विदर्भातील निवडणूक मोहीम मंदावली; काँग्रेसची कामगिरी चिंताजनक; आशीष जयस्वाल

26 Nov 2025 17:51:17
 
Ashish Jaiswal
 Image Source:(Internet)
नागपूर :
विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना महाविकास आघाडीची गती मंदावल्याचे आणि काँग्रेस पक्षाची कामगिरी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यावर मंत्री आशीष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
 
जयस्वाल म्हणाले की, काँग्रेसकडे आता निवडणूक लढवण्याचा उत्साह कमी झाला आहे. पक्षातील अंतर्गत वादांमुळे मनोबल ढासळले असून अनेक ठिकाणी उमेदवारही मिळत नाहीत. त्यामुळे काँग्रेस आता निवडणुकीत मागे पडत आहे.
 
त्यांनी सांगितले की, काँग्रेसमध्ये बाहेरून आलेल्या नेत्यांना तिकीट देण्याचा प्रमाण वाढल्यामुळे जुने व अनुभवी नेते निवडणूक प्रक्रियेतून दूर झाले आहेत. ही स्थिती पक्षासाठी चिंताजनक आहे आणि त्याचा परिणाम निवडणूक कामगिरीवर दिसून येतो.
 
जयस्वाल यांच्या या वक्तव्यांमुळे विदर्भातील निवडणूक राजकारणात तणाव वाढला आहे.
Powered By Sangraha 9.0