सर्वोच्च न्यायालयात इंडिगो संकट प्रकरण ;विमानसेवा गोंधळावर तातडीची सुनावणी

    06-Dec-2025
Total Views |
 
IndiGo crisis case in Supreme Court
Image Source:(Internet) 
नवी दिल्ली :
इंडिगो (IndiGo) एअरलाइन्सच्या उड्डाण रद्दीकरणाच्या गंभीर समस्येवर सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुनावणी होणार आहे. केंद्र सरकार आणि इंडिगोला समन्स बजावण्याचा आदेश देण्याची शक्यता असून, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या निवासस्थानी विशेष खंडपीठ स्थापन होऊ शकते.
 
दिल्ली विमानतळावर ५ डिसेंबरला इंडिगोने १,००० पेक्षा अधिक उड्डाणे रद्द केली, ज्यामुळे प्रवाशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी माफी मागितली असून, परिस्थिती हळूहळू सुधारत असल्याचे सांगितले.
 
प्रवाशांच्या गैरसोयीवर मात करण्यासाठी रेल्वेने ३७ गाड्यांमध्ये ११६ अतिरिक्त कोच जोडले असून, स्पाइसजेटही १०० अतिरिक्त उड्डाणे चालवत आहे. आयआरसीटीसीवरही जागा उपलब्ध आहेत.
 
एअरलाइन्स पायलट्स असोसिएशनने डीजीसीएच्या नियमांवर चिंता व्यक्त केली असून, सुरक्षा शिथिल झाल्याचा आरोप केला आहे. देशातील विमानसेवेत इंडिगोचे मोठे वाटा असल्याने या संकटाचा प्रभाव व्यापक आहे.
 
केंद्र सरकारने इंडिगोला प्रवाशांना तातडीने रद्द तिकिटांचे पैसे परत करण्याचे आणि भविष्यात अशी समस्या होणार नाही यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.इंडिगोची सेवा हळूहळू सामान्य होत आहे.