- शासनाने आर्थिक मदत द्यावी नुकसानग्रस्तांची मागणी
दर्यापूर:
तालुक्यात मागील तीन-चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. या पावसामुळे तालुक्यातील कळाशी, भुजवाडा, रुस्तमपूर येथे प्रत्येकी एक असे एकूण तीन राहत्या घरांच्या भिंती कोसळून अशंतः नुकसान झाले आहे. सुदैवाने कुठलीही जीवतहानी झाली नसल्याचे तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ऐन पावसाळ्यात आर्थिक नुकसान उभे ठाकल्याने शासनाने नैसर्गिक आपत्ती द्वारे लवकरात-लवकर आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासनान व नुकसानग्रस्त कुटुंबातील सदस्यांनकडून होत आहे. मंगळवारी पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली. ग्रामीण भागतील नदीनाले ओंसडून वाहत असल्याचे चित्र आहे. सततधार पावसामुळे उज्वल खडे (रुस्तमपूर), मंगेश गावंडे (कळाशी) , विनोद वडूरकर (भुजवाडा) या तीन गावात तीन राहत्या घरांचे कमी जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. माहीती मीळताच महसूल प्रशासशाच्या वतीने पंचनामा करुन रितसर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे अशी माहिती तहसीलदार रविंद्रकुमार कानडजे यांनी दिली. दरम्यान गुरुवारीही दिवसभर ढगाळ वातावरण व पावसाची रिपरिप सुरुच होती.