महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे काही असंतुष्ट आत्मे...; जयंत पाटलांचा टोला

    18-Jul-2024
Total Views |

Jayant Patil targeted government over expansion of cabinet
 (Image Source : Internet/ Representative)
 
मुंबई :
राज्याच्या राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र हे वृत्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळले. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे विधान त्यांनी केले. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
 
मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे काही असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न आहे, असा टोला जयंत पाटील लगावला आहे.
 
येत्या काळात महायुतीचे सरकार येईल याची खात्री नाही. त्यामुळे जर पुन्हा सरकार येणारच नसेल तर किमान आम्हाला थोड्या दिवसांसाठी तरी मंत्री करा, असे म्हणणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे महायुती सरकार मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे कळते, असे पाटील म्हणाले.