(Image Source : Internet)
मुंबई :
भाजपाने पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना बीड येथून लोकसभेची उमेदवारी दिली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यानंतर भाजपाने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेच्या रिंगणात उतरवले. यात त्या विजयी झाल्या. यातच पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्यास भाजपाला पुन्हा चांगले दिवस येतील, असे विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केले आहे.
पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्या तर महाराष्ट्र परत वाड्या-वस्त्यांवर जाऊ शकतो. महाराष्ट्रातील कमळ वाड्या-वस्त्यांवर डोंगर-दऱ्यांमध्ये फुलू शकते. तेवढे धारिष्ट्य आणि धैर्य भाजपा दाखवणार असेल, तर आम्ही याचसाठी केला होता अट्टाहास, बाकी सगळे समजुतदार आहात, असे सूचक विधान लक्ष्मण हाके यांनी केले.