(Image Source-Internet)
मुंबई :
सामान्य जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये ०.५० टक्क्यांची कपात करत ही दर आता ५.५०% वर आणली आहे. त्यामुळे लवकरच गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या EMI मध्ये घट होण्याची शक्यता आहे.
आज, ६ जून रोजी सकाळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मौद्रिक धोरण समितीच्या (MPC) निर्णयांची घोषणा केली. ही बैठक ४ जूनपासून सुरू झाली होती.
या वर्षातील एकूण १ टक्क्यांची कपात-
फेब्रुवारी २०२५ मध्ये RBI ने व्याजदर ६.५०% वरून ६.२५% केला होता. ही कपात सुमारे ५ वर्षांनंतर झाली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये ०.२५% कपात, आणि आता जूनमध्ये आणखी ०.५०% कपात — अशा प्रकारे या वर्षात एकूण १% ची कपात झाली आहे.
रेपो रेट म्हणजे काय आणि याचा परिणाम काय होतो?
रेपो रेट ही ती व्याजदर आहे, ज्यावर RBI देशातील बँकांना कर्ज देते. जेव्हा RBI ही दर कमी करते, तेव्हा बँकांना स्वस्त कर्ज मिळते. त्यानंतर बँका ग्राहकांसाठी देखील गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यांवरील व्याजदर कमी करतात.
त्यामुळे:
गृहकर्ज घेणाऱ्यांची EMI कमी होणार
घरांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता
रिअल इस्टेट क्षेत्राला चालना
वाहन आणि ग्राहक कर्जही स्वस्त होण्याची शक्यता
ब्याजदरातील ही घसरण मध्यमवर्गीयांसाठी मोठी संधी ठरू शकते. गृहखरेदीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सध्या कर्ज घेणे अधिक सोयीचे आणि परवडणारे ठरेल, असा अंदाज बँकिंग तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.