वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढणार; प्रकाश आंबेडकर यांची ठाम भूमिका

    16-May-2025
Total Views |
 
Prakash Ambedkar
(Image Source : Internet) 
खेड :
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत पार पाडण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये ताजेपणा आला आहे.
 
निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांची तयारी सुरु असताना, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोकण दौऱ्यात महत्त्वाची घोषणा केली. खेड तालुक्यातील मोरवंडे गावात आयोजित विहार उद्घाटन सोहळ्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.
 
प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, वंचित बहुजन आघाडी आगामी निवडणुकीत स्वतंत्रपणे लढणार आहे. तथापि, स्थानिक पातळीवर युतीच्या संदर्भात निर्णय जिल्हास्तरीय नेत्यांनी स्थानिक परिस्थिती पाहून घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
तसेच त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत काही तिखट प्रश्न उपस्थित केले. “शिवसेना काँग्रेससोबत एकत्र राहील का?”, “काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नातं किती काळ टिकेल?”, “भाजप आणि शिंदे गटाची युती किती सक्षम आहे?” असे प्रश्न विचारत त्यांनी सध्याच्या राजकीय वातावरणावर गंभीर विचार मांडले.