या महिन्यात 'ग्राम चिकित्सालय'चे महत्त्व कोणत्याही इतर शोपेक्षा झाले अधिक जास्त!

    15-May-2025
Total Views |
- ओटीटीवरील भारतीय कथेचा आणखी एकदा एक मोठा विजय

Gram Chikitsalaya(Image Source : Internet) 
प्राईम व्हिडीओने नेहमीच दर्जेदार वेब सिरीज (Web series) आणि चित्रपट सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. जिथे मनोरंजनाला सामाजिक समज आणि भावनिक खोलीची जोड मिळते. अशाच वेगळ्या आणि समर्पक कथा मांडणाऱ्या प्लॅटफॉर्मवर आता एक नवीन रत्न समोर आले आहे . ‘ग्राम चिकित्सालय’ (Gram Chikitsalaya).
दिग्दर्शक राहुल पांडे यांची ही सिरीज ग्रामीण भारताच्या हृदयाला भिडणारी कथा आहे, जी वास्तव आणि विनोदाचा अनोखा संगम घडवते. या कथेमध्ये ग्रामीण आरोग्य सेवा व्यवस्थेतील तुटफूट, मानसिक आरोग्यविषयी जागरूकता आणि शहरी व ग्रामीण संघर्षामधील फरक अत्यंत प्रभावीपणे मांडले गेले आहेत.
ही सिरीज केवळ एक शो नाही, तर त्या भारताचे प्रतिबिंब आहे जो अनेकदा दुर्लक्षित राहतो. त्यामुळे ‘ग्राम चिकित्सालय’ ही अलीकडील काळातील सर्वात महत्त्वपूर्ण ओटीटी सिरीजपैकी एक मानली जाते.
झगमगाटाच्या बाहेरचं सत्य: शहरी विशेषाधिकाराला ग्रामीण वास्तवाचं उत्तर
'ग्राम चिकित्सालय' ही सिरीज मुख्य प्रवाहातील झगमगत्या, विशेषाधिकाराधारित कथांना एक सशक्त पर्याय देत गावाकडील वास्तव, मोडकळीला आलेली पायाभूत आरोग्य सेवा आणि ग्रामीण भागातील खऱ्याखुऱ्या अडचणी समोर आणते.
खऱ्या भारताची ओळख
उत्तर भारतातील काल्पनिक गाव ‘भटकंडी’ या पार्श्वभूमीवर आधारित, ही सिरीज एका मोडकळीस आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील (PHC) घटनांवर केंद्रित आहे. यातून ग्रामीण जीवनातील कठोर, अनोळखी वास्तवाची झलक दिसते.
आधुनिक काळातील ‘स्वदेस’
ही सिरीज आपल्याला ‘स्वदेस’ची आठवण करून देणारी एक भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची कथा सांगते. डॉ. प्रभात सिन्हा (अमोल पाराशर) हा एक आदर्शवादी तरुण डॉक्टर, वडिलांच्या शहरातील यशस्वी रुग्णालयाचा मार्ग सोडून, एका जर्जर ग्रामीण PHCला पुन्हा उभं करण्याच्या मिशनवर निघतो. हे त्याच्या मूळाशी परतण्याचे एक भावनिक चित्र आहे.
१००० रुग्णांसाठी 1 डॉक्टर – एक आरोग्य संकट
हा शो ग्रामीण भारतात प्रचलित १:१००० डॉक्टर-रुग्ण अनुपात दाखवतो. जेथे अकार्यक्षम PHCमुळे गावकऱ्यांना एका अशिक्षित "झोलाछाप" डॉक्टरवर अवलंबून राहावं लागतं. हताश कर्मचारी आणि दुर्लक्षित यंत्रणा ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेतील गंभीर परिस्थिती अधोरेखित करतात.
ग्रामीण भारत – जो खरोखर महत्त्वाचा आहे
‘ग्राम चिकित्सालय’ आपल्याला हे आठवण करून देतो की खऱ्या भारताची धडपड, संघर्ष आणि संधी ग्रामीण भागातच असते. ही सिरीज त्या समाजाच्या कथा सांगते जिथे खऱ्या अर्थाने बदलाची सुरुवात होते.