येत्या चार महिन्यांत केंद्रातील सरकार बदलणार; जयंत पाटलांचा दावा

16 Jul 2024 18:01:43

Central government will change in next 4 months claims Jayant Patil
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
देशात नुकतेच पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार आले. हे सरकार सत्तेत आल्यापासून विरोधकांनी ते कोसळण्याबाबत मोठे दावे केले आहेत. शेकाप नेते जयंत पाटील यांनी आता यासंदर्भात केलेल्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
 
येत्या चार महिन्यात केंद्रातील सरकार बदलणार आहे. त्यानंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीत जातील. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचा अनेक वर्षांचा कार्यकाळ दिल्लीत घालवलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल. मीही इंडिया आघाडीचा एक सदस्य आहे. त्यामुळे हे सांगत आहे, असे शेकापच्या जयंत पाटील यांनी म्हटले आहे. पाटील यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
Powered By Sangraha 9.0