सरकारने शेतकऱ्यांसाठी खास योजना; 'या' शेतकऱ्यांना मिळणार पाच वर्ष मोफत वीज

    26-Jul-2024
Total Views |
Government special scheme for farmers
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
राज्य सरकारने नुकतेच महिला आणि युवकांसाठी महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या. आता सरकारने शेतकऱ्यांसाठी खास योजना आणली. त्यात शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज देण्यात येणार आहे.
 
7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंप असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णयाचे परिवत्रक काढण्यात आलं नाही. ही योजना एप्रिल 2024 पासून मार्च 2029 पासून लागू राहणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ही योजना जाहीर केली. राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
 
मोफत वीज योजनेत आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर दोन वर्षे योजना राबवण्याबाबत निर्णय होईल. शासनाच्या या योजनेचा फायदा शेतकऱ्यांप्रमाणे महावितरणाला होणार आहे. महावितरणाच्या कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुलीची चिंता मिटणार आहे. महावितरणाला राज्य सरकार वीज बिलासाठी 14 हजार 760 कोटी रुपये देणार आहे.