- देवेंद्र फडणवीसांवर केले गंभीर आरोप
नागपूर :
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुखयांनी दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी केलेल्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यामाध्यमातून निल देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
नागपुरात श्याम मानव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यांबाबत अनिल देशमुखांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंना अडकवण्याचा दावा श्याम मानव यांनी केला. यावेळी बोलत असताना हे कटकारस्थान खुद्द देवेंद्र फडणवीस यांचंच असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.
तीन वर्षांपूर्वी प्रतिज्ञापत्र करून खोटे आरोप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर करण्यास मला सांगण्यात आलं. मी त्याला नकार दिल्याने माझ्यावर ईडी आणि सीबीआयची कारवाई करण्यात आली होती, असे अनिल देशमुख म्हणाले. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला. त्याने माझं अनेकदा देवेंद्र फडणवीसांसोबत बोलणं करून दिलं. त्यांनी माझ्याकडे एक लिफाफा पाठवला होता. त्यातील चार मुद्द्यांचं प्रतिज्ञापत्रक देण्यास सांगितलं असल्याचं अनिल देशमुख म्हणाले आहेत. याबाबाचे सबळ पुरावे माझ्याकडे असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.