(Image Source : Internet/ Representative)
वर्धा :
महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्यावतीने आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर यात्रेकरीता सोडन्यात आलेल्या विशेष बसफे-यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत प्रवाश्यांचे मोठ्याप्रमाणावर महामंडळाला सहकार्य मिळाले यासाठी परिवहन महामंडळाच्यावतीने प्रवाश्यांचे आभार मानन्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने आषाढी पंढरपूर यात्रेकरीता मागील वर्षी तिथीनिहाय 45 विशेष बस फे-या सोडन्यात आल्या होत्या तर यावर्षी 78 बसफे-या सोडन्यात आल्या होत्या. यावर्षी प्रवाश्यांचे खुप मोठ्या प्रमाणावर सहकार्य महामंडळास लाभले. असुन यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे. तथापी महामंडळाच्या सर्वच आगारांनी यात्रेचे अतिशय उत्तमरित्या व्यवस्थापन करुन जास्तीत जास्त प्रमाणात वारक-यांना यात्रेकरीता सुरक्षित प्रवास उपलब्ध करुन दिला. आषाढी पंढरपूर यात्रेकरीता यावर्षी वारकरी तसेच इतर सर्वच प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाच्या वाहतुकीवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल व आस्थाबाबत महामंडळ प्रवाशांचे आभारी आहे. तसेच यापुढेही असाच कायम विश्वास दाखवून प्रवाश्यांनी महामंडळाला सेवा करण्याची संधी दयावी असे विभाग नियंत्रक संदिप रायलवार यांनी सांगितले.