- पवनार ग्रामपंचायतीने ही दिला पूर्ण पाठिंबा
वर्धा : पंतप्रधान मोदींनी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता देशव्यापी स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन शुक्रवारी केले. याच आव्हान साथ देत इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज वर्धा आणि पवनार ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी पवनार ग्रामपंचायत धाम नदीच्या परिसरात "स्वच्छता भारत मिशन" मोहीम राबविण्यात आले आहे. यामध्ये खासदार मा. रामदास तडस, आमदार डॉ. पंकजभाऊ भोयर, जिल्हाधिकारी राहुल कार्डीले, पोलिस अधीक्षक नुरुल हसन, सरपंच मा.सौ. शालिनी आदमने मॅडम आणि प्रा. संदिप गिरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनेक सामाजिक संघटना व शाळा कॉलेज चे अनेक अधिकारी व विद्यार्थीनी मोलाचे श्रमदानं केले. प्रा. संदिप गिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान केले. यावेळी समाजकार्य विभागाचे सर्व एम.एस. डब्ल्यू भाग 1 आणि 2 वर्षांचे विदयार्थीनी ही सहभाग घेतला होता.
पीएम मोदींनी एक पोस्ट टाकली होती त्यात त्यांनी लिहिले होते, 'स्वच्छ भारत ही एक सामाजिक जबाबदारी आहे आणि प्रत्येकाचा प्रयत्न महत्त्वाचा आहे.' गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला ही मोहीम राबविण्यात येणार आहे, हे विशेष म्हणजे राष्ट्रपिता महात्म गांधी यांनी आयुष्यभर स्वच्छतेवर भर दिला होता. या साठीच पंतप्रधान मोदींनी इंटरनेट मीडिया वरील एक पोस्टमध्ये म्हटले आहे की, 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता आपण एका महत्त्वाच्या स्वच्छतेच्या उपक्रमासाठी एकत्र यायचे आहे. स्वच्छ भविष्यासाठी या महान प्रयत्नात सामील व्हा असे आव्हान केल होते.