महाराष्ट्र होणार देशाचे पहिले बेघर मुक्त राज्य, मुख्यमंत्री फडणवीसांचा ऐतिहासिक संकल्प

    28-Apr-2025
Total Views |
 
CM Devendra Fadnavis
 (Image Source : Internet)
पुणे:
महाराष्ट्राला देशाचं पहिलं बेघर मुक्त राज्य बनवण्याच्या महत्वाकांक्षी दृष्टीकोनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मांडला आहे. पुण्यातील यशदा इथे आयोजित पंचायत राज राज्य स्तरीय कार्यशाळेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या अंतर्गत राज्याने केलेल्या कार्याची सराहना करत केंद्र सरकारने १० लाख अतिरिक्त घरांसाठी मंजुरी दिल्याची माहिती दिली.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले, गरिबांना छत मिळवून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. घरांच्या स्वीकृतीसाठी जमीन उपलब्ध करून देणे आणि एकही कुटुंब बेघर राहू नये यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावं. ते पुढे म्हणाले, आमच्याकडे तंत्रज्ञान आणि संसाधनं आहेत. त्यांचा योग्य वापर करून आम्ही इतर राज्यांतील यशस्वी मॉडेल्सचा अभ्यास करून त्यावर आधारित उपाययोजना लागू करू.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'प्रधानमंत्री सूर्यघर योजना' अंतर्गत सौर ऊर्जा सुविधा प्रत्येक घरात दिली जावी, अशी सुचना केली. यामुळे पर्यावरणीय फायद्यांसोबतच रोजगाराच्या संधीदेखील निर्माण होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
यावेळी ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे, राज्य मंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, यशदा महानिदेशक निरंजन सुधांशु आणि मुख्यमंत्री सचिव श्रीकर परदेशी उपस्थित होते. शेवटी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र एक आदर्श बनवेल आणि देशभरात एक उदाहरण प्रस्तुत करेल.