(Image Source : Internet/ Representative)
एबी न्यूज नेटवर्क :
भारताने नुकतेच टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले असून, विश्वचषक विजेता संघातील काही खेळाडूंची थेट आयसीसी मानांकन यादीत समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच यंदाची पुरुष टी ट्वेंटीची क्रमवारी जाहीर केली आहे.
विश्वविजेता भारतीय संघाने नुकतेच झिम्बाब्वेविरुद्ध ४-१ नं टी-२० मालिका जिंकली आहे. परिणामी भारतीय खेळाडूंनी ताज्या क्रमवारीत वरचं स्थान मिळवलं आहे. भारताचे तीन खेळाडू या मानांकन यादीत आहेत.
फलंदाजीत भारताच्या सूर्यकुमार यादवने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे, तर यशस्वी जैस्वाल सहाव्या स्थानावर आहे. ऋतुराज गायकवाड क्रमवारीत एका क्रमांकानं घसरून आठव्या स्थानावर आला आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत, हार्दिक पंड्या हा टॉप टेन मधला एकमेव भारतीय खेळाडू आहे, तर श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगा याने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.