बाळासाहेब ठाकरे यांचे मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आले?रामदास कदमांनी केला गौप्यस्फोट

    03-Oct-2025
Total Views |
 
Ramdas Kadam
Image Source:(Internet) 
मुंबई:
शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या विधानामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. कदमांच्या म्हणण्यानुसार, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आले होते.
कदमांनी पत्रकार परिषदेत सांगितले की बाळासाहेबांना भेटायला शरद पवार आले होते, परंतु त्यांना वर जाण्याची परवानगी नव्हती. त्या वेळी शरद पवार म्हणाले होते, “अरे, बाळासाहेबांच्या देहाशी उद्धव का त्रास करतात?” कदमांनी सांगितले की ते त्या वेळी मातोश्रीमध्ये उपस्थित होते.
रामदास कदम यांनी हेही म्हटले की उद्धव ठाकरे यांनी चुकीचे वर्तन केले आहे आणि ही माहिती महाराष्ट्रातील जनतेला कळायला हवी. “माझ्याकडे अनेक बाबी आहेत, पण त्या वेळ आली तरच बोलणार,” असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी आरोप केला की उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे हतांचे ठसे घेतले आहेत. कदमांनी उद्धवांकडे थेट आव्हान केले की हे स्पष्ट करावे.
कदम म्हणाले, “मी भगव्या झेंड्याचा खरा सेवक आहे आणि बाळासाहेबांचा शुद्ध भक्त आहे. उद्धवांनी समोर येऊन बोलावे, मग मीही उघडपणे बोलणार. एकदा होऊन जाऊदे.”
राजकीय वर्तुळ आता पाहत आहे की ठाकरे गट यावर कशी प्रतिक्रिया देतो, कारण कदमांचे आरोप खूपच गंभीर मानले जात आहेत.