल्ह्यात ‘नवसखी उद्योगिनी योजना’ (Navsakhi Udyogini scheme) राबविण्यात आली आहे. या योजनेद्वारे ८० हजार महिलांना उद्योजकतेच्या माध्यमातून सक्षम बनविण्याचा उद्देश आहे. या योजनेचा शुभारंभ राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाला.
सीताबर्डी (Sitabardi) परिसरातील अपहरण आणि बलात्कार प्रकरणात आरोपी नानक लालताप्रसाद यादव याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती एस. पी. पोंक्षे यांनी हा निकाल दिला.
नागपूरच्या गंगाबाई घाट परिसरात भिक मागून जगणाऱ्या तरुणाचा त्याच्याच मद्यपी मित्राने (Drunk friend) निर्दयपणे खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोस्टमार्टम अहवालातून या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला असून, कोतवाली पोलिसांनी देवराव भजनलाल यादव (वय २८, रा. छिंदवाडा, मध्य प्रदेश) याला अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव सूरज शंकर मेश्राम (वय ३५, रा. कॉर्पोरेशन कॉलनी, गंगाबाई घाट) असे आहे.
सोन्याच्या शुद्धतेत भेसळ करून मुथूट फिनकॉर्प (Muthoot Fincorp) प्रायव्हेट लिमिटेडच्या हिंगणा शाखेला तब्बल 10.69 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
रंगारेड्डी जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात (Accident) २० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात खडीने भरलेल्या डंपरने राज्य परिवहन महामंडळाच्या बसला दिलेल्या धडकेत झाला.
देशाच्या पायाभूत विकासाला गती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) यांनी आज वाराणसीहून चार नव्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सेवांचे लोकार्पण केले. “वंदे भारत ही भारतीयांची, भारतीयांनी आणि भारतीयांसाठी बनवलेली ट्रेन आहे. प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान आहे,” असे मोदी म्हणाले.
बिहार विधानसभेच्या (Bihar Assembly) पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दुपारी १ वाजेपर्यंत एकूण ४२.३० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या टप्प्यात राज्यातील १८ जिल्यांतील १२१ जागांसाठी मतदान पार पडत आहे.
आयसीसी महिला विश्वचषक जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) यांनी आपल्या अधिकृत निवासस्थानी सत्कार केला. बुधवारी सायंकाळी ६ वाजता ७ लोक कल्याण मार्ग येथे झालेल्या या विशेष भेटीत मोदींनी संघातील प्रत्येक खेळाडूशी संवाद साधत त्यांचे मनापासून अभिनंदन केले.
माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केलेल्या एका विधानाने जागतिक पातळीवर खळबळ उडवली आहे. ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, “पाकिस्तान गुप्तपणे अणु चाचण्या करत आहे.” या वक्तव्यामुळे दक्षिण आशियात, विशेषतः भारतात, चिंता व्यक्त केली जात आहे.
गाझा (Gaza) पट्टीत पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, इस्रायलने काल उशिरा रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांत किमान ६० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. इस्रायलने हे हल्ले अशा वेळी केले जेव्हा पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासविरोधात तीव्र कारवाईचे आदेश दिले होते. इस्रायलकडून युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप हमासवर करण्यात आला आहे.
भारत आणि अमेरिकेतील व्यापार संबंधात मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर लागू असलेले आयात शुल्क कमी करण्याचा विचार सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांना नवी गती मिळू शकते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या जमीन व्यवहारातील अनियमिततेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात पार्थ पवारांवर थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे सेनेचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केली असून, या वक्तव्यानंतर महायुतीत नव्या वादाची ठिणगी पडली आहे.
‘वंदे मातरम’ (Vande Mataram) च्या १५०व्या वर्षानिमित्त देशभरात साजरा होणाऱ्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाचा निषेध करत भाजप कार्यकर्त्यांनी आझमी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर आंदोलन छेडले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर कंपनीशी संबंधित संशयास्पद जमीन व्यवहाराचे आरोप होत असतानाच, या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांनी या व्यवहाराची चौकशी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या आरोपांनी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील सरकारी जमिनीच्या विक्रीत अनियमितता केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी हा व्यवहार थेट फसवणुकीचा असल्याचे सांगत, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्याशी संबंधित असलेल्या पुण्यातील कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहारावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणात शिवसेना (ठाकरे गट) आमदार अंबादास दानवे यांनी पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीवर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत.
शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार आणि ज्वलंत नेते संजय राऊत (Sanjay Raut) सध्या मुंबईतील भांडूप येथील फोर्टिस रुग्णालयात उपचार घेत आहेत. काही दिवसांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. मात्र आज त्यांनी रुग्णालयातून शेअर केलेल्या एका फोटोने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा निर्माण केली आहे.
शिंदे गटाचे मागाठणेचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. उत्तर भारतीय समाजाच्या एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी म्हटले, “मराठी माझी आई आणि उत्तर भारत माझी मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे.”
Gulabrao Patil direct attack on BJP over Local elections | जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना महायुतीतील अंतर्गत मतभेद अधिकच तीव्र होताना दिसत आहेत. युतीच्या माध्यमातून लढायचे की स्वबळावर, या प्रश्नावर अजूनही भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात एकमत झालेलं नाही.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहता, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारच्या निष्क्रियतेवर तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. मराठवाड्याच्या दौऱ्याआधी त्यांनी ठामपणे सांगितले, “शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे भाग आहे. नाहीतर मी स्वतः शेतकऱ्यांच्या गावात जाऊन खरी वस्तुस्थिती लोकांसमोर आणीन.”
मुंबईत मतदार याद्यांतील गोंधळाच्या विरोधात आज महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा निघाला आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) नागपूरहून मुंबईकडे रवाना झाले. रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली.
माजी मंत्री आणि शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर सध्या त्यांचा आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री भुमी पेडणेकर यांचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. दोघेही मुंबईतील वांद्रे परिसरातील एका रेस्टोरंटमध्ये एकत्र दिसले असून, या व्हिडीओने नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.
बॉलिवूडच्या ग्लॅमरस जोडपं कतरिना (Katrina) कैफ आणि विक्की कौशल यांचं घर आज खूप खास आनंदाने भरलं आहे. दोघं आता आई-वडील बनले असून, त्यांच्या कुटुंबात गोडसर छोटा राजकुमार आला आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
झिम्मा, झिम्मा २ आणि फसक्लास दाभाडेच्या यशानंतर निर्माती क्षिती जोग आणि लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे या लोकप्रिय जोडीच्या ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ (Krantijyoti Vidyalaya Marathi Medium) या आगामी चित्रपटाची तारीख जाहीर झाली आहे.
महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ (Puna Shivaji Raje Bhosale) या चित्रपटाबद्दल आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये कुतूहल आहे आणि आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या पोस्टरनं ही उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे. वेगवेगळ्या चकमकीत २४ नक्षलवादी मारले गेले. यादरम्यान एक सैनिक शहीद झाला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) सरकार खाजगी कंपन्यांमधील कामगारांसाठी महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. राज्यात कामाचे तास सध्याच्या ९ तासांऐवजी १० तास करण्याचा विचार सुरु असून, ही माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असताना, सोन्याच्या (Gold) दरात झालेली घसरण ही ग्राहकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने घट होत असून, लग्नसराईच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
नोव्हेंबर (November) महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे आर्थिक काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी सुट्ट्यांचे नियोजन जरूर करा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नोव्हेंबर 2025 साठी प्रसिद्ध केलेल्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार देशभरातील बँका एकूण १३ दिवस बंद राहणार आहेत.
मागील काही दिवसांपासून सुरु असलेली सोने (Gold) आणि चांदीच्या किमतींची घसरण आज ही कायम राहिली आहे. यामुळे दागदागिन्यांची खरेदी करण्याची योजना करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु, या भावघसरणीने व्यापारी आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण केली आहे.
प्रधानमंत्री जनधन योजना (Jan Dhan Account) सुरू होऊन यावर्षी 10 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या योजनेअंतर्गत 10 वर्षे जुनी झालेली खाती Re-KYCशिवाय चालू ठेवता येणार नाहीत. जर ही प्रक्रिया ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण केली नाही तर खाते तात्पुरते बंद होईल आणि पैशांची ये-जा तसेच सरकारी अनुदान मिळणे थांबेल.
आज, २१ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार), दिवाळीचा (Diwali) सर्वात उत्साहवर्धक आणि शुभ दिवस — लक्ष्मीपूजनाचा दिवस साजरा केला जात आहे. हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावास्येच्या या पवित्र दिवशी धन, समृद्धी आणि आनंदाची आराधना केली जाते. देशभरात आज संध्याकाळी माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि कुबेर यांच्या पूजनाने घराघरांत मंगल वातावरण निर्माण होणार आहे.
