
Image Source:(Internet)
नाशिक: येथील अशोक खरात प्रकरणाने आता गंभीर राजकीय वळण घेतले असून, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात धक्कादायक आरोप केले आहेत. या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
तृप्ती देसाई यांनी दावा केला की, नीलम गोऱ्हे या अशोक खरात यांच्या संपर्कात होत्या आणि नाशिकमधील एका हॉटेलमध्ये त्यांची भेटही झाली होती. यासोबतच दोघांमध्ये नातेसंबंध असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर गोऱ्हे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याने त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या नेत्या या गंभीर प्रकरणावर शांत का आहेत, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर तक्रारी समोर येत असून काही तक्रारी लैंगिक छळाशी संबंधित असल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व पैलू उघड करण्याची मागणी आता जोर धरत आहे.