(Image Source-Internet)
पवनानगर (पुणे) :
मावळ तालुक्यातील कुडंमळा (Kudammala) येथे १५ जून रोजी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून घडलेल्या दुर्दैवी घटनेत चार पर्यटकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. आज, १७ जून रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जखमी पर्यटकांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि दुर्घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली.
या दुर्घटनेतील दोषींवर चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून, जखमी पर्यटकांच्या उपचाराचा खर्चही शासनाकडून करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार सुनील शेळके, उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, आरोग्य अधिकारी शरन सोनवणे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, कुडंमळा येथे घडलेली घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी योग्य ती काळजी घेतली जाईल आणि जबाबदारांवर कोणतीही नरमाई न ठेवता कडक कारवाई केली जाईल.