हिंदू धर्मातील एक प्रमुख सण, दसरा (Dussehra), दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपासना व भक्तीनंतर हा दिवस विशेष महत्त्वाचा ठरतो. देशभरात मंदिरे, घरे आणि सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
नवरात्र (Navratri) म्हटलं की आपल्या मनात लगेच उपवास, साबुदाणा खिचडी, कुट्टू पुरी, फळाहार आणि सात्विक जेवण डोळ्यांसमोर उभं राहतं. देशभरातील अनेक भागांत नवरात्र म्हणजे संयम, कांदा-लसूण वर्ज्य आणि मांसाहार पूर्णतः टाळण्याचा काळ असतो.
Amazing places associated with mythological story of Goddess Sati | भारत ही मंदिरांची आणि देवस्थानांची भूमी मानली जाते. महाराष्ट्रात विशेषतः ‘साडेतीन शक्तीपीठे’ म्हणून ओळखली जाणारी चार मंदिरे – तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुकामाता आणि वणीची सप्तशृंगी देवी – यांना धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे.
महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल असा २०२५ चा विश्वविजय भारतीय महिलांनी आपल्या जिद्दीने आणि एकतेने साध्य केला आहे. या ऐतिहासिक पराक्रमाचा गौरव वाढवताना बीसीसीआयने (BCCI) तब्बल ५१ कोटी रुपयांचे पारितोषिक घोषित करत महिला क्रिकेटच्या गौरवकथेला नवा अध्याय जोडला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian women Cricket team) रविवारी इतिहास घडवत आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकावर आपले नाव कोरले. दमदार खेळ आणि अदम्य जिद्दीच्या जोरावर ‘वुमन इन ब्लू’ने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावले. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्व क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहिला.
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (२८ सप्टेंबर) आशिया कप (Asia Cup) २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला ५ विकेट्सने हरवून ट्रॉफी आपल्या नावावर केली. या सामन्याने भारतासाठी विशेष महत्त्व ठेवले कारण भारताने या स्पर्धेत पाकिस्तानवर सलग तीन विजय मिळवले – साखळी फेरी, सुपर फोर आणि अंतिम सामन्यात.
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत गांगुली यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पॅनेल विजयी झाले.
आशिया चषक (Asia Cup) टी-२० स्पर्धेतील थरार आता खऱ्या अर्थाने वाढणार आहे. शनिवारपासून सुपर-फोर फेरीला सुरुवात होणार असून रविवारी पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची प्रतीक्षा चाहत्यांना लागली आहे.
भारत-पाकिस्तान क्रिकेटमध्ये मैदानावरची धडक जितकी तुफानी असते, तितकीच निवृत्त खेळाडूंच्या वक्तव्यांमधूनही रंगतदार वाद निर्माण होत असतात. नुकताच असा एक किस्सा समोर आला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) आणि भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा मैदानावरील कामगिरीपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पत्नी नताशा स्टॅन्कोविकपासून विभक्त झाल्यानंतर त्याचे नाव अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्ससोबत जोडले गेले होते. काही काळापूर्वी ब्रिटिश सिंगर जास्मिन वालियाशी त्याचा संबंध असल्याच्या चर्चा झाल्या होत्या.
क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर अलीकडेच विवाहबंधनाकडे पहिले पाऊल टाकत साखरपुड्याच्या सोहळ्यात सहभागी झाला. १३ ऑगस्ट रोजी मुंबईतील खास आणि निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात अर्जुनची बालपणीची मैत्रीण सानिया चंडोक हिच्यासोबत त्याचा साखरपुडा पार पडला.
नागपूरच्या तेजस्वी बुद्धिबळपटू दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने भारतीय बुद्धिबळ क्षेत्राला ऐतिहासिक यश मिळवून दिलं आहे. रविवारी पार पडलेल्या 2025 फिडे महिला वर्ल्ड चेस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिव्याने ज्येष्ठ खेळाडू कोनेरू हम्पीचा पराभव करत विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.
८ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक साक्षरता (Literacy) दिन म्हणून साजरा केला गेला. मानवी समाज सुसंस्कृत बनून समाजाचे शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांपासून अज्ञानी लोकांची होणारी पिळवणूक, फसवणूक, शोषण आदीपासून मुक्तता व्हावी.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.
Will the Indian team make history | भारताच युवा क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असून तिथे दोन्ही देशात पाच कसोटींची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यास २० जून पासून सुरुवातही झाली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी करत ३०० च्या वर धावा काढल्या त्या ही फक्त तीन गडी गमावून. पहिल्याच दिवशी भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि नवनियुक्त कर्णधार शुभमन गिल यांनी शतके झळकावली. उपकर्णधार ऋषभ पंतने अर्धशतक झळकावले.