(Image Source : Internet)
नवी दिल्ली :
भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे IPL (IPL)2025 हंगामाचे सामने स्थगित करण्यात आले होते. मात्र आता दोन्ही देशांमध्ये युद्धविराम जाहीर झाल्याने स्पर्धा पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर जोरदार कारवाई केली होती. परिणामी देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आणि 9 मे रोजी बीसीसीआयने आयपीएल आठवडाभरासाठी थांबवण्याचा निर्णय घेतला.
या पार्श्वभूमीवर बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच नव्या वेळापत्रकाची घोषणा केली जाईल, असं स्पष्ट केलं आहे. IPL 2025 मधील उर्वरित 16 सामने – ज्यात 4 प्लेऑफ सामनेही आहेत – हे आता जून महिन्याच्या सुरुवातीस खेळवले जाण्याची शक्यता आहे.
डबल हेडरचा पर्याय खुले
8 मे रोजी धरमशाळा येथे होणारा पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामना रद्द झाला होता. अशा प्रकारचे नुकसान भरून काढण्यासाठी बीसीसीआय डबल हेडरच्या माध्यमातून दिवसातून दोन सामने घेण्याचा विचार करत आहे.
दरम्यान, टीम इंडिया 20 जूनपासून इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे IPL लवकरात लवकर पूर्ण करून खेळाडूंना वेळेत आराम आणि तयारीचा वेळ मिळावा यासाठी BCCI जोरात नियोजन करत आहे.
क्रिकेटप्रेमी उत्सुक-
IPL चाहत्यांसाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी असून उर्वरित सामन्यांचे आयोजन, अंतिम सामना कधी होणार, याबाबतची अधिकृत घोषणा कधी होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.