विशाळगडावरील हिंसा हिंदुत्ववाद्यांनी कुणाच्या चिथावणीवरून केली? विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल

16 Jul 2024 17:31:43

Vijay Wadettiwar attacked government over the violence in Vishalgarh
 
 
मुंबई :
काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विशाळगड येथे झालेल्या हिंसाचारावरून सरकारला घेरले आहे. विशाळगडावरील दंगल हिंदुत्ववाद्यांनी कुणाच्या चिथावणीवरून केली, याच्यामागे कोण आहे, याचा खुलासा राज्य सरकारने करावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
 
हिंसा हिंदुत्ववाद्यांनी कुणाच्या चिथावणीवरून केली. याच्यामागे कोण आहे? याच्यावर काय कारवाई होणार आहे, याचा खुलासा सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये जे जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मागच्या काही दिवसांत महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे जे धिंडवडे निघाले आहेत, त्याला राज्य सकरार जबाबदार आहे, असा घणघणातही वडेट्टीवार यांनी केला.
Powered By Sangraha 9.0