Image Source:(Internet)
मुंबई:
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bhaini Yojana) एक महत्त्वपूर्ण सुधारित नियम जाहीर केला आहे. योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी आणि खरी गरजू महिलांना लाभ मिळावा यासाठी आता लाभार्थी महिलेसोबत तिच्या पती किंवा वडिलांची e-KYC करणे अनिवार्य केले गेले आहे.
पूर्वी योजनेसाठी फक्त लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासले जात असे, परंतु आता विवाहिता महिलांच्या पतीचे आणि अविवाहित महिलांच्या वडिलांचे वार्षिक उत्पन्नही पाहिले जाईल. जर कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, तर महिला योजनेसाठी अपात्र ठरेल. सरकारच्या मते, अनेकदा महिलांनी स्वतःचे उत्पन्न कमी दाखवून योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे, म्हणून संपूर्ण कुटुंबाची उत्पन्न पडताळणी बंधनकारक केली गेली आहे.
लाभार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ https://ladakibahin.maharashtra.gov.in वर जाऊन e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. मुखपृष्ठावरील e-KYC बॅनरवर क्लिक करून फॉर्म भरणे, आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड नोंदवून OTP द्वारे सबमिट करणे हे पाऊल महत्त्वाचे आहे. नंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक भरून त्यांची e-KYC देखील पूर्ण केली जाईल.
यामध्ये जात प्रवर्गाची माहिती, कुटुंबातील सदस्य शासकीय कर्मचारी नसल्याचे, तसेच योजनेचा लाभ फक्त एका विवाहित आणि एका अविवाहित महिलेला मिळत असल्याचे प्रमाणन करणे आवश्यक आहे. सबमिट केल्यावर यशस्वीरित्या e-KYC पूर्ण झाल्याचा संदेश दिसेल.
हा नियम योजनेतील फसवणूक टाळण्यासाठी आणि खरी गरजू महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी लागू करण्यात आला आहे.