(Image Source : Internet)
नागपूर :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर अनेकांनी ताशेरे ओढले. विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाला असून राज्याला यातून काहीच मिळाले नाही. याच्या निषेध म्हणून नागपुरात आज बुधवारी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी-सपा कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.