- सर्व रेल्वे थांबा बंद केल्यामुळे विद्यार्थी, नागरिकांची गैरसोय
मोर्शी :
गेल्या २५ जूनपासून हिवरखेड रेल्वे स्थानकांवरील सर्व रेल्वे गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील विद्यार्थी व गरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. विना रेल्वे थांब्यामूळे आता हिवरखेड रेल्वे स्थानक बिनकामाची वास्तू झाली आहे.
मोर्शी विधानसभा मतदार संघाला दोन-दोन खासदार लाभले असतांना वरूड, मोर्शी तालुक्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर आवश्यक रेल्वे गाड्यांचे थांबे देऊन रेल्वे स्थानकांचा विकास करणे गरजेचे होते. ज्या स्टेशनवर सुविधा नाही त्या स्टेशनवर चांगल्या सोई सुविधा पुरविणे हे प्राधान्य असायला पाहिजे होते.