भारतीय महिला क्रिकेट संघाचा विश्वविजय; पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक भारताच्या नावावर!

03 Nov 2025 10:40:04
 
Indian women Cricket team
 Image Source:(Internet)
नवी मुंबई :
भारतीय महिला क्रिकेट संघाने (Indian women Cricket team) रविवारी इतिहास घडवत आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकावर आपले नाव कोरले. दमदार खेळ आणि अदम्य जिद्दीच्या जोरावर ‘वुमन इन ब्लू’ने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावले. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्व क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहिला.
 
View this post on Instagram

A post shared by Abhijeet Bharat News (@abhijeetbharat_)

" /> 
 
भारताचा डाव :
भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत २९९ धावांचे भक्कम लक्ष्य उभे केले. युवा फलंदाज शफाली वर्माने फक्त ८७ धावांची झंझावाती खेळी करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना अक्षरशः नामोहरम केले. तिला स्मृती मंधानाने ठोस साथ दिली.
 
दीप्ती शर्मा चमकली :
गोलंदाजीत दीप्ती शर्माने आपल्या अचूक चेंडूफेकीने पाच गडी बाद करत दक्षिण आफ्रिकेच्या विजयाच्या सर्व आशा संपवल्या. अखेर अमनजोत कौरने घेतलेल्या झेलाने सामना भारताच्या झोळीत जमा झाला आणि संपूर्ण मैदान ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी दुमदुमले.
 
१४ वर्षांनंतर पुन्हा विश्वचषक भारतात!
२०११ मध्ये पुरुष संघाने मुंबईत विश्वचषक जिंकला होता, आणि नेमक्या त्या शहरात १४ वर्षांनी महिलांनी तोच पराक्रम साध्य केला. त्यामुळे भारत आता पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात विश्वविजेता ठरलेला जगातील तिसरा देश बनला आहे.
 
देशभर जल्लोषाचा माहोल :
महिला संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव, घराघरात मिठाईचे वाटप आणि रस्त्यांवर आनंदाचा स्फोट दिसून येत आहे.
 
पंतप्रधानांचे अभिनंदन :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत महिला संघाचे मनापासून कौतुक केले. “भारतीय महिलांनी दाखवलेली एकजूट, निर्धार आणि लढाऊ वृत्ती देशातील प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी आहे. मैदानावर आणि मनात दोन्ही ठिकाणी भारत विजेता ठरला आहे,” असे त्यांनी म्हटले.
 
या विजयानंतर भारतीय महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेणारा हा क्षण ठरला असून, ‘हरमनची टीम’ आज प्रत्येक भारतीयाच्या हृदयात राज्य करत आहे.
Powered By Sangraha 9.0