(Image Source : Internet)
मुंबई :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले आहे. उपोषण स्थगित केल्यानांतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मराठा आरक्षाबाबत भूमिका स्पष्ट करण्याबाबत आवाहन केले.
गेल्या काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करावी. यावर आता मी सांगतो, ही जी त्यांनी तीन नावे घेतली यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. या नेत्यांनी मराठ्यांना ओबीसीतून मिळावे अशी भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केल्यानंतर सरकारला १३ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे.