(Image Source : Internet/ Representative)
एबी न्यूज नेटवर्क :
भारत आणि चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा अर्थात एलएसी वर गस्त घालण्याबाबत करार झाला आहे. करारामध्ये डेपसांग आणि डेमचोक भागात गस्त घालण्याबाबत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार या दोन्ही सीमेवर गस्त सुरू झाली असून लवकरच दोन्ही देश आपले सैन्य मागे घेतील. वर्षानुवर्षे तणावाखाली असलेला लडाख सीमा वाद कमी होण्याची अपेक्षा यातून दिसून येते. एलएसी मधून लष्करी सैन्याने माघार घेण्याच्या या कराराला लष्करी भाषेत डिसेंगेजमेंट म्हणतात. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी याबाबत माहिती दिली.
ते म्हणाले की, गस्तीच्या व्यवस्थेबाबत दोन्ही देशांमध्ये करार झाला आहे. जे 2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करेल. येत्या 22 ते 24 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या 16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यापूर्वी हे करार करण्यात आले आहेत. या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. या संदर्भात परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले की, गेल्या काही आठवड्यांपासून भारत आणि चीनमध्ये राजकीय आणि लष्करी मुद्द्यांवर चर्चा होत आहे. वाद आणि तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आम्ही एलएसी मुद्द्यावर चीनसोबत सामंजस्य करार केला आहे.