बाळासाहेब असते तर अशा लोकांना लाथ मारली असती; AI भाषणावरून भाजपकडून उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल

17 Apr 2025 16:46:07
 
Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray
 (Image Source : Internet)
मुंबई:
राजकीय अस्तित्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना (यूबीटी) ने नाशिकमधील सभेत बाळ ठाकरे यांचा आवाज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) सहाय्याने पुन्हा जनतेसमोर आणला. 13 मिनिटांच्या या भाषणात "माझ्या हिंदू बंधूंनो, बहिणींनो आणि मातांनो" अशा परिचित स्वरात सुरुवात झाली.
 
भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया-
या प्रकारावर भाजपने कडाडून टीका केली. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, बाळासाहेब ज्या विचारसरणीविरोधात अख्खं आयुष्य लढले, त्याच विचारांना आता त्यांच्या आवाजातून प्रचार केला जातो. बाळासाहेब आज हयात असते, तर त्यांनी अशा लोकांना थेट "लाथ मारली असती",अशी टीका भाजपने केली आहे.
 
तुमचा आवाज हरवला, म्हणून बाळासाहेबांचा वापर-
बावनकुळे यांनी पुढे उद्धव गटावर हल्ला चढवताना म्हटलं, तुमचं कोणी ऐकत नाही म्हणून आज बाळासाहेबांच्या आवाजामागे लपता. ही विचारांची दिवाळखोरी आहे. बाळासाहेबांचे नाव, त्यांचा आवाज आणि त्यांच्या विचारांचा असा गैरवापर थांबवावा.
 
AI वापर आणि राजकीय नैतिकता यावर प्रश्नचिन्ह-
या प्रकारामुळे महाराष्ट्रात AI वापराच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा वापर करणे योग्य आहे का, यावर राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
Powered By Sangraha 9.0