(Image Source : Internet)
मुंबई :
छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटविण्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले,असे ते म्हणाले, त्यामुळे राजकीय वातावरण अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत.
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले. औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायची म्हणजे काय करायचं? महाराष्ट्राचीच ही माती आहे. सौंदर्यीकरण हा वेगळा मुद्दा आहे. एकदाची ती कबर उखडा, दररोज तेच तेच बोलले जातंय. हजारो विषय प्रलंबित असताना केवळ औरंगजेबावरच बोललं जातंय. इतिहासातून औरंगजेबाला काढू शकत नाही.
औरंगजेबासारखा व्हिलन होता म्हणून शिवाजी महाराज हिरो झाले, असे विधान आव्हाड यांनी केले. या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला असून भाजप आणि महायुतीतील इतर पक्षांकडून जोरदार टीका होण्यास सुरुवात झाली आहे.