(Image Source : Internet)
नागपूर :
राज्यातील नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये जनता दरबार (Janata Darbar) भरवला. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स येथील मुख्यमंत्री सचिवालयात शनिवारी आयोजित या दरबारात 5000 हून अधिक नागरिकांनी आपापल्या तक्रारी घेऊन हजेरी लावली. विदर्भासह राज्यभरातून नागरिक यासाठी आले होते.
मुख्यमंत्री फडणवीस दरमहा नागपूरमध्ये जनता दरबाराचे आयोजन करतात. मागील महिन्यातील दरबारातही 2000 हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. मात्र, या वेळी नागरिकांचा प्रतिसाद अधिक मोठा होता.
नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न-
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “दर महिन्याला नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी हा दरबार आयोजित करतो. यामध्ये आलेल्या प्रत्येक तक्रारींची नोंद घेतली जाते आणि त्या संबंधित विभागांकडे पाठवून त्यांच्या कार्यवाहीची माहिती घेतली जाते. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा एक प्रयत्न आहे.
या दरबारात नागपूर शहरासोबतच अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांतूनही नागरिकांनी सहभाग घेतला.
शिकायत नोंदवून कार्यवाहीचा पाठपुरावा-
जनता दरबारात आलेल्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने शासकीय योजना, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, जमीन विवाद, पोलिस कार्यवाही यांसारख्या बाबी होत्या. मुख्यमंत्री कार्यालयाकडून या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठवण्यात येणार असून, त्यावर वेळोवेळी पाठपुरावा केला जाणार आहे.