(Image Source-Internet)
नागपूर :
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, भाजपने त्यासाठी आपली तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली.
नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळे म्हणाले, “भाजपचे संघटनात्मक कामकाज पूर्ण झाले आहे. नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा लवकरच होणार असून, कोणत्याही क्षणी निवडणुका लागल्या तरी आमचा पक्ष सज्ज आहे.”
राज्य सरकारकडून निवडणूक आयोगाला सर्वतोपरी सहकार्य-
बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, निवडणूक आयोगाने प्रभाग रचना सुरू केली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ऑक्टोबर महिन्यापर्यंत निवडणुका घेणे अनिवार्य आहे. “राज्य सरकारने आयोगाला आवश्यक ते सर्व संसाधन उपलब्ध करून दिले आहे. जवळपास १३ हजार जागांसाठी निवडणुका होतील आणि नव्या नेतृत्वाची निवड होईल,” असे त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणे ही विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र, राज्य आणि स्थानिक यंत्रणा समन्वयाने काम करतील, तरच जनतेपर्यंत योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचू शकेल,असेही बावनकुळे म्हणाले.
गावागावात 'चलते सेतु केंद्र' योजना -
राजस्व विभागाने एक अभिनव योजना हाती घेतली असून, ‘चलते सेतु केंद्र’ या नावाने विशेष बसगाड्यांद्वारे सरकारी सेवा थेट गावागावात पुरवण्याचे नियोजन आहे. या बसमधून नागरिकांना जात प्रमाणपत्र, जन्म व मृत्यू नोंदणीसह अनेक सेवा दिल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सर्व शासकीय सेवा टप्प्याटप्प्याने ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना कार्यालयात धावपळ न करता घरबसल्या सेवा मिळणार असून, संपत्तीविषयक वादही कमी होतील,” अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.