(Image Source : Internet)
मुंबई :
राज्यात मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणावरून वादंग पेटले आहे. आरक्षणासंदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना एक पत्र लिहून आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे.
आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याचे जाहीर केले. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा २५ जुलै रोजी चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार असून त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांनाही या यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. तसेच शरद पवारांनीही या यात्रेत सहभागी व्हावे, अशी आंबेडकर यांची इच्छा आहे.