महाराष्ट्रावर 5 दिवसांचा अलर्ट; कोकण-विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

22 Sep 2025 20:08:05
 
Heavy rain
 Image Source:(Internet)
मुंबई:
मुंबईसह राज्यातील कोकण (Konkan) आणि विदर्भ भागात पुढील पाच दिवस मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण असून रिमझिम पावसाने शहरात थोडे वातावरण थंड केले आहे.
 
राज्यातील रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सोलापूर आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल; तर कोकण आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
 
मरगा तालुक्यातील मुरूम परिसरात अचानक आलेल्या वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत केले. विजांच्या कडकडाटासह वारा आणि पावसाने अनेक रस्ते आणि घरांमध्ये पाणी शिरले. पुण्यात सतत पावसामुळे ताप, सर्दी-खोकला आणि अतिसारासह नवजात बालकांमध्ये ‘रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस’ चा संसर्ग वाढल्याचे बालरोगतज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
 
हवामान खात्याचा इशारा लक्षात घेता, नागरिकांनी घराबाहेरच्या कामांमध्ये दक्षता घेत पावसाच्या संकटासाठी सज्ज राहावे. आगामी दिवसात राज्यातील काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे.
Powered By Sangraha 9.0