टाटा संसचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन (N Chandrasekaran) यांनी आज नागपूरमधील सोलर इंडस्ट्रीजच्या संरक्षण क्षेत्रातील उत्पादन केंद्राचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी गोळा-बारुद, क्षेपणास्त्रे आणि इतर संरक्षण उत्पादने कशी तयार केली जात आहेत याची पाहणी केली.
राज्यात कॅन्सरविरोधी धोरण अधिक परिणामकारक व्हावे यासाठी सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. त्यांनी नागपूरमधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयाचे अपूर्ण असलेले बांधकाम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.
मानकपूर (Manakpur) फ्लायओव्हरवर अलीकडेच झालेल्या शालेय वाहन अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू आणि आठ विद्यार्थ्यांच्या जखमी होण्याच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर विभागीय परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शालेय वाहने तपासण्याची मोहीम सुरू केली आहे.
नागपूर (Nagpur) जिल्हा सत्र न्यायालय परिसरात शुक्रवारी संध्याकाळी भीतीदायक घटना घडली. जजच्या कारला अचानक आग लागल्याने परिसरात तातडीची हालचाल सुरु झाली.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या (Dhamma Chakra Pravartan Day) पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारीला सुरुवात केली आहे. येत्या महिन्यात होणाऱ्या या ऐतिहासिक उत्सवात देशभरातून लाखो अनुयायी नागपूरात दाखल होणार असल्याने दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस परिसरात आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, अन्नपुरवठा आणि अन्य सार्वजनिक सोयी-सुविधांची व्यवस्था सुनिश्चित करण्याचे आदेश सर्व विभागांना देण्यात आले आहेत.
विदर्भ आणि विशेषतः नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अडानी (Adani) समूह आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांनी विदर्भात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.
बुधवारी मध्यरात्रीनंतर नागपूरपासून (Nagpur) अवघ्या ४० किमी अंतरावर असलेल्या चकडोह-बाजारगाव येथील सोलर ग्रुपच्या T-15 विस्फोटक निर्मिती केंद्रात प्रचंड स्फोट झाला. या अपघातात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल ३० जण जखमी झाले आहेत. यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
मंगळवारी सकाळी नागपूर विमानतळावर (Nagpur airport) भीषण अपघात टळला. नागपूरहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या (फ्लाईट क्रमांक 6E…) विमानाला सकाळी ७.०५ वाजता उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच एका पक्ष्याने धडक दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी अलीकडेच आपली जंबो कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यानंतर शुक्रवारी तिवारी यांनी आपल्या नव्या टीमसह केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Gadkari) यांची भेट घेतली. या वेळी गडकरींनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी अधिक ताकदीने काम करण्याचे आवाहन केले.
अंडरवर्ल्ड डॉन आणि शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळी (Arun Gawli) याला सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन. कोटिस्वर सिंह यांच्या खंडपीठाने गवळी यांची प्रलंबित याचिका, त्यांचे वय (७६ वर्षे) आणि आतापर्यंतचा कारावास लक्षात घेऊन हा निर्णय दिला.
अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर (Hookah parlor) नागपूर क्राइम ब्रांचने छापा टाकला. या कारवाईत पार्लरचा मॅनेजर पोलिसांच्या ताब्यात आला असून मालक फरार झाला आहे. पोलिसांनी पार्लरमधून तब्बल ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात हुक्का पॉट व सुगंधी तंबाखूचा समावेश आहे.
केरळमधील प्रसिद्ध शबरीमाला (Sabarimala) मंदिरातील सोने रहस्यमय परिस्थितीत गायब झाल्याचे समोर आले आहे. हे मंदिर देशभरातील भक्तांसाठी महत्त्वाचे ठिकाण असून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळेच या घटनामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
खापरखेडा परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. केवळ खंडणीसाठी (Ransom) एका ११ वर्षीय निरागस मुलाचे अपहरण करून त्याची निर्दयी हत्या करण्यात आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
हैदराबाद गॅझेट प्रमाणे बंजारा (Banjara) समाजालाही अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी करत पवन गोपीचंद चव्हाण (वय 32) या तरुणाने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने थेट आपल्या मागणीची तक्रार व्यक्त केली होती.
प्रधानमंत्री जनधन योजना (Jan Dhan Account) सुरू होऊन यावर्षी 10 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे या योजनेअंतर्गत 10 वर्षे जुनी झालेली खाती Re-KYCशिवाय चालू ठेवता येणार नाहीत. जर ही प्रक्रिया ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण केली नाही तर खाते तात्पुरते बंद होईल आणि पैशांची ये-जा तसेच सरकारी अनुदान मिळणे थांबेल.
नवरात्रोत्सव सुरू होताच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये राजकीय वाद रंगत आहेत. उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये ९ दिवसांपर्यंत नॉन-व्हेज खाण्यावर बंदी लावण्याची मागणी होत आहे, तर मध्य प्रदेशात गरबा आणि दांडिया उत्सवात बिगर हिंदूंना (Non Hindus) प्रवेश न दिला जाणार असल्याची घोषणा झाली आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देशातील तरुणांच्या भविष्यासमोर उभ्या संकटांवर लक्ष वेधत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी बेरोजगारी आणि मतचोरी या दोन समस्यांचा थेट संबंध जोडून मोदी सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधींच्या मते, "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या ताणातून मुक्त करणेच आजची खरी देशभक्ती आहे."
रशिया युक्रेन (Russia Ukraine) युद्ध पुन्हा एकदा तीव्र झाले असून रशियाने मोठ्या प्रमाणावर हल्ला चढवला आहे. रशियाने मॉस्कोकडे जाणारे तब्बल 40 हून अधिक युक्रेनियन ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे, युक्रेनने म्हटले आहे की रशियन क्षेपणास्त्र, ड्रोन आणि बॉम्बहल्ल्यांत किमान दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नुकत्याच केलेल्या भारतविरोधी आयात शुल्कवाढ आणि एच-१बी व्हिसा शुल्कवाढीच्या निर्णयांनंतर आता त्यांनी गर्भवती महिलांना दिलेला अजब सल्ला चर्चेत आला आहे.
खैबर पख्तूनख्वा: पाकिस्तानमधील (Pakistan) तिराह घाटीतल्या मत्रे दारा गावावर पाकिस्तानच्या स्वतःच्या हवाई दलाने रात्री सुमारे २ वाजता हवाई हल्ला केला. JF-17 फाइटर जेटने LS-6 बॉम्ब सोडले. या हल्ल्यात सुमारे ३० लोक ठार झाले असून त्यात महिलां आणि मुलांचा समावेश आहे.
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी बुधवारी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त चिंचपुर ढगे आणि पिंपळगाव परिसराची पाहणी केली. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आणि सरकारला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तातडीने मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक आज धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करत आहेत.
पुण्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात जोरदार हालचाल सुरू आहे. त्यातच भाजप (BJP) आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना पुण्यात मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. पडळकरांनी राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह आणि कौटुंबिक टीका केली होती, ज्यावरून राजकीय वाद पेटला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसेची संभाव्य युती ही चर्चेचा विषय ठरली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवर महत्त्वाची बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना थेट निर्देश दिले आहेत.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा भाजपवर थेट हल्ला चढवला आहे. कर्नाटकातील निवडणुकीदरम्यान अनेक मतदारांची नावे जाणूनबुजून वगळण्यात आली, असा गंभीर आरोप त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर केला.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीत संतापाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून नाराजी व्यक्त केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेवरून एनसीपी (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी तीव्र शब्दांत पलटवार केला आहे. त्यांनी पटोले यांना थेट मानसिक संतुलन बिघडल्याची उपमा दिली.
मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून संधी मिळावी, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा संघर्ष उभारला आहे. त्यांच्या मागणीवर आधारित मुंबईत आंदोलनही झाले. यानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) लागू केले आणि त्यासंबंधित जीआर काढली. मात्र, या निर्णयावरून ओबीसी समाजात नाराजी निर्माण झाली आहे.
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईतील बेस्ट डेपोंच्या जमिनींबाबत भाजपवर थेट आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, फडणवीसांच्या लाडक्या बिल्डर्समार्फत जमिनींचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि भविष्यात बेस्टला तोट्यात आणून बंद पाडण्याचा डाव रचला जात आहे.
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) याला त्यांच्या बहुचर्चित चित्रपट ‘जवान’ मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. ही शाहरुखची कारकीर्दीतील पहिली राष्ट्रीय सन्मानाची गाठ असून, पुरस्कार सोहळा २३ सप्टेंबर रोजी दिल्लीत पार पडला. पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
भारतीय सिनेसृष्टीसाठी अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे ७१वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे (National Film Awards) वितरण आज दिल्लीमध्ये पार पडले. बॉलिवूड, साऊथ आणि मराठी चित्रपटसृष्टीतील विजेत्यांनी या सोहळ्यात पुरस्कार स्वीकारले. या प्रसंगी मराठी चित्रपटसृष्टीने पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे.
बॉलिवूडची चर्चित अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) काही काळापासून प्रेग्नेंसीच्या अफवांमध्ये होती. त्यांच्या काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता यावर अधिकृत घोषणा झाली आहे. कतरिनाने इंस्टाग्रामवर बेबी बंपचा फोटो शेअर करून प्रेग्नंसीची माहिती दिली आहे.
फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ (Chhawa) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या सिनेमात विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत होते. पण दिग्दर्शक अनुराग कश्यपने नुकताच या चित्रपटाबाबत केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.
छत्तीसगड (Chhattisgarh) पोलिसांनी सहा राज्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात नक्षलवादी नेत्याला चकमकीत ठार मारले आहे. टेंटू लक्ष्मी ऊर्फ सुधाकर ऊर्फ गौतम ऊर्फ नरसिंहाचलम नायडू (वय ६५, रा. चिंतलपौडी, आंध्रप्रदेश) असे या ठार झालेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) अबुझमाडच्या जंगलात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई उचलली असून, आतापर्यंत 26 नक्षलवादी ठार मारण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा (Sukma) आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १७ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
शहरातील दंतेवाडा (Dantewada) आणि विजापूर सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळी 8 वाजतापासून चकमक सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू असून या चकमीत जवानांनी तीन नक्षलवाद्यांना ठार केले. चकमकी झालेल्या घटनास्थळावरुन 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रांसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली आहे. वेगवेगळ्या चकमकीत २४ नक्षलवादी मारले गेले. यादरम्यान एक सैनिक शहीद झाला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) सरकार खाजगी कंपन्यांमधील कामगारांसाठी महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. राज्यात कामाचे तास सध्याच्या ९ तासांऐवजी १० तास करण्याचा विचार सुरु असून, ही माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
आरटीई (RTE) अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र आता ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.
CA Exam Result Announced by ICAI | इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारा घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल बुधवारी जाहीर केला आहे. हा निकाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) च्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे.
समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती (Scholarship) /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु. जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३ - २४ या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता दिनांक २५ जुलै २०२४ पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे
२२ सप्टेंबरपासून देशभरात नवीन जीएसटी (GST) दर लागू होणार आहेत. यामुळे अन्नधान्यापासून ते दैनंदिन गरजांपर्यंत अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. मात्र, घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होणार का? या प्रश्नावर जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.
जागतिक बाजारात सोनं (Gold) आणि चांदीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात बदल झाले असून गुंतवणूकदारांसाठी ही दिलासादायक किंवा महत्त्वाची बातमी ठरली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात केल्यामुळे सोन्याची किंमत एका दिवसात मोठ्या प्रमाणात चढली, पण लगेचच ती किंमत थोड्या प्रमाणात घसरली.
गुंतवणुकीसाठी सोने (Gold) पुन्हा एकदा ‘सुरक्षित ठिकाण’ ठरले आहे. गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या भावात तब्बल ४२ टक्क्यांची झेप पाहायला मिळाली असून, त्याच काळात शेअर बाजारातील निफ्टी ५० निर्देशांक फक्त ४ टक्क्यांनी वाढला आहे. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दराने विक्रमी स्तर गाठत नवा इतिहास रचला.
नवरात्र (Navratri) म्हटलं की आपल्या मनात लगेच उपवास, साबुदाणा खिचडी, कुट्टू पुरी, फळाहार आणि सात्विक जेवण डोळ्यांसमोर उभं राहतं. देशभरातील अनेक भागांत नवरात्र म्हणजे संयम, कांदा-लसूण वर्ज्य आणि मांसाहार पूर्णतः टाळण्याचा काळ असतो.
Amazing places associated with mythological story of Goddess Sati | भारत ही मंदिरांची आणि देवस्थानांची भूमी मानली जाते. महाराष्ट्रात विशेषतः ‘साडेतीन शक्तीपीठे’ म्हणून ओळखली जाणारी चार मंदिरे – तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुकामाता आणि वणीची सप्तशृंगी देवी – यांना धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे.
सोमवार, २२ सप्टेंबरपासून बुधवार, १ ऑक्टोबरपर्यंत शारदीय नवरात्र (Sharad Navratri) साजरे होत आहेत. यंदा तृतीया तिथीच्या वृद्धीमुळे नवरात्रोत्सव दहा दिवसांचा झाला आहे. आश्विन महिन्यात येणारा हा उत्सव पृथ्वीवरील निर्मितीशक्तीला वंदन करण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण मानला जातो.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आजचा शनिवार विशेष मानला जातो. शनिदेवाच्या (Shani Dev) आराधनेसाठी समर्पित असलेल्या या दिवशी सिंह राशीत चंद्राचा प्रवेश होत आहे. त्याचबरोबर बुधादित्य, सुनफा आणि कला यांसारख्या शुभ योगांचा संयोग घडत असल्यामुळे काही राशींवर विशेष आशीर्वाद लाभणार आहे.
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत गांगुली यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पॅनेल विजयी झाले.
आशिया चषक (Asia Cup) टी-२० स्पर्धेतील थरार आता खऱ्या अर्थाने वाढणार आहे. शनिवारपासून सुपर-फोर फेरीला सुरुवात होणार असून रविवारी पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची प्रतीक्षा चाहत्यांना लागली आहे.
भारत-पाकिस्तान क्रिकेटमध्ये मैदानावरची धडक जितकी तुफानी असते, तितकीच निवृत्त खेळाडूंच्या वक्तव्यांमधूनही रंगतदार वाद निर्माण होत असतात. नुकताच असा एक किस्सा समोर आला आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) आणि भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा मैदानावरील कामगिरीपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पत्नी नताशा स्टॅन्कोविकपासून विभक्त झाल्यानंतर त्याचे नाव अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्ससोबत जोडले गेले होते. काही काळापूर्वी ब्रिटिश सिंगर जास्मिन वालियाशी त्याचा संबंध असल्याच्या चर्चा झाल्या होत्या.
क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर अलीकडेच विवाहबंधनाकडे पहिले पाऊल टाकत साखरपुड्याच्या सोहळ्यात सहभागी झाला. १३ ऑगस्ट रोजी मुंबईतील खास आणि निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात अर्जुनची बालपणीची मैत्रीण सानिया चंडोक हिच्यासोबत त्याचा साखरपुडा पार पडला.
नागपूरच्या तेजस्वी बुद्धिबळपटू दिव्या देशमुख (Divya Deshmukh) हिने भारतीय बुद्धिबळ क्षेत्राला ऐतिहासिक यश मिळवून दिलं आहे. रविवारी पार पडलेल्या 2025 फिडे महिला वर्ल्ड चेस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिव्याने ज्येष्ठ खेळाडू कोनेरू हम्पीचा पराभव करत विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान भारताला मोठा झटका बसला आहे. संघाचा उपकर्णधार आणि प्रमुख यष्टीरक्षक ऋषभ पंतला (Rishabh Pant) दुखापतीमुळे मालिकेच्या पुढील सामन्यांतून माघार घ्यावी लागली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला सहा आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या अंडर-19 वनडे मालिकेत वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर सर्वांची मने जिंकली. मालिकेत भारताने 3-2 असा विजय मिळवला, पण खरी चर्चा झाली ती सूर्यवंशीच्या तुफानी खेळीची.
IPL 2025 चा अंतिम सामना इतिहासात कोरला गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) ने अखेर आयपीएलचा चषक आपल्या नावावर केला. पंजाब किंग्जवर ६ धावांनी मिळवलेल्या विजयाने RCB ने तब्बल १८ वर्षांची प्रतीक्षा संपवली. पण या विजयाचा सगळ्यात भावनिक आणि अविस्मरणीय क्षण ठरला तो विराट कोहलीचा आनंदाश्रूंनी भरलेला सेलिब्रेशन.
आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला अवघ्या काही धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या पराभवाने फक्त संघाचंच नाही, तर टीमच्या सहमालकीण प्रिती झिंटाच्या (Preity Zinta) मनातही असह्य वेदना उमटल्या. सामन्यानंतरच्या क्षणी प्रिती झिंटाच्या डोळ्यांत आलेले अश्रू संपूर्ण स्टेडियम आणि लाखो चाहत्यांच्या मनाला स्पर्शून गेले.
८ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक साक्षरता (Literacy) दिन म्हणून साजरा केला गेला. मानवी समाज सुसंस्कृत बनून समाजाचे शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांपासून अज्ञानी लोकांची होणारी पिळवणूक, फसवणूक, शोषण आदीपासून मुक्तता व्हावी.
Nanhe Farishte campaign to send children back home | घरात भांडण होणे, गर्दीत हरवणे, पुण्या - मुंबईसारख्या मोठ्या शहराचे आकर्षण या आणि अशा अनेक कारणांमुळे राज्यातील अनेक मुले पुण्या - मुंबई सारख्या मोठ्या शहरात दाखल होतात. कुटुंबाशी ताटातूट झालेली ही मुलं पुण्या - मुंबईतील रस्त्यांवर, फुटपाथवर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर भटकत असतात.
दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करणारी आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी एक अलौकिक धार्मिक परंपरा म्हणजे पुरीची रथयात्रा (Puri Rath Yatra). भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचा रथोत्सव म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याचा महापर्व आहे. पण या रथयात्रेमागे नेमकं काय कारण आहे? याचं उत्तर पौराणिक कथा आणि भावनिक श्रद्धेमध्ये दडलं आहे.
Will the Indian team make history | भारताच युवा क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असून तिथे दोन्ही देशात पाच कसोटींची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यास २० जून पासून सुरुवातही झाली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी करत ३०० च्या वर धावा काढल्या त्या ही फक्त तीन गडी गमावून. पहिल्याच दिवशी भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि नवनियुक्त कर्णधार शुभमन गिल यांनी शतके झळकावली. उपकर्णधार ऋषभ पंतने अर्धशतक झळकावले.