(Image Source : Internet/ Representative)
नागपूर :
छत्रपती चौक येथे महिला गुन्हेगारांच्या टोळीने एका महिलेच्या बॅगेतून 2.50 लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
त्रिमूर्ती नगर येथील मंगला मतीनवार (50) या 24 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता वर्धा रोडवरील बसस्थानकावर आपल्या भाचीच्या लग्नासाठी यवतमाळ येथे जात होत्या. त्या बसची वाट पाहत असताना दोन महिला आणि एक पुरुष साथीदार जवळ आले. बसमध्ये चढण्याचा बहाणा करत तिला घेरले. त्यांनी मंगलाला धक्काबुक्की केली. आणि ती बसमध्ये चढली तेव्हा तिला तिच्या बॅगची चेन उघडी आणि दागिने गायब असल्याचे दिसले. मंगलाने या चोरीची तक्रार प्रताप नगर पोलिसात दिली असून पोलिसांनी टोळी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.