कारवाई करणाऱ्यांचीही चौकशी व्हावी;केजरीवाल प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

    28-Feb-2026
Total Views |
 
Uddhav Thackeray ON Kejriwal case
 Image Source:(Internet)
मुंबई :
दिल्लीतील कथित अबकारी धोरण प्रकरणात अटक झाल्यानंतर न्यायालयाकडून दिलासा मिळालेल्या अरविंद केजरीवाल (Kejriwal)  यांच्याबाबत शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठोस भूमिका मांडली आहे. निवडून आलेल्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना तुरुंगात डांबले गेले, पण नंतर न्यायालयाने त्यांना दिलासा दिला; अशा परिस्थितीत अटक प्रक्रिया राबवणाऱ्या अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले पाहिजे, असे ते म्हणाले.
 
पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलताना ठाकरे यांनी केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री Manish Sisodia यांचे अभिनंदन केले. “लोकशाही व्यवस्थेत न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च असतो. जर न्यायालयाने दिलासा दिला असेल, तर संपूर्ण प्रकरणाचा फेरविचार व्हायला हवा,” असे त्यांनी नमूद केले.
 
याच मुद्द्यावर शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया देताना संस्थांच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले. “राजकीय प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणण्यासाठी यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची भावना निर्माण झाली आहे,” असा आरोप त्यांनी केला. निवडणुकीच्या काळात केजरीवाल यांना अटक झाल्याने देशाची प्रतिमा जागतिक स्तरावर प्रभावित झाल्याचेही त्यांनी सांगितले.
 
या वक्तव्यांमुळे राष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा या प्रकरणावरून चर्चा रंगण्याची शक्यता आहे.