(Image Source : Internet)
नवी दिल्ली :
सत्ताधाऱ्यांविरोधात एकवटलेले विरोधक INDIA आघाडी देशाच्या सावत्रिक निवडणुकीत बहुमत प्राप्त करेल असा विश्वास काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही बहुमताचा २७२ चा आकडा पार करू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांनी वृत्तसंस्थेच्या मुख्यालयात संपादक आणि पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना 'इंडिया' आघाडी सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विरोधकांवर केले जात असलेले भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे आहे.
'इंडिया' आघाडी एकजुटीने २७२ जागांचा बहुमताचा आकडा सहज पार करेल आणि आम्ही भाजपाला सत्तेबाहेर फेकू, असा दावा रमेश यांनी केला. निवडणूक रोखे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेसंबंधीच्या कारवाईवरून त्यांनी भाजपाला लक्ष्य केले. निवडणूक रोखे आणि कंपन्यांना कंत्राट देणे याचा एकमेकांशी संबंध आहे. चार हजार कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांचा थेट संबंध चार लाख कोटी रुपयांच्या कंत्राटाशी संबंधित आहे, असा गंभीर आरोप रमेश यांनी लावला.