(Image Source : Internet)
नवी दिल्ली :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काल अर्थसंकल्प सादर केला. मात्र या अर्थसंकल्पावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. विरोधकांच्या टीकेला स्वतः अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सर्वाधिक बिहार आणि आंध्र प्रदेश राज्याला भरघोस तरतूद देण्यात आली होती. यामुळे विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. अर्थसंकल्पाबाबत महाराष्ट्रातून विरोधी गटाने सर्वाधिक टीका केली. यावर अर्थमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. एखाद्या राज्याचा अर्थसंकल्पात नाव घेतले नसेल तर त्या राज्याला वगळण्यात आले आहे असे नाही. ज्या राज्याचचे नाव घेतले नाही त्याचा अर्थ असा नाही की त्या राज्याला लाभ होत नाही, असे प्रत्युत्तर सीतारमन यांनी दिले आहे.