(Image Source- Internet)
लातूर:
लातूर (Latur) जिल्ह्यात तुळजापूर-लातूर महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. आशीव पाटी परिसरात दोन खासगी प्रवासी बस एकमेकांना जोरदार धडकून अपघात झाला. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून १५ ते २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पुण्याहून लातूरच्या दिशेने येणाऱ्या एका खासगी बसने समोरून जाणाऱ्या दुसऱ्या खासगी बसला मागून जोरदार धडक दिली. हा अपघात आशीव पाटी ते उजनी दरम्यान झाला. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.