(Image Source : Internet)
मुंबई :
'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार' पक्षातर्फे प्रकाशित 'महायुतीचे काळे कारनामे' या पुस्तिकेचे अनावरण प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार अमोल कोल्हे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार काम करत आहे. हे करत असताना महाराष्ट्र ज्यांचा आहे. त्या सर्वसामान्य युवक, महिला, शेतकरी, कष्टकरी, सामान्य, मध्यमवर्गीयांचे नेमके काय म्हणणे आहे? त्यांच्या स्वप्नातला हा महाराष्ट्र काय आहे? याचा उत्तर महाराष्ट्रातील जनता नक्कीच देईल, असे कोल्हे म्हणाले. राज्यातील महायुतीचे सरकार भ्रष्टाचारामध्ये कशाप्रकारे बुडालेले आहे. हे प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांमधून दिसून येत असल्याचेही ते म्हणाले